शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

शहर बुडते, सरकार वाचते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 09:25 IST

संपादकीय: मुख्यमंत्र्यांनी पणजी बुडणार नाही, अशी ग्वाही दिली होती.

मंगळवारी रात्री दोन तास जोरदार पाऊस पडला आणि पणजी शहरातील प्रमुख रस्त्यांवर दाणादाण उडाली. व्यापार-धंद्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या भागातील अठरा जून रस्ता बुडाला. अन्य काही रस्तेही पाण्याखाली गेले. बुधवारी सकाळी बराचवेळ आणखी जोरदार पाऊस पडला. राजधानी पणजीत सगळीकडे पाणी भरून राहिले. गटारे तुंबली, रस्ते भरून गेले. दुकानांमध्ये पाणी शिरले. पणजी शहर बुडणार नाही, असे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलले होते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली घोटाळा झाला आहे व त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागतील, अशी टीका लोक करीत होते; मात्र त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी पणजी बुडणार नाही, अशी ग्वाही दिली होती.

पावसाने गोवा सरकारला खोटे ठरविले. पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात व महापौर रोहित मोन्सेरात यांनी अगोदरच आपले हात वर केले आहेत. आमदार किंवा मंत्री दैनंदिन कामांवर लक्ष देत नाही, देखरेख करण्यासाठी अभियंते व सल्लागार साइटवर असतात, असे बाबूश बोलले होते. पणजी पावसाळ्यात तुंबली तर आपण जबाबदार नसणार, असे मोन्सेरात यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट करून आपला काहीच संबंध नाही, असे भासविले होते. अर्थात सर्व लोकप्रतिनिधींना असे बेजबाबदार वागणे आजच्या काळात शोभून दिसते. बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनीही हात वर केले होते, हे वेगळे सांगायला नको.

मोन्सेरात यांनी सल्लागारांना अधिक स्पष्टपणे दोष दिला होता. पणजीत स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत, सल्लागार कंपनीला सरकारने आठ कोटी रुपये फेडले, असे मोन्सेरात यांनी जाहीरपणे बोलून दाखविले होते. गेल्या २४ मे रोजी मोन्सेरात यांनी केलेली विधाने सर्व प्रसारमाध्यमांनी ठळकपणे प्रसिद्ध केली होती. माझी भूमिका सध्या मे महिन्यात) 'वेट अँड वॉच' अशी आहे. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीत जी कामे सुरू आहेत, ती निकृष्ट असल्याचे मोन्सेरात उघडपणे जाहीर करून मोकळे झाले होते. सल्लागार कंपनी ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असायला हवी. 

बांधकाम खात्याकडे अनेक अभियंते आहेत. त्या अभियंत्यांमार्फत सल्लागारांच्या कामावर लक्ष ठेवायला हवे, असे बाबूश यांनी सुचविले होते. सल्लागार किंवा अभियंते स्थानिक हवेत, अशा अर्थाचे त्यांचे विधान होते. मुख्यमंत्री सावंत यांनी बाबूश यांच्या भूमिकेची दखल त्यावेळी घेतली होती की नाही कोण जाणे; मात्र सावंत यांनी एक-दोनवेळाच पणजीत फिरून कामांची पाहणी केली होती. त्यांनी संजित रॉड्रिग्ज यांच्याकडे स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून जबाबदारी सोपविली. त्यानंतर कामाला थोडा वेग आला; मात्र तोपर्यंत जून • महिना सुरू झाला होता. पाऊस थोडा उशिराच सुरू झाला. अन्यथा पणजी यापूर्वीच बुडाली असती. आता नागरिकांची व गोवा सरकारचीही कसोटी सुरू झाली आहे. पावसाने जोर धरला आहे पणजीतील दुकानदार, वाहनचालक, नागरिक व पर्यटक गोवा सरकारला दोष देत आहेत; मात्र लोक बुडाले तरी शेवटी लोकप्रतिनिधी मात्र तरत असतात. सरकार तरते, चरते आणि वाचतेही. मग नागरिकांना व दुकानदारांना कितीही त्रास झाला तरी राज्यकर्त्यांना त्याचे काही पडलेले नसते.

पणजी शहराने गेल्या दोन वर्षांत खूप सोसले. सगळीकडे रस्ते वर्षभर फोडून ठेवले होते. सांतइनेज व पुढे टोंकाच्या दिशेने जाणारा रस्ता तर दोन वर्षे फोडलेला होता. काही रस्ते आता ठीक झालेत; पण मध्यंतरी लोकांना, मध्यमवर्गीय व्यापारी, छोटी हॉटेल्स आणि दुकानदारांना झालेला त्रास प्रचंड आहे. लोकांची, विद्यार्थ्यांची खूप गैरसोय झाली. अभियंते किंवा अन्य कुणी फिल्डवर दिसतच नव्हते. दिसायचे ते फक्त मजूर. लोकांनी सातत्याने टीका केल्यानंतर पणजी महापालिका अधूनमधून जागी व्हायची. काही नगरसेवकही मीडियाशी खासगीत बोलून नाराजी व्यक्त करायचे. विद्यमान सरकार संवेदनशील असते तर पणजीत स्मार्ट सिटीची कामे नीट होतील, याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिले असते. शेकडो कोटी रुपये आतापर्यंत पणजीत खर्च केल्याचे सांगितले जाते. हा पैसा गेला कुठे? पणजी शहर तर आजदेखील तुंबते व बुडते. वास्तविक अशा विषयांवरून लोकआंदोलने उभी राहायला हवीत. नागरिकांची पर्वा नसलेले काहीजण राज्य करतात तेव्हा बुडणेच लोकांच्या नशिबी येते. सरकार मात्र दर आपत्तीवेळी वाचते.

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी