शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांकडून सरकारचे वाभाडे

By admin | Updated: July 23, 2014 00:49 IST

पणजी : रखडलेला प्रादेशिक आराखडा, तर्कसंगत नसलेले गुंतवणूक धोरण, खास विवाह कायदा, बेकायदा खाण व्यवसायातून झालेली लूट वसूल करण्यास सरकारने चालविलेली टाळाटाळ

पणजी : रखडलेला प्रादेशिक आराखडा, तर्कसंगत नसलेले गुंतवणूक धोरण, खास विवाह कायदा, बेकायदा खाण व्यवसायातून झालेली लूट वसूल करण्यास सरकारने चालविलेली टाळाटाळ या प्रश्नांवर मंगळवारी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेच्यावेळी विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठविली. काँग्रेस व अपक्ष आमदारांनी विविध प्रश्नांवरून सरकारला घेरत पुरते वाभाडे काढले. विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे म्हणाले की, राज्य कर्जाच्या खाईत आहे. अशावेळी केवळ गुलाबी चित्र निर्माण करणारे गुंतवणूक धोरण सरकारने जाहीर केले आहे. पाच वर्षांत ५० हजार नोकऱ्या आणि २५ हजार रुपयांची गुंतवणूक आणण्याचे जाहीर केले होते. सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली. किती गुंतवणूक आली आणि किती नोकऱ्या दिल्या, हे जनतेसाठी जाहीर करा. गोव्यात उद्योग नाहीत. त्यामुळे नोकऱ्यांसाठी बाहेर जावे लागत आहे. कृषी उद्योगाला चालना दिली जात नाही. डेअरी सुरू करायची असेल, तर ते मोठे कष्टप्रद काम आहे. शेतकऱ्यांनी लागवड सोडलेली आहे. खास विवाह कायदा आणल्याने राणे यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रादेशिक आराखडा अस्तित्वात नसल्याने सखल भाग, शेतजमिनीमध्ये बेकायदेशीररीत्या भराव टाकून पंचायतीच्या आशीर्वादाने बांधकामे चालली आहेत, असे राणे म्हणाले. सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी : सरदेसाई अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरल्याचा आरोप केला. महसुली तूट प्रचंड वाढली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. खाणबंदीमुळे सरकारला झळ पोचलेली नाही; कारण नूतनीकरण शुल्क व ई-लिलावातून पैसे आलेले आहेत; परंतु सरकारने ते दाखवलेले नाही. मुख्य म्हणजे राज्य सरकारने खाणबंदी मागे घेतल्याचा आदेश अजून काढलेला नाही. त्यामुळे डिसेंबरपर्यंत खाणी सुरू होणार असे जे सांगितले जाते, त्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असे सरदेसाई म्हणाले. (प्रतिनिधी) आणखी वृत्त/पान २, हॅलो गोवा १