शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान; लोकोत्सवातून गोमंतकीय संस्कृती जतनाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2024 10:44 IST

आमोणे-पैंगीण येथील लोकोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना इदाते हे बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती आहेत तर तवडकर गोव्यात विधानसभेचे सभापती आहेत ही आदिवासी समाजाला अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन भटके विमुक्त जाती जमातीचे आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते यांनी केले.

आमोणे-पैंगीण येथील लोकोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना इदाते हे बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, आमदार कार्लस फेरेरा, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, ट्रायफेडचे रामसिंग राठवा, बलराम शिक्षण संस्थेचे अंकुश गावकर, सरपंच सविता तवडकर, वृंदा वेळीप, निशा च्यारी, सेजल गावकर, उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर, मुख्याधिकारी रमेश गावकर, भाजपा मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, अशोक गावकर, जानू तवडकर, एससी, एसटी कमिशनर दीपक करमळकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप आदी उपस्थित होते.

इदाते म्हणाले की, 'केवळ भाषणबाजीने परिवर्तन होत नाही, कृती हवी. नरेंद्र मोदींमुळे देशात परिवर्तन होत आहे.. देशाला १९४७ला नव्हे तर खऱ्या अर्थाने २०१४ला स्वातंत्र्य झाला. देशात १९१८ पासून धर्म व संस्कृती संपुष्टात आणण्याचे षड्यंत्र सुरू आहे. मात्र, संस्कृती रक्षणाचे कार्य तवडकर करीत आहेत. त्यामुळे त्यांना लोकनायक व लोकनेते म्हटले पाहिजे. सामान्य व्यक्तींना मोठे करण्याची त्यांची तळमळ ही वाखाणण्यासारखी आहे.'

आमदार दिगंबर कामत म्हणाले की, 'शिक्षणामुळे क्रांती घडते व ती क्रांती घडविण्याचे कार्य त्यांनी केली आहे. जे अशक्य ते शक्य करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. काणकोण तालुका देशातील मॉडेल तालुका व्हावा, अशी अपेक्षा आहे. राम सिंग राठवा यांनी जीवनात पुढे पाऊल मारण्याची प्रेरणा लोकोत्सवातून मिळते.'

व्यासपीठावरील मान्यवरांकडून श्रद्धा शिरोडकर, आश्विनी गावकर, लीना कुट्टीकर, विन्सी काढूश, महेंद्र नाईक, उगम जांबावलीकर, जयंत मिरिंगकर, शलाका कांबळे, उषा मयेकर, जयेश सिंगबाळ, विनायक नाईक यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कोकणी मराठी साहित्य सृजनोत्सवाच्या व्यासपीठावर कविता आमोणकर यांचा गगनभरारी पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. साहित्यिक कविता आमोणकर, जयंती नाईक, डॉ. प्रमदा देसाई, प्रकाश तळवडेकर, उदय म्हांबरे, दत्ताराम पाडलोस्कर, सोनाली पेडणेकर, दिलीप बोरकर, कालिका बापट, कमलाकर म्हाळशी यांचा सत्कार करण्यात आला. कल्पिता नाईक यांनी सूत्रसंचालन केले. दामोदर वेळीप यांनी आभार मानले.

संस्कृतीची कास हवी 

सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले की, गावचा विकास करण्याकरिता संस्कृतीची कास धरणे गरजेचे आहे. गावपण, माणुसकी सांभाळायला हवी. समृद्ध काणकोणचे मी स्वप्न पाहिले आहे. त्याकरिताच माझी धावपळ सुरू आहे. बीच संस्कृती ही गोमंतकीय संस्कृती नव्हे. गोव्याची खरी संस्कृती ग्रामीण भागात आहे. 

टॅग्स :goaगोवा