शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

खाणींच्या प्रश्नावर सरकार उघडे पडले, गोव्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 18:59 IST

खाणींच्या प्रश्नावर राज्यातील भाजप सरकार उघडे पडले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

पणजी : खाणींच्या प्रश्नावर राज्यातील भाजप सरकार उघडे पडले आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. पर्रीकर व त्यांच्या कंपूने २00७ सालापासून राज्यातील खाणी बंद करण्याची मोहीम सुरू केली, त्यानंतर २0१२ साली ती प्रत्यक्षात आणून बहुजन समाजाच्या उत्पन्नाचे साधन हिरावून घेतले, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.केंद्रातही भाजपचीच सत्ता असल्याने गोव्यातील बंद खाणी पूर्ववत चालू करणे राज्य सरकारसाठी कठीण बाब नव्हती. वटहुकूमाच्या माध्यमातून हे शक्य होते परंतु केंद्रात बहुमत असलेल्या भाजपने त्याकडे दुर्लक्ष केले. आतापर्यंत पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी खाण अवलंबितांची दिशाभूलच केली. मुख्यमंत्री, खासदार, सभापती यांनी दिल्लीवाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटी घेतल्या आणि राज्यातील खाणी सुरु होतील, असे आश्वासक चित्र निर्माण केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल देण्यासाठी पळवाट काढली जाईल, असे सांगितले गेले. ही निव्वळ लोकांची दिशाभूलच होती.गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना दिलेले निवेदनही हा देखील एक फार्स होता, अशी टीका चोडणकर यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा आदेश उचलून धरूनच गोव्यातील खाणी विनाविलंब पूर्ववत सुरू केल्या जाव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. केंद्रीय कायदामंत्री, आयुषमंत्री तसेच गोव्याच्या दोन्ही खासदारांनी लोकांचा विश्वासाात केल्याबद्दल तसेच अकार्यक्षमतेबद्दल राजीनामे द्यावेत, असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे. २0१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने गोमंतकीय जनतेची दिशाभूल केली. आताही लोकांना मूर्ख बनविले. भाजपने खाणींच्या प्रश्नावर वटहुकूम आणि कायदेशीर तोडगा यातील फरक लोकांना आता समजावून सांगावा, असे उपरोधिक आवाहन चोडणकर यांनी केले. प्रत्येक निवडणुकीत खाणी पुढील मोसमात चालू होतील, असे आश्वासन देऊन भाजपने लोकांना फसविल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळा