शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
3
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
4
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
5
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
6
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
7
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
8
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
9
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
10
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
11
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
12
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
13
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
14
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
15
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
16
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
17
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
18
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
19
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
20
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान; लोकोत्सवातून गोमंतकीय संस्कृती जतनाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2024 10:44 IST

आमोणे-पैंगीण येथील लोकोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना इदाते हे बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती आहेत तर तवडकर गोव्यात विधानसभेचे सभापती आहेत ही आदिवासी समाजाला अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन भटके विमुक्त जाती जमातीचे आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते यांनी केले.

आमोणे-पैंगीण येथील लोकोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना इदाते हे बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, आमदार कार्लस फेरेरा, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, ट्रायफेडचे रामसिंग राठवा, बलराम शिक्षण संस्थेचे अंकुश गावकर, सरपंच सविता तवडकर, वृंदा वेळीप, निशा च्यारी, सेजल गावकर, उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर, मुख्याधिकारी रमेश गावकर, भाजपा मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, अशोक गावकर, जानू तवडकर, एससी, एसटी कमिशनर दीपक करमळकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप आदी उपस्थित होते.

इदाते म्हणाले की, 'केवळ भाषणबाजीने परिवर्तन होत नाही, कृती हवी. नरेंद्र मोदींमुळे देशात परिवर्तन होत आहे.. देशाला १९४७ला नव्हे तर खऱ्या अर्थाने २०१४ला स्वातंत्र्य झाला. देशात १९१८ पासून धर्म व संस्कृती संपुष्टात आणण्याचे षड्यंत्र सुरू आहे. मात्र, संस्कृती रक्षणाचे कार्य तवडकर करीत आहेत. त्यामुळे त्यांना लोकनायक व लोकनेते म्हटले पाहिजे. सामान्य व्यक्तींना मोठे करण्याची त्यांची तळमळ ही वाखाणण्यासारखी आहे.'

आमदार दिगंबर कामत म्हणाले की, 'शिक्षणामुळे क्रांती घडते व ती क्रांती घडविण्याचे कार्य त्यांनी केली आहे. जे अशक्य ते शक्य करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. काणकोण तालुका देशातील मॉडेल तालुका व्हावा, अशी अपेक्षा आहे. राम सिंग राठवा यांनी जीवनात पुढे पाऊल मारण्याची प्रेरणा लोकोत्सवातून मिळते.'

व्यासपीठावरील मान्यवरांकडून श्रद्धा शिरोडकर, आश्विनी गावकर, लीना कुट्टीकर, विन्सी काढूश, महेंद्र नाईक, उगम जांबावलीकर, जयंत मिरिंगकर, शलाका कांबळे, उषा मयेकर, जयेश सिंगबाळ, विनायक नाईक यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कोकणी मराठी साहित्य सृजनोत्सवाच्या व्यासपीठावर कविता आमोणकर यांचा गगनभरारी पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. साहित्यिक कविता आमोणकर, जयंती नाईक, डॉ. प्रमदा देसाई, प्रकाश तळवडेकर, उदय म्हांबरे, दत्ताराम पाडलोस्कर, सोनाली पेडणेकर, दिलीप बोरकर, कालिका बापट, कमलाकर म्हाळशी यांचा सत्कार करण्यात आला. कल्पिता नाईक यांनी सूत्रसंचालन केले. दामोदर वेळीप यांनी आभार मानले.

संस्कृतीची कास हवी 

सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले की, गावचा विकास करण्याकरिता संस्कृतीची कास धरणे गरजेचे आहे. गावपण, माणुसकी सांभाळायला हवी. समृद्ध काणकोणचे मी स्वप्न पाहिले आहे. त्याकरिताच माझी धावपळ सुरू आहे. बीच संस्कृती ही गोमंतकीय संस्कृती नव्हे. गोव्याची खरी संस्कृती ग्रामीण भागात आहे. 

टॅग्स :goaगोवा