शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

शहर बुडते, सरकार वाचते 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 09:25 IST

संपादकीय: मुख्यमंत्र्यांनी पणजी बुडणार नाही, अशी ग्वाही दिली होती.

मंगळवारी रात्री दोन तास जोरदार पाऊस पडला आणि पणजी शहरातील प्रमुख रस्त्यांवर दाणादाण उडाली. व्यापार-धंद्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या भागातील अठरा जून रस्ता बुडाला. अन्य काही रस्तेही पाण्याखाली गेले. बुधवारी सकाळी बराचवेळ आणखी जोरदार पाऊस पडला. राजधानी पणजीत सगळीकडे पाणी भरून राहिले. गटारे तुंबली, रस्ते भरून गेले. दुकानांमध्ये पाणी शिरले. पणजी शहर बुडणार नाही, असे काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलले होते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली घोटाळा झाला आहे व त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागतील, अशी टीका लोक करीत होते; मात्र त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी पणजी बुडणार नाही, अशी ग्वाही दिली होती.

पावसाने गोवा सरकारला खोटे ठरविले. पणजीचे आमदार तथा मंत्री बाबूश मोन्सेरात व महापौर रोहित मोन्सेरात यांनी अगोदरच आपले हात वर केले आहेत. आमदार किंवा मंत्री दैनंदिन कामांवर लक्ष देत नाही, देखरेख करण्यासाठी अभियंते व सल्लागार साइटवर असतात, असे बाबूश बोलले होते. पणजी पावसाळ्यात तुंबली तर आपण जबाबदार नसणार, असे मोन्सेरात यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट करून आपला काहीच संबंध नाही, असे भासविले होते. अर्थात सर्व लोकप्रतिनिधींना असे बेजबाबदार वागणे आजच्या काळात शोभून दिसते. बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनीही हात वर केले होते, हे वेगळे सांगायला नको.

मोन्सेरात यांनी सल्लागारांना अधिक स्पष्टपणे दोष दिला होता. पणजीत स्मार्ट सिटीची कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत, सल्लागार कंपनीला सरकारने आठ कोटी रुपये फेडले, असे मोन्सेरात यांनी जाहीरपणे बोलून दाखविले होते. गेल्या २४ मे रोजी मोन्सेरात यांनी केलेली विधाने सर्व प्रसारमाध्यमांनी ठळकपणे प्रसिद्ध केली होती. माझी भूमिका सध्या मे महिन्यात) 'वेट अँड वॉच' अशी आहे. स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत पणजीत जी कामे सुरू आहेत, ती निकृष्ट असल्याचे मोन्सेरात उघडपणे जाहीर करून मोकळे झाले होते. सल्लागार कंपनी ही सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असायला हवी. 

बांधकाम खात्याकडे अनेक अभियंते आहेत. त्या अभियंत्यांमार्फत सल्लागारांच्या कामावर लक्ष ठेवायला हवे, असे बाबूश यांनी सुचविले होते. सल्लागार किंवा अभियंते स्थानिक हवेत, अशा अर्थाचे त्यांचे विधान होते. मुख्यमंत्री सावंत यांनी बाबूश यांच्या भूमिकेची दखल त्यावेळी घेतली होती की नाही कोण जाणे; मात्र सावंत यांनी एक-दोनवेळाच पणजीत फिरून कामांची पाहणी केली होती. त्यांनी संजित रॉड्रिग्ज यांच्याकडे स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून जबाबदारी सोपविली. त्यानंतर कामाला थोडा वेग आला; मात्र तोपर्यंत जून • महिना सुरू झाला होता. पाऊस थोडा उशिराच सुरू झाला. अन्यथा पणजी यापूर्वीच बुडाली असती. आता नागरिकांची व गोवा सरकारचीही कसोटी सुरू झाली आहे. पावसाने जोर धरला आहे पणजीतील दुकानदार, वाहनचालक, नागरिक व पर्यटक गोवा सरकारला दोष देत आहेत; मात्र लोक बुडाले तरी शेवटी लोकप्रतिनिधी मात्र तरत असतात. सरकार तरते, चरते आणि वाचतेही. मग नागरिकांना व दुकानदारांना कितीही त्रास झाला तरी राज्यकर्त्यांना त्याचे काही पडलेले नसते.

पणजी शहराने गेल्या दोन वर्षांत खूप सोसले. सगळीकडे रस्ते वर्षभर फोडून ठेवले होते. सांतइनेज व पुढे टोंकाच्या दिशेने जाणारा रस्ता तर दोन वर्षे फोडलेला होता. काही रस्ते आता ठीक झालेत; पण मध्यंतरी लोकांना, मध्यमवर्गीय व्यापारी, छोटी हॉटेल्स आणि दुकानदारांना झालेला त्रास प्रचंड आहे. लोकांची, विद्यार्थ्यांची खूप गैरसोय झाली. अभियंते किंवा अन्य कुणी फिल्डवर दिसतच नव्हते. दिसायचे ते फक्त मजूर. लोकांनी सातत्याने टीका केल्यानंतर पणजी महापालिका अधूनमधून जागी व्हायची. काही नगरसेवकही मीडियाशी खासगीत बोलून नाराजी व्यक्त करायचे. विद्यमान सरकार संवेदनशील असते तर पणजीत स्मार्ट सिटीची कामे नीट होतील, याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष दिले असते. शेकडो कोटी रुपये आतापर्यंत पणजीत खर्च केल्याचे सांगितले जाते. हा पैसा गेला कुठे? पणजी शहर तर आजदेखील तुंबते व बुडते. वास्तविक अशा विषयांवरून लोकआंदोलने उभी राहायला हवीत. नागरिकांची पर्वा नसलेले काहीजण राज्य करतात तेव्हा बुडणेच लोकांच्या नशिबी येते. सरकार मात्र दर आपत्तीवेळी वाचते.

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी