शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

रेल्वे इंजिनाच्या टपावर बसला अन जीव गमावून बसला; मडगावातील घटना

By सूरज.नाईकपवार | Updated: November 30, 2023 20:28 IST

रेल्वे इंजिनाच्या टपावर बसला अन जीव गमावून बसण्याची एक दुदैवी घटना गोव्याच्या मडगाव येथील  कोकण रेल्वे स्थानकावर घडली.

सूरज नाईकपवार मडगाव: रेल्वे इंजिनाच्या टपावर बसला अन जीव गमावून बसण्याची एक दुदैवी घटना गोव्याच्या मडगाव येथील  कोकण रेल्वे स्थानकावर घडली. १६ नोव्हेंबरला मयताने वरील धाडस केले होते. निर्मोद लगून (२९) असे मयताचे नाव असून , तो मूळ झारखंड राज्यातील आहे. विद्युत वाहिनांचा स्पर्श झाल्याने तो होरपळला होता. नंतर त्याला गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले होते. गेले पंधरा दिवस तो मृत्युझी झुंजत होता शेवटी त्याची प्राणज्योत मालवली.

निर्मोद हा झारखंडहून १६ नोव्हेंबरला गोव्यात कामासाठी आला होता. तो येथील गांधी मार्केट येथे रहात होता अशी माहिती कोकण रेल्वे पोलिसांनी दिली. तो वैफल्यग्रस्तही होता. त्याने दारुही प्याली होती असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

१६ नोव्हेंबर रोजी वालंकिणी ते वास्को रेल्वेने मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावर थांबा घेतला असता, निर्मोद त्या रेल्वेच्या इंजिन डब्याच्या टपावर चढला. त्याला विद्युत वाहिन्याचा स्पर्श झाल्याने तो गंभीर जखमी झाला. नंतर त्याला तातडीने उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले.संबधित घटनेची माहिती पोलिसांनी नंतर त्याच्या कुटुंबियालाही कळविली होती. मृतदेह संबधितांच्या स्वाधीन केला आहे.

अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ए. गोम्स पुढील तपास करीत आहेत.