शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सरकारला सोमवारपर्यंत मुदत; तीव्र आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2024 08:31 IST

न्यायालयीन आयोग नेमा.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नोकऱ्या विक्रीप्रकरणी चौकशीसाठी येत्या सोमवारपर्यंत हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली आयोग न नेमल्यास राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसने दिला आहे. आम्ही वाड्यावाड्यावर, घराघरात पोहचून भाजप सरकारचे कारनामे उघडे पाड्डू, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पाटकर म्हणाले की, फसवणुकीच्या रोज नवनवीन घटना समोर येत असून, त्यातून भाजप मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांचे संबंधही दिसून येत आहेत. अटकेतील महिलांचे संबंध भाजपकडे आहेत. एक महिला तर पदाधिकारीही आहे, परंतु आता भाजपकडून इन्कार केला जात असून, ती पूर्वी सदस्य होती, आता नाही, असा बचाव घेतला जात आहे.

ते म्हणाले की, आज युवकांना सरकारी नोकऱ्या पारदर्शक पद्धतीने भरल्या जातील का, याबाबत विश्वास नाही. त्यामुळेच अशी फसवणूक होत आहे. राज्य कर्मचारी निवड आयोग नावापुरता आहे. पैसे घेऊन नोकऱ्या विकता याव्यात, यासाठी कायद्यात वरचेवर दुरुस्त्या करून पळवाटा शोधल्या जात आहेत. मंत्री, आमदार युवकांच्या भावनांशी खेळत आहेत. आम्ही पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली. मुख्यमंत्री, मंत्री, भाजपचे पदाधिकारी गुंतले आहेत, त्यामुळे एसआयटी नेमून चौकशी करा, परंतु ही मागणी पूर्ण झाली नाही. हायकोर्टाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी करा, अशी मागणी सरकारकडे केली. तीदेखील पूर्ण झालेली नाही. आता मडगावात एका शाळेत नोकर भरतीसाठी खोटे शैक्षणिक दाखल्याचे प्रकरण उघडकीस आले असून, भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षावर संशय आहे. हे सरकार गोमंतकीय युवकांच्या भवितव्याशी खेळत आहे.

पाटकर म्हणाले की, बेरोजगारीबाबत गोवा राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. गोमंतकीयांचे पारंपरिक धंदे सरकारने संपवले. सनबर्न, जुगार आणून गोव्याची संस्कृती, अस्मिता नष्ट केली. धारगळ डेल्टा कॅसिनोने केलेले डोंगरफोडीच्या ठिकाणी सनबर्न आणला जात आहे. दरम्यान, ज्यांनी फसवणूक केली त्यांची मालमत्ता जप्त करुन पैसे परत करण्याची तरतूद कोणत्या कायद्यात आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, असा सवाल करुन आसगावच्या प्रकरणातही पीडित कुटुंबाला घर बांधून देतो, असे अशाच प्रकारचे खोटे आश्वासन सावंत यांनी दिले होते, असे पाटकर म्हणाले.

पाटकर म्हणाले की, मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी डॉक्टरच्या पदासाठी कोणीतरी ३० लाख मागितले, असा आरोप केला आहे. आलेक्स व त्या डॉक्टराला आणा व चौकशी करा. अन्य एका आमदाराने मोन्सेरात यांचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे त्यांचीही चौकशी करा, असे पाटकर म्हणाले.

आवाज उठवणार : युरी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, बेरोजगारी दूर करण्यासाठी सरकारकडे कोणत्याही ठोस योजना नाहीत. नीती आयोग तसेच इतरांनी बेरोजगारीच्या बाबतीत सरकारला वेळोवेळी फटकारले आहे. न्यायालयीन चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री गप्प आहेत. आगामी अधिवेशनात यावर आवाज उठवू.

अधिकारी का थांबले? 

दरम्यान, मागील पत्रकार परिषदेवेळी दाखवलेली अपॉइंटमेंट लेटर बोगस आहेत, हे मी प्रथमच स्पष्ट केले होते. अशा प्रकारची खोटी लेटर सर्वत्र फिरत होती तर अधिकाऱ्यांनी आधीच तक्रार का केली नाही? आम्ही पत्रकार परिषद घेईपर्यंत का थांबले?, असा प्रश्न पाटकर यांनी केला.

 

टॅग्स :goaगोवाfraudधोकेबाजीState Governmentराज्य सरकार