शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

राज्यपाल मृदुला सिन्हा 1 नोव्हेंबरला गोव्याचा घेणार निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 13:20 IST

मृदुला सिन्हा यांची 31 ऑगस्ट 2014 रोजी गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती.

पणजी : राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांचा गोव्यातील कालावधी संपल्याने येत्या शुक्रवारी 1 नोव्हेंबर रोजी त्या गोव्याचा निरोप घेणार आहेत.

मृदुला सिन्हा यांची 31 ऑगस्ट 2014 रोजी गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. गोव्याच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल ठरल्या. त्यांच्यापूर्वी गोव्याला कधीच कुणी महिला राज्यपाल म्हणून लाभल्या नव्हत्या. गोव्याचे राजभवन हे अत्यंत चांगल्या जागेवर वसलेले आहे. त्या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व आहे. राजभवनमधून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसून येते. सिन्हा यांचा त्यांच्या पतीसह या राजभवनवरील काळ चांगल्या प्रकारे गेला. राजभवनला माहिती हक्क कायद्याच्या कक्षेत आणा, अशा प्रकारची मागणी घेऊन आरटीआय कार्यकर्ते आयरिश रॉड्रीग्ज यांनी दीर्घकाळ संघर्ष केला पण राजभवनने ही मागणी कधी मान्य केली नाही.

सिन्हा यांचा कार्यकाळ गेल्या ऑगस्ट महिन्यात संपला होता. केंद्र सरकारने त्यांची अन्यत्र नियुक्ती केली नाही. त्यांच्या जागी गोव्याचे राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपतींनी मलिक यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. येत्या 1 रोजी श्रीमती सिन्हा गोव्याचा निरोप घेत असल्याने त्याच दिवशी मलिक गोव्यात दाखल होतील. मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांची तिथून गोव्यात गेल्या 25 रोजी बदली झाली.

सिन्हा यांच्यापूर्वी बी. व्ही. वांच्छू हे दोन वर्षे गोव्याचे राज्यपाल होते. डॉ. एस. एस. सिंधू, नागालँडचे माजी मुख्यमंत्री एस. सी. जमीर, महम्मद फजल, केदारनाथ साहनी, जे एफ आर जेकॉब आदी एकूण तिस राज्यपालांनी गोव्यात आतार्पयत सेवा बजावली. पोतरुगीजांच्या राजवटीतून डिसेंबर 1961 मध्ये गोवा मुक्त झाल्यानंतर मेजर जनरल के. पी. कँडेथ यांनी पहिले मिलिटरी राज्यपाल म्हणून गोव्यात काम केले. कँडेथ हे जून 1962 र्पयत गोव्यात होते.

टॅग्स :goaगोवा