शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

सरकार महीलांप्रती संवेदनशील नाही, महिला सशक्तीकरण कागदावरच: आमदार वीरेश बोरकर

By समीर नाईक | Updated: December 5, 2023 16:22 IST

सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी मंगळवारी दोनापावला जेटी येथे व्यवसाय करणार्‍या गोमंतकीयांची भेट घेउन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पणजी: सरकार व्यवसाय क्षेत्राच्या माध्यमातून ‘स्वयंपूर्ण गोवा, आत्मनिर्भर भारत’चा नारा देतात मात्र प्रत्यक्षात असे काहीच होताना दिसत नाही. गेली ५० वर्षे दोनापावला जेटी येथे गोमंतकीय व्यवसाय करत आहे, पण जेटीचे खासगीकरण करून या व्यावसायिकांच्या पोटाच्या आड येण्याचे कारस्थान सरकार करत आहे. त्यांनी हे लगेच थांबवावे व येथील विक्रेत्यांना न्यान मिळवून द्यावा, असे मत आमदार विरेश बोरकर यांनी व्यक्त केले. 

सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी मंगळवारी दोनापावला जेटी येथे व्यवसाय करणार्‍या गोमंतकीयांची भेट घेउन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. 

सरकार सर्वच कंत्राटे आणि कामे खाजगी कंपनींना देउ लागले आहे. राज्यातील महत्वाचे वारसास्थळे, पर्यटन खात्याची मालमत्ता देखील भाडे तत्वावार दिली जाते. असे झाले तर भविष्यात गोमंतकीयांना व्यवसाय कसा मिळणार असा प्रश्‍न उपस्थित होतो. सरकार गोमंतकीयांना बाजूला सारुन केवळ इतर राज्यातून आलेल्यांनाच व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करत आहे हे आजवरच्या सरकरच्या भूमिकांवरून स्पष्ट होते, असे बोरकर यांनी यावेळी सांगितले.

सदर जेटीचे सुशोभीकरण करण्यात आल्यानंतर येथे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. सुशोभीकरण देखील नावापुरतीच आहे. जेतीवरील पुतळ्याची दुर्दशा झाली आहे. सुशोभीकरणाच्या नावावरून फक्त पैश्याची उधळपट्टी केली आहे. पूर्वी गोमंतकीय व्यवसायिक जेटीवर आपली दालने उभारुन व्यावसाय करत होते तर त्यांना तेथून बाहेर काढल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. सरकारने त्यांना पूर्वीच्याच जागी दालने उभारण्याचे दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे असेही बोरकर यांनी यावेळी सांगितले.

व्यावसायिकांमध्ये ८० टक्के विधवा महिला 

दोनापावल जेटीवरील विक्रेत्यांमधील ८ टक्के विधवा महिला आहेत. सरकारने त्यांच्याप्रती संवेदशील राहणे आवश्यक होते, पण सरकार त्यांच्याशी अत्यंत असंवेदनशील राहिले आहे. एकीकडे सरकार महिलांना आरक्षण देण्याच्या गोष्टी करतात आणि विधवा महिलांना सहकार्य करण्याचे बोलतात, पण जर सरकार याबाबत गंभीर असले असते तर आज गोमंतकीय महिलांची ही स्थिती झाली नसती. असे आमदार विरेश बोरकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा