शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

गोवा सरकारला राज्यपालांकडून पुन्हा दणका, नवे राजभवन नकोच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 15:01 IST

राजभवनच्या विषयावरून राज्यपालांनी अतिशय स्पष्ट व रोखठोक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांना नवा धक्का दिला आहे.

पणजी - राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी यापूर्वी कोविड व्यवस्थापनाच्या विषयावरून सरकारचे कान पिळल्यानंतर आता नवे राजभवन बांधण्याच्या प्रश्नावरून सरकारच्या पाठीत धपाटा घातला आहे. राज्याची आर्थिक स्थिती अगोदर विचारात घ्या, नव्या राजभवनची गरजच नाही, असे राज्यपालांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लिहिलेल्या पत्रत म्हटले आहे. तसेच सद्यस्थितीत नवे राजभवन बांधणो हा अविवेकी विचार असल्याचेही राज्यपालांनी नमूद करून एक प्रकारे सरकारचे वैचारिक व हरणच केले आहे.गेल्याच पंधरवडय़ात मुख्यमंत्री सावंत व राज्यपाल मलिक हे कोविड व्यवस्थापन व वास्को लॉकडावनच्या विषयावरून आमनेसामने आले होते. आपण जे मिडियाविषयी बोललोच नव्हतो ते आपण बोललो असे मुख्यमंत्री सावंत यांनी पत्रकारांना सांगितल्याचे राज्यपालांनी नमूद करून कोणताच सुसंस्कृत नेता असे दुस-याच्या तोंडी शब्द घालणार नाही असे राज्यपाल म्हणाले होते. त्यानंतर आता राजभवनच्या विषयावरून राज्यपालांनी अतिशय स्पष्ट व रोखठोक भूमिका घेत मुख्यमंत्र्यांना नवा धक्का दिला आहे.27 जुलै रोजी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले व नव्या राजभवनची गरज नाही असे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी काबो येथे नवे राजभवन बांधण्याचा प्रस्ताव चर्चेत आणला होता. समाजाच्या विविध स्तरांवरून त्यावर जोरदार टीका सुरू झाली. त्याची गंभीर दखल राज्यपाल मलिक यांनी घेतली व राज्याच्या आर्थिक स्थितीची जाणीव राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आहे. नवे राजभवन बांधण्याचा सरकारचा विचार अतार्किक तथा असंमजसपणाचा व अविवेकी आहे असे राज्यपालानी नमूद केले आहे. अगोदरच राज्य आर्थिकदृष्टय़ा वेगळ्य़ा स्थितीतून जात असताना राज्यावर आणखी मोठा आर्थिक बोजा टाकला जाऊ नये. कोणतेही नवे मोठे बांधकाम हे नवा आर्थिक बोजा टाकणारे ठरेल याची जाणीव राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली. तसे प्रसिद्धी पत्र राज्यपालांच्या सचिवांनी शनिवारी सर्व प्रसार माध्यमांना पाठवले आहे.राज्यपाल म्हणून माङो स्वत:चे काम करणो हे खूप मर्यादित आहे व मला नव्या राजभवन इमारतीची गरज नाही असे राज्यपालांनी सावंत सरकारला सुनावले आहे. जेव्हा कधी राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल तेव्हाच प्रकल्प उभा करता येईल व तो देखील राजभवनच्या सध्याच्या संकुलातच असेही राज्यपालांनी म्हटले असल्याचे सचिव रुपेश कुमार ठाकुर यांच्याकडून स्पष्ट केले गेले आहे.सध्या राजभवन बांधण्याचा प्रस्तावच नाही असे समजावे असे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. नवे राजभवन बांधण्याचा सरकारचा विचार असंमजसपणाचा व अविवेकी आहे. अगोदरच राज्य आर्थिकदृष्टय़ा पेचात असताना त्यात नवे राजभवन बांधणो हे आणखी मोठा बोजा टाकणारे ठरेल. मला नव्या राजभवन इमारतीची गरज नाही.- राज्यपाल सत्यपाल मलिक

 

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार