शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

लोकायुक्तांचा अहवाल नाकारण्याच्या दिशेने सरकारची पाऊले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 11:39 IST

काही वर्षापूर्वी लोकायुक्तांनी किनारपट्टी स्वच्छता कामाच्या कंत्रटाविषयीही चौकशी करून अहवाल दिला होता

पणजी : राज्यातील खनिज लीज नूतनीकरणप्रश्नी नोव्हेंबर 2014 ते जानेवारी 2015 या कालावधीत सरकारी पातळीवर भ्रष्टाचार व गुन्हेगारी स्वरुपाचे कटकारस्थान झाले असल्याचा ठपका लोकायुक्त पी. के. मिश्र यांनी ठेवून तसा अहवाल दिल्यानंतर सत्ताधारी भाजपमध्ये चलबिचल सुरू झाली. मात्र गोवा सरकार हा अहवाल स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाही. सरकारची पाऊले अहवाल नाकारण्याच्या दिशेने पडू लागल्याची माहिती बुधवारी मिळाली.

राज्यातील 88 खनिज लिजांचे नूतनीकरण केले गेले तेव्हाही गोव्यात भाजप सरकार अधिकारावर होते. प्रथम स्व. मनोहर पर्रिकर हे मुख्यमंत्री तर मग लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री बनले. या दोघांकडेही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात खाण खाते होते. लिजांच्या नुतनीकरणाची सुरुवात पर्रिकर यांनी केली याची नोंद लोकायुक्तांनी घेतली आहे. पार्सेकर यांच्या काळात अत्यंत घाईघाईत खाण व्यवसायिकांना लिजांचे नूतनीकरण करून दिले गेले. चोवीस तासांत 31 लिजांचे नूतनीकरण करताना एरव्ही धूळ खात पडलेल्या फाईल्स अचानक चोवीस तासांत हाताळून लिज नूतनीकरण केले गेले, असे लोकायुक्तांनी म्हटले आहे. पार्सेकर, माजी खाण संचालक प्रसन्ना आचार्य व माजी खाण सचिव पवनकुमार सेन यांच्यावर ठपका आला आहे. आचार्य व सेन यांना सेवेत ठेवलेच जाऊ नये अशी लोकायुक्तांची भूमिका आहे. मात्र हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी अजून सेवेत आहेत. त्यापैकी सेन हे दिल्लीत राष्ट्रपतींच्या सचिवालयात काम करत आहेत.

गोवा सरकारच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने माजी मुख्यमंत्री पार्सेकर व दोघा अधिका:यांविरुद्ध एफआयआर नोंद करावा, असा आदेश लोकायुक्तांनी दिला पण अजून एफआयआर नोंद झालेला नाही. विद्यमान सरकार लोकायुक्तांच्या अहवालावर खूष नाही व सरकार कोणतीही मोठी कृती करू इच्छीत नाही,अशी माहिती सचिवालयातील सुत्रंकडून मिळाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लोकमतने प्रतिक्रिया विचारली असता, अहवाल स्वीकारायचा की नाकारयचा हे आम्ही अभ्यास करून ठरवू, असे त्यांनी सांगितले. लोकायुक्त संस्थेने एखादी शिफारस केल्यानंतर ती स्वीकारची की नाही हे सरकार ठरवत असते. आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री दिल्लीहून गोव्यात परतल्यानंतर म्हणाले. माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी तर लिज नूतनीकरणाचा निर्णय हा सामुहिक होता, मंत्रिमंडळाचा होता असे सांगितले.

दरम्यान, काही वर्षापूर्वी लोकायुक्तांनी किनारपट्टी स्वच्छता कामाच्या कंत्रटाविषयीही चौकशी करून अहवाल दिला होता. लोकायुक्तांनी घोटाळा दाखवून देत माजी पर्यटन मंत्र्यांवर ठपका ठेवला होता. त्यावेळी र्पीकर सरकार अधिकारावर होते. र्पीकर सरकारनेही त्यावेळी लोकायुक्तांच्या अहवालाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली होती.

टॅग्स :goaगोवा