शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

फलोत्पादन महामंडळाने अनुदानित दराने नारळ विक्री थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 15:24 IST

गेल्या वर्षी नारळाचे दर वाढल्यानं सरकारनं अनुदानित दरानं नारळ विक्री सुरू केली होती

पणजी : राज्यात नारळाचे दर पूर्वीएवढे राहिलेले नाही. आता दर थोडे कमी झाले आहेत. त्यामुळे सरकारच्या गोवा फलोत्पादन विकास महामंडळाने आपल्या दालनांमधून अनुदानित दराने केली जाणारी नारळ विक्री थांबवली आहे. 

गेल्या जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात जेव्हा नारळाचे दर खूप वाढले होते. त्यावेळी महिला काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले होते. महागाईच्या काळातही सरकार लोकांना काहीच दिलासा देत नाही, अशी टीका करून महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक रुपात नारळ विक्री सुरू केली होती. यामुळे सरकारने धावपळ करत गेल्या फेब्रुवारीत पणजी व मडगाव अशा दोन ठिकाणी अनुदानित दराने नारळ विक्री योजनेचा आरंभ केला होता. प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 15 नारळ दिले जातील, असे जाहीर करण्यात आले होते. योजना सुरू होताच लोकांनी फलोत्पादन महामंडळाच्या दालनात गर्दी केली. काही दालनांमध्ये पहिल्या दोन दिवसांतच सगळे नारळ संपले. जिथून नारळ मिळेल, तिथून फलोत्पादन विकास महामंडळ ते खरेदी करेल आणि त्या नारळांची कमी दरात विक्री करेल, असे कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी जाहीर करतानाच ही योजना प्रथम दोन महिन्यांसाठी असेल असे म्हटले होते. 

फलोत्पादन महामंडळाने हजारो नारळांची विक्री काही दिवसांमध्ये केली. मात्र नारळाचे दर पूर्णपणे कमी होण्यापूर्वीच या योजनेची गती मंदावू लागली. महामंडळाला जास्त प्रमाणात नारळही वेगाने उपलब्ध होण्यात अडचणी येत होत्या. बाजारपेठेत सध्या मध्यम आकाराच्या नारळाचे दर 25 रुपये आहे. एकदम छोटा नारळ वीस रुपयांना मिळतो. मोठे नारळ मात्र 30 व 35 रुपयांना विकले जात आहेत. गरीबांना अजुनही नारळ खरेदी परवडत नाही. त्यामुळे सरकारने फलोत्पादन विकास महामंडळाच्या दालनांमधून अजुनही अनुदानित दराने निदान गरीबांना तरी नारळ विक्री सुरू ठेवायला हवी, अशा प्रकारचे मत लोकांमधून व्यक्त होत आहे.

फलोत्पादन महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने मात्र नारळाचा दर आता थोडा कमी असल्याने आता दालनांमधून नव्याने विक्री सुरू करण्याची गरज नाही, असे मत लोकमतशी बोलताना व्यक्त केले. नारळ उत्पादक शेतक:याला नारळावर केवळ पाच ते बारा रुपये मिळत असतात. आता नारळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. काही लोक पंधरा-वीस हजार रुपयांचा मोबाईल खरेदी करतील व दोन हजार रुपयांची जीन्सदेखील वापरतील. पण नारळाचे दर किंचित वाढले तरी, महागाई वाढली असा दावा करतात, असे अधिकारी म्हणाले.

टॅग्स :goaगोवा