शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान; लोकोत्सवातून गोमंतकीय संस्कृती जतनाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2024 10:44 IST

आमोणे-पैंगीण येथील लोकोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना इदाते हे बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण : देशाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. आदिवासी समाजाच्या द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती आहेत तर तवडकर गोव्यात विधानसभेचे सभापती आहेत ही आदिवासी समाजाला अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन भटके विमुक्त जाती जमातीचे आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते यांनी केले.

आमोणे-पैंगीण येथील लोकोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना इदाते हे बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर, पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, आमदार कार्लस फेरेरा, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, ट्रायफेडचे रामसिंग राठवा, बलराम शिक्षण संस्थेचे अंकुश गावकर, सरपंच सविता तवडकर, वृंदा वेळीप, निशा च्यारी, सेजल गावकर, उपजिल्हाधिकारी मधू नार्वेकर, मुख्याधिकारी रमेश गावकर, भाजपा मंडळ अध्यक्ष विशाल देसाई, अशोक गावकर, जानू तवडकर, एससी, एसटी कमिशनर दीपक करमळकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप आदी उपस्थित होते.

इदाते म्हणाले की, 'केवळ भाषणबाजीने परिवर्तन होत नाही, कृती हवी. नरेंद्र मोदींमुळे देशात परिवर्तन होत आहे.. देशाला १९४७ला नव्हे तर खऱ्या अर्थाने २०१४ला स्वातंत्र्य झाला. देशात १९१८ पासून धर्म व संस्कृती संपुष्टात आणण्याचे षड्यंत्र सुरू आहे. मात्र, संस्कृती रक्षणाचे कार्य तवडकर करीत आहेत. त्यामुळे त्यांना लोकनायक व लोकनेते म्हटले पाहिजे. सामान्य व्यक्तींना मोठे करण्याची त्यांची तळमळ ही वाखाणण्यासारखी आहे.'

आमदार दिगंबर कामत म्हणाले की, 'शिक्षणामुळे क्रांती घडते व ती क्रांती घडविण्याचे कार्य त्यांनी केली आहे. जे अशक्य ते शक्य करण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. काणकोण तालुका देशातील मॉडेल तालुका व्हावा, अशी अपेक्षा आहे. राम सिंग राठवा यांनी जीवनात पुढे पाऊल मारण्याची प्रेरणा लोकोत्सवातून मिळते.'

व्यासपीठावरील मान्यवरांकडून श्रद्धा शिरोडकर, आश्विनी गावकर, लीना कुट्टीकर, विन्सी काढूश, महेंद्र नाईक, उगम जांबावलीकर, जयंत मिरिंगकर, शलाका कांबळे, उषा मयेकर, जयेश सिंगबाळ, विनायक नाईक यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कोकणी मराठी साहित्य सृजनोत्सवाच्या व्यासपीठावर कविता आमोणकर यांचा गगनभरारी पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. साहित्यिक कविता आमोणकर, जयंती नाईक, डॉ. प्रमदा देसाई, प्रकाश तळवडेकर, उदय म्हांबरे, दत्ताराम पाडलोस्कर, सोनाली पेडणेकर, दिलीप बोरकर, कालिका बापट, कमलाकर म्हाळशी यांचा सत्कार करण्यात आला. कल्पिता नाईक यांनी सूत्रसंचालन केले. दामोदर वेळीप यांनी आभार मानले.

संस्कृतीची कास हवी 

सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले की, गावचा विकास करण्याकरिता संस्कृतीची कास धरणे गरजेचे आहे. गावपण, माणुसकी सांभाळायला हवी. समृद्ध काणकोणचे मी स्वप्न पाहिले आहे. त्याकरिताच माझी धावपळ सुरू आहे. बीच संस्कृती ही गोमंतकीय संस्कृती नव्हे. गोव्याची खरी संस्कृती ग्रामीण भागात आहे. 

टॅग्स :goaगोवा