शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

सत्तरीच्या विकासाला सरकारची साथ: मुख्यमंत्री सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2024 10:46 IST

पर्येत विविध प्रकल्पांची पायाभरणी; दिव्या राणेंच्या कामाचे कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष आमदार दिव्या राणे यांनी सत्तरीचा चौफेर विकास केला आहे. त्यांना सरकारतर्फे पूर्ण सहकार्य करण्यात आले असून यापुढेही सत्तरीतील विकसकामे गतीने मार्गी लागतील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

सोमवारी सत्तरी तालुक्यात विविध प्रकल्पांचा शुभारंभ तसेच पायाभरणी मोर्ले कॉलनी येथील कॉम्युनिटी सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार डॉ. दिव्या राणे यांच्यासह सत्तरीतील सर्व जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य उपस्थित होते. सत्तरीतील पाणी समस्या दूर व्हावी यासाठी १५ एमएलडी पाणी प्रकल्प कामाचा शुभारंभ, गोव्यातील प्रसिद्धी केरी सत्तरी आजोबा देवस्थानचे नुतनीकरण व सौदर्गीकरण, ११ के. व्ही भूमीगत वीज वाहिन्यांचा शुभारंभ तसेच अंजुणे धरण परिसरात पर्यटन विकास, अशी विविध कामे होणार आहेत. हे सर्व मंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या पुढाकारामुळे शक्य झाले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आमदार डॉ. दिव्या राणे यांनी मुख्यमंत्री तसेच वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ नुसार देशात विकास होत आहे. त्यांचा विकास चार स्तंभावर आधारीत आहेत. हे चार स्तंभ म्हणजे, नारीशक्ती, युवाशक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चारही क्षेत्रात सरकारने मोठा विकास केला आहे. लहान गोव्यात केंद्र सरकारने ३३ हजार कोटी रस्ते बांधकामावर खर्च केले आहेत. पर्यटन खात्याच्या माध्यमातून अंजुणे धरण येथे पीपीपी तत्त्वावर वेलनेस टुरिझम रिसॉर्टची पायाभरणी केली आहे, यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. सत्तरीप्रमाणे अनेक लोकांना रोजगार मिळणार आहे.

'सुविधांपासून कोणीच वंचित राहणार नाही'

यावेळी मंत्री विश्वजीत राणे म्हणाले, की सत्तरीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही धडपडत आहोत. सतरीतील ग्रामीण भागातील लोकांना सर्व साधन सुविधा मिळाव्यात यासाठी हे विविध प्रकल्प आणले आहेत. त्यांना मंजुरी मिळण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. सत्तरीतील पाणी, वीज समस्या लवकरच दूर होणार आहे. कोणीच मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत