शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
2
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
3
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
4
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
5
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
6
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
7
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
8
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
9
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
12
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
13
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
14
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
15
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
18
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
19
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
20
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
Daily Top 2Weekly Top 5

लोकायुक्तांचा अहवाल नाकारण्याच्या दिशेने सरकारची पाऊले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 11:39 IST

काही वर्षापूर्वी लोकायुक्तांनी किनारपट्टी स्वच्छता कामाच्या कंत्रटाविषयीही चौकशी करून अहवाल दिला होता

पणजी : राज्यातील खनिज लीज नूतनीकरणप्रश्नी नोव्हेंबर 2014 ते जानेवारी 2015 या कालावधीत सरकारी पातळीवर भ्रष्टाचार व गुन्हेगारी स्वरुपाचे कटकारस्थान झाले असल्याचा ठपका लोकायुक्त पी. के. मिश्र यांनी ठेवून तसा अहवाल दिल्यानंतर सत्ताधारी भाजपमध्ये चलबिचल सुरू झाली. मात्र गोवा सरकार हा अहवाल स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाही. सरकारची पाऊले अहवाल नाकारण्याच्या दिशेने पडू लागल्याची माहिती बुधवारी मिळाली.

राज्यातील 88 खनिज लिजांचे नूतनीकरण केले गेले तेव्हाही गोव्यात भाजप सरकार अधिकारावर होते. प्रथम स्व. मनोहर पर्रिकर हे मुख्यमंत्री तर मग लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्री बनले. या दोघांकडेही त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात खाण खाते होते. लिजांच्या नुतनीकरणाची सुरुवात पर्रिकर यांनी केली याची नोंद लोकायुक्तांनी घेतली आहे. पार्सेकर यांच्या काळात अत्यंत घाईघाईत खाण व्यवसायिकांना लिजांचे नूतनीकरण करून दिले गेले. चोवीस तासांत 31 लिजांचे नूतनीकरण करताना एरव्ही धूळ खात पडलेल्या फाईल्स अचानक चोवीस तासांत हाताळून लिज नूतनीकरण केले गेले, असे लोकायुक्तांनी म्हटले आहे. पार्सेकर, माजी खाण संचालक प्रसन्ना आचार्य व माजी खाण सचिव पवनकुमार सेन यांच्यावर ठपका आला आहे. आचार्य व सेन यांना सेवेत ठेवलेच जाऊ नये अशी लोकायुक्तांची भूमिका आहे. मात्र हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी अजून सेवेत आहेत. त्यापैकी सेन हे दिल्लीत राष्ट्रपतींच्या सचिवालयात काम करत आहेत.

गोवा सरकारच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने माजी मुख्यमंत्री पार्सेकर व दोघा अधिका:यांविरुद्ध एफआयआर नोंद करावा, असा आदेश लोकायुक्तांनी दिला पण अजून एफआयआर नोंद झालेला नाही. विद्यमान सरकार लोकायुक्तांच्या अहवालावर खूष नाही व सरकार कोणतीही मोठी कृती करू इच्छीत नाही,अशी माहिती सचिवालयातील सुत्रंकडून मिळाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लोकमतने प्रतिक्रिया विचारली असता, अहवाल स्वीकारायचा की नाकारयचा हे आम्ही अभ्यास करून ठरवू, असे त्यांनी सांगितले. लोकायुक्त संस्थेने एखादी शिफारस केल्यानंतर ती स्वीकारची की नाही हे सरकार ठरवत असते. आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री दिल्लीहून गोव्यात परतल्यानंतर म्हणाले. माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी तर लिज नूतनीकरणाचा निर्णय हा सामुहिक होता, मंत्रिमंडळाचा होता असे सांगितले.

दरम्यान, काही वर्षापूर्वी लोकायुक्तांनी किनारपट्टी स्वच्छता कामाच्या कंत्रटाविषयीही चौकशी करून अहवाल दिला होता. लोकायुक्तांनी घोटाळा दाखवून देत माजी पर्यटन मंत्र्यांवर ठपका ठेवला होता. त्यावेळी र्पीकर सरकार अधिकारावर होते. र्पीकर सरकारनेही त्यावेळी लोकायुक्तांच्या अहवालाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली होती.

टॅग्स :goaगोवा