शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

लोकायुक्तांचा अहवाल नाकारण्याच्या दिशेने सरकारची पाऊले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 11:39 IST

काही वर्षापूर्वी लोकायुक्तांनी किनारपट्टी स्वच्छता कामाच्या कंत्रटाविषयीही चौकशी करून अहवाल दिला होता

पणजी : राज्यातील खनिज लीज नूतनीकरणप्रश्नी नोव्हेंबर 2014 ते जानेवारी 2015 या कालावधीत सरकारी पातळीवर भ्रष्टाचार व गुन्हेगारी स्वरुपाचे कटकारस्थान झाले असल्याचा ठपका लोकायुक्त पी. के. मिश्र यांनी ठेवून तसा अहवाल दिल्यानंतर सत्ताधारी भाजपमध्ये चलबिचल सुरू झाली. मात्र गोवा सरकार हा अहवाल स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाही. सरकारची पाऊले अहवाल नाकारण्याच्या दिशेने पडू लागल्याची माहिती बुधवारी मिळाली.

राज्यातील 88 खनिज लिजांचे नूतनीकरण केले गेले तेव्हाही गोव्यात भाजप सरकार अधिकारावर होते. प्रथम स्व. मनोहर पर्रिकर हे मुख्यमंत्री तर मग लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री बनले. या दोघांकडेही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात खाण खाते होते. लिजांच्या नुतनीकरणाची सुरुवात पर्रिकर यांनी केली याची नोंद लोकायुक्तांनी घेतली आहे. पार्सेकर यांच्या काळात अत्यंत घाईघाईत खाण व्यवसायिकांना लिजांचे नूतनीकरण करून दिले गेले. चोवीस तासांत 31 लिजांचे नूतनीकरण करताना एरव्ही धूळ खात पडलेल्या फाईल्स अचानक चोवीस तासांत हाताळून लिज नूतनीकरण केले गेले, असे लोकायुक्तांनी म्हटले आहे. पार्सेकर, माजी खाण संचालक प्रसन्ना आचार्य व माजी खाण सचिव पवनकुमार सेन यांच्यावर ठपका आला आहे. आचार्य व सेन यांना सेवेत ठेवलेच जाऊ नये अशी लोकायुक्तांची भूमिका आहे. मात्र हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी अजून सेवेत आहेत. त्यापैकी सेन हे दिल्लीत राष्ट्रपतींच्या सचिवालयात काम करत आहेत.

गोवा सरकारच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने माजी मुख्यमंत्री पार्सेकर व दोघा अधिका:यांविरुद्ध एफआयआर नोंद करावा, असा आदेश लोकायुक्तांनी दिला पण अजून एफआयआर नोंद झालेला नाही. विद्यमान सरकार लोकायुक्तांच्या अहवालावर खूष नाही व सरकार कोणतीही मोठी कृती करू इच्छीत नाही,अशी माहिती सचिवालयातील सुत्रंकडून मिळाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लोकमतने प्रतिक्रिया विचारली असता, अहवाल स्वीकारायचा की नाकारयचा हे आम्ही अभ्यास करून ठरवू, असे त्यांनी सांगितले. लोकायुक्त संस्थेने एखादी शिफारस केल्यानंतर ती स्वीकारची की नाही हे सरकार ठरवत असते. आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री दिल्लीहून गोव्यात परतल्यानंतर म्हणाले. माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी तर लिज नूतनीकरणाचा निर्णय हा सामुहिक होता, मंत्रिमंडळाचा होता असे सांगितले.

दरम्यान, काही वर्षापूर्वी लोकायुक्तांनी किनारपट्टी स्वच्छता कामाच्या कंत्रटाविषयीही चौकशी करून अहवाल दिला होता. लोकायुक्तांनी घोटाळा दाखवून देत माजी पर्यटन मंत्र्यांवर ठपका ठेवला होता. त्यावेळी र्पीकर सरकार अधिकारावर होते. र्पीकर सरकारनेही त्यावेळी लोकायुक्तांच्या अहवालाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली होती.

टॅग्स :goaगोवा