शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने खाणबंदी उठवावी

By admin | Updated: December 2, 2014 00:56 IST

होंडा : बंद असलेल्या खाणी सुरू करण्यासंदर्भात सरकारने येत्या १० डिसेंबरपूर्वी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा खाण अवलंबितांकडून होणाऱ्या तीव्र आंदोलनाला सामोरे जाण्याची

होंडा : बंद असलेल्या खाणी सुरू करण्यासंदर्भात सरकारने येत्या १० डिसेंबरपूर्वी आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा खाण अवलंबितांकडून होणाऱ्या तीव्र आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. खाण पट्ट्यातील लोकांची सहानुभूती घेऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारला जनेतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडत चालला आहे़ खाण अवलंबितांना न्याय मिळवून देण्यासाठी चाळीसही आमदारांनी सामूहिक राजीनामे देऊन घटनात्मक पेचप्रसंग निर्माण करावा. यासाठी खाण पट्ट्यातील आमदारांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उत्तर व दक्षिण गोवा ट्रकमालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी होंडा येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केले. उत्तर गोवा ट्रकमालक संघटनेचे पदाधिकारी संदीप परब यांनी सांगितले की, सप्टेंबर २०१२ मध्ये भाजप सरकारने खाणी बंद करण्याचा आदेश काढला़ एप्रिल २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी उठवली़ याला सुमारे ९ महिन्यांचा कालावधी उलटला आहे़ तरी भाजप सरकारने घातलेली बंदी अजून उठविण्यात आलेली नाही. खाण पट्ट्यातील आमदारही याबाबत गप्प आहेत, याचा अर्थ आम्ही काय काढावा, असा प्रश्न त्यांनी केला. बंदी उठविल्यानंतर आतापर्यंत सरकारने कासवगतीने कार्य करून फक्त १३ खाणींना लिजेस दिल्या आहेत; पण प्रत्यक्ष खाण व्यवसाय कधी सुरू होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. सरकारने ट्रकमालकांना पॅकेज देऊन आजपर्यंत झुलवत ठेवले़ त्यात काहीजणांना गेल्या सहा महिन्यांपासून पॅकेज मिळाले नाही. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी पॅकेजची रक्कम त्वरित बँकेत जमा करून ट्रकमालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परब यांनी केली. सरकारकडून सध्या ई-लिलावाद्वारे खाणमालाची वाहतूक सुरू आहे; पण तेथे गोंधळाची स्थिती आहे़ वाहतूक करताना मोजक्याच लोकांचे हित जपले जात आहे़ त्यामुळे या वाहतुकीचा खाण अवलिंबातांना किती फायदा झाला, हे सरकारने जाहीर करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. सरकार तसेच खाण पट्ट्यातील आमदारांनी १० डिसेंबरपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करवी. अन्यथा, खाण अवलंबित संघटना खाण पट्ट्यातील गावागावात जागृती घडवून तीव्र आंदोलन उभारेल, असा इशरा या वेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेस दक्षिण गोवा ट्रकमालक संघाचे अध्यक्ष प्रकाश राऊत देसाई, संदीप परब, सुरेश देसाई, बालाजी देसाई, यशवंत देसाई, शाम गावकर, लक्ष्मण देसाई, प्रकाश गावस, सद्गुरू आग्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते़ (वार्ताहर)