शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

गोव्यात हॉटेलांच्या निम्म्या खोल्या रिकामीच, चुकीच्या मार्केटिंग धोरणाला दोष 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 20:46 IST

नाताळ, नववर्ष तोंडावर असताना पर्यटकांनी मात्र गोव्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते.

पणजी - नाताळ, नववर्ष तोंडावर असताना पर्यटकांनी मात्र गोव्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. हॉटेलांमधील निम्म्या खोल्या रिकामी असल्याचा दावा व्यावसायिक करत असून पर्यटन खात्याच्या चुकीचे मार्केटिंग धोरण याला कारण असल्याची व्यावसायिकांची तक्रार आहे. 

टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशन आॅफ गोवा (टीटीएजी)चे अध्यक्ष सावियो मेशियस म्हणाले की, ‘चार्टर विमानांची संख्या निम्म्याने घटलेली आहे. रशियन पर्यटकही कमी झाले आहेत. पर्यटन खात्याचे मार्केटिंग धोरण बरोबर नाही. हाय एंड पर्यटकांनी चक्क पाठ फिरवली आहे. मोठ्या हॉटेलांमध्ये ५0 टक्क्यांहून अधिक खोल्या रिकामी आहेत. राज्यात घरे, अपार्टमेंट बेकायदेशीररित्या पर्यटकांना देण्याचे प्रमाण वाढत आहे. पोर्टलवर जाहिरात करुन घरे भाड्याने दिली जातात. तेथे योग्य त्या सुविधा नसतात त्यामुळे पर्यटक नंतर पाठ फिरवतात. विदेशी पाहुण्यांची संख्या घटण्यामागे आर्थिक कारणही आहे. 

अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले की, ‘केवळ विदेशीच नव्हे, तर देशी पाहुण्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. निम्म्याही खोल्या भरलेल्या नाहीत त्यामुळे दरही जुनेच ठेवले आहेत. नाताळ, नववर्षाला पुठील काळात एक दोन दिवस पर्यटक वाढतील परंतु डिसेंबर संपूर्ण महिना पर्यटकांविना गेला त्यामुळे व्यावसायिक संकटात आहेत.’ धोंड यांनीही सरकारच्या मार्केटिंग धोरणालाच दोष दिला.                       

कळंगुटचे आमदार उपसभापती मायकल लोबो म्हणाले की, ‘रशिया, इंग्लंड  तसेच अन्य राष्ट्रांमधून  विदेशी पर्यटकांना घेऊन येणाºया चार्टर विमानांची संख्या निम्म्याने घटली आहे. विद्यमान  पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनाच याबाबतीत दोष देऊन चालणार नाही. गेल्या सहा वर्षात  राज्य सरकारचे पर्यटन विषयक मार्केटिंग धोरण कोलमडले आहे. चुकीच्या धोरणामुळे गोव्याला दर्जेदार पर्यटक मिळू शकलेले नाहीत.

टॅग्स :hotelहॉटेलgoaगोवाtourismपर्यटन