शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान; लोकोत्सवातून गोमंतकीय संस्कृती जतनाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2024 10:44 IST

आमोणे-पैंगीण येथील लोकोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना इदाते हे बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती आहेत तर तवडकर गोव्यात विधानसभेचे सभापती आहेत ही आदिवासी समाजाला अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन भटके विमुक्त जाती जमातीचे आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते यांनी केले.

आमोणे-पैंगीण येथील लोकोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना इदाते हे बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, आमदार कार्लस फेरेरा, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, ट्रायफेडचे रामसिंग राठवा, बलराम शिक्षण संस्थेचे अंकुश गावकर, सरपंच सविता तवडकर, वृंदा वेळीप, निशा च्यारी, सेजल गावकर, उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर, मुख्याधिकारी रमेश गावकर, भाजपा मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, अशोक गावकर, जानू तवडकर, एससी, एसटी कमिशनर दीपक करमळकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप आदी उपस्थित होते.

इदाते म्हणाले की, 'केवळ भाषणबाजीने परिवर्तन होत नाही, कृती हवी. नरेंद्र मोदींमुळे देशात परिवर्तन होत आहे.. देशाला १९४७ला नव्हे तर खऱ्या अर्थाने २०१४ला स्वातंत्र्य झाला. देशात १९१८ पासून धर्म व संस्कृती संपुष्टात आणण्याचे षड्यंत्र सुरू आहे. मात्र, संस्कृती रक्षणाचे कार्य तवडकर करीत आहेत. त्यामुळे त्यांना लोकनायक व लोकनेते म्हटले पाहिजे. सामान्य व्यक्तींना मोठे करण्याची त्यांची तळमळ ही वाखाणण्यासारखी आहे.'

आमदार दिगंबर कामत म्हणाले की, 'शिक्षणामुळे क्रांती घडते व ती क्रांती घडविण्याचे कार्य त्यांनी केली आहे. जे अशक्य ते शक्य करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. काणकोण तालुका देशातील मॉडेल तालुका व्हावा, अशी अपेक्षा आहे. राम सिंग राठवा यांनी जीवनात पुढे पाऊल मारण्याची प्रेरणा लोकोत्सवातून मिळते.'

व्यासपीठावरील मान्यवरांकडून श्रद्धा शिरोडकर, आश्विनी गावकर, लीना कुट्टीकर, विन्सी काढूश, महेंद्र नाईक, उगम जांबावलीकर, जयंत मिरिंगकर, शलाका कांबळे, उषा मयेकर, जयेश सिंगबाळ, विनायक नाईक यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कोकणी मराठी साहित्य सृजनोत्सवाच्या व्यासपीठावर कविता आमोणकर यांचा गगनभरारी पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. साहित्यिक कविता आमोणकर, जयंती नाईक, डॉ. प्रमदा देसाई, प्रकाश तळवडेकर, उदय म्हांबरे, दत्ताराम पाडलोस्कर, सोनाली पेडणेकर, दिलीप बोरकर, कालिका बापट, कमलाकर म्हाळशी यांचा सत्कार करण्यात आला. कल्पिता नाईक यांनी सूत्रसंचालन केले. दामोदर वेळीप यांनी आभार मानले.

संस्कृतीची कास हवी 

सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले की, गावचा विकास करण्याकरिता संस्कृतीची कास धरणे गरजेचे आहे. गावपण, माणुसकी सांभाळायला हवी. समृद्ध काणकोणचे मी स्वप्न पाहिले आहे. त्याकरिताच माझी धावपळ सुरू आहे. बीच संस्कृती ही गोमंतकीय संस्कृती नव्हे. गोव्याची खरी संस्कृती ग्रामीण भागात आहे. 

टॅग्स :goaगोवा