शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

सरकारने धिरयोंना मान्यता द्यावी

By admin | Updated: September 22, 2015 00:50 IST

हरमल : गणेशचतुर्थीचे औचित्य साधून भोम पठारावर धिरयोचे यशस्वी आयोजन झाल्याने उत्साहित झालेल्या धिरयोप्रेमींनी सोमवारी हरमल येथे एकत्र येत सरकारने धिरयोंना कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी केली.

हरमल : गणेशचतुर्थीचे औचित्य साधून भोम पठारावर धिरयोचे यशस्वी आयोजन झाल्याने उत्साहित झालेल्या धिरयोप्रेमींनी सोमवारी हरमल येथे एकत्र येत सरकारने धिरयोंना कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी केली. सुमारे सहा हजारांच्या संख्येने जमलेल्या धिरयोप्रेमींसमोर बोलताना सुखानंद नाईक व इतरांनी सांगितले की, बैलांच्या झुंजी अभावाने होतात. झुंजी लागल्या की बैलाचे कसब ध्यानी येते. त्यातून पाहणाऱ्याची रुची वाढते. यात कायदेशीर-बेकायदेशीर असे काही नसून शेतकऱ्यांच्या शेतात देखील झुंजीचे प्रकार वारंवार घडत असतात. त्या वेळी कोणी या झुंजी कायदेशीर की बेकायदेशीर हे पाहत नाही. मग बैलांच्या झुंजी भरवण्यास आडकाठी का, असा प्रश्न या वेळी करण्यात आला. धिरयो हा प्रकार मुळीच हिंस्र प्रकारात मोडणारा नाही. उलट झुंजीवेळी बैलाला जखम झाल्यास लगेच औषधोपचार केले जातात, असे समीर वायंगणकर यांनी सांगितले. पाळीव-वन्य मुक्या प्राण्यांबाबत सहानुभूती बाळगणे योग्य असून भटक्या गुरांत झुंजी लागतात त्या वेळेस कोणती संघटना आवाज उठवित नाही, मग बैलांच्या झुजी आयोजनास विरोध का, असा प्रश्न उपस्थित करत पारंपरिक सणावेळी धिरयोंना मान्यता द्यावी, अशी मागणी संतोष कोरकणकर यांनी केली. धिरयो हा लोकमान्यता मिळालेला थरारपट असून याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गोव्यातील धिरयोंची परंपरा जिवंत ठेवावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. सरकारने धिरयोंना मान्यता दिल्यास सट्टा प्रकारावर आपोआप आळाबंद येईल. तसेच सरकारला महसूल प्राप्त होईल. तसेच देश-विदेशातील पर्यटकांना आकृष्ट करण्यास धिरयो महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. या वेळी अमित शेटगावकर (मोरजी), आलेसिन रॉड्रिग्स, पात्रिस फर्नांडिस, सुदन वायंगणकर, चंद्रकांत विर्नोडकर, राजन नानोस्कर, फ्रान्सिस फर्नांडिस, सुरेंद्र नाईक, लॉरेन्स डिसोझा, स्वप्नील नाईक, हरिश्चंद्र नाईक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)