शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कृषीकार्डचे पैसे सरकार देईल: मुख्यमंत्री सावंत, निधीची तरतूद, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 11:23 IST

कृषी खात्यावरील चर्चेवेळी ते बोलत होते.

पणजी: कृषी कार्ड अंतर्गत मिळालेली रक्कम आता शेतकन्यांना परत करण्याची गरज नाही. शेतकऱ्यांना परतावा देण्याची गरज नाही. राज्य सरकारने ४.५ कोटींची तरतूद केली असून सदर रक्कम केंद्र सरकारकडे जमा केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

कृषी खात्यावरील चर्चेवेळी ते बोलत होते. कृषी कार्ड अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत मिळतात. मात्र, सध्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जात आहे. आता राज्य सरकारने त्यासाठी निधीची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पैसे जमा करू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएस म्हणाले की, राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी कार्ड अंतर्गत मिळालेली रक्कम परत केली आहे. काही शेतकन्यांनी तर तीन ते चार वर्षांची रक्कम मिळून एकूण २२ हजार रुपयेही परत केले आहेत. मात्र, आता राज्य सरकारने निधीची तरतूद केल्याने त्यांचे आभार आहेत. शेतकन्यांसाठी ही दिलासादायक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

कुणबी साडी उत्पादनांना प्रोत्साहन हवे

सरकारने सेंद्रिय शेतीला चालना द्यावी, शेतीकडे जास्तीच जास्त लोकांनी यळावे, यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. कृषी खात्याने शेती वापराच्या दृष्टीने आवश्यक असे ड्रोन घ्यावेत. दरम्यान राज्यातील हस्तकला उत्पादकांना विशेष करून कुणबी साडीच्या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी ठोस पावले उचलावीत. कुणबी साडीला युरोपात मोठी बाजारपेठ असल्याचेही व्हिएस यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाPramod Sawantप्रमोद सावंत