शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
6
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
7
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
8
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
10
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
11
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
12
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
14
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
15
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
16
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
17
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
18
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
19
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

सरकारने धिरयोंना मान्यता द्यावी

By admin | Updated: September 22, 2015 00:50 IST

हरमल : गणेशचतुर्थीचे औचित्य साधून भोम पठारावर धिरयोचे यशस्वी आयोजन झाल्याने उत्साहित झालेल्या धिरयोप्रेमींनी सोमवारी हरमल येथे एकत्र येत सरकारने धिरयोंना कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी केली.

हरमल : गणेशचतुर्थीचे औचित्य साधून भोम पठारावर धिरयोचे यशस्वी आयोजन झाल्याने उत्साहित झालेल्या धिरयोप्रेमींनी सोमवारी हरमल येथे एकत्र येत सरकारने धिरयोंना कायदेशीर मान्यता द्यावी, अशी मागणी केली. सुमारे सहा हजारांच्या संख्येने जमलेल्या धिरयोप्रेमींसमोर बोलताना सुखानंद नाईक व इतरांनी सांगितले की, बैलांच्या झुंजी अभावाने होतात. झुंजी लागल्या की बैलाचे कसब ध्यानी येते. त्यातून पाहणाऱ्याची रुची वाढते. यात कायदेशीर-बेकायदेशीर असे काही नसून शेतकऱ्यांच्या शेतात देखील झुंजीचे प्रकार वारंवार घडत असतात. त्या वेळी कोणी या झुंजी कायदेशीर की बेकायदेशीर हे पाहत नाही. मग बैलांच्या झुंजी भरवण्यास आडकाठी का, असा प्रश्न या वेळी करण्यात आला. धिरयो हा प्रकार मुळीच हिंस्र प्रकारात मोडणारा नाही. उलट झुंजीवेळी बैलाला जखम झाल्यास लगेच औषधोपचार केले जातात, असे समीर वायंगणकर यांनी सांगितले. पाळीव-वन्य मुक्या प्राण्यांबाबत सहानुभूती बाळगणे योग्य असून भटक्या गुरांत झुंजी लागतात त्या वेळेस कोणती संघटना आवाज उठवित नाही, मग बैलांच्या झुजी आयोजनास विरोध का, असा प्रश्न उपस्थित करत पारंपरिक सणावेळी धिरयोंना मान्यता द्यावी, अशी मागणी संतोष कोरकणकर यांनी केली. धिरयो हा लोकमान्यता मिळालेला थरारपट असून याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गोव्यातील धिरयोंची परंपरा जिवंत ठेवावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. सरकारने धिरयोंना मान्यता दिल्यास सट्टा प्रकारावर आपोआप आळाबंद येईल. तसेच सरकारला महसूल प्राप्त होईल. तसेच देश-विदेशातील पर्यटकांना आकृष्ट करण्यास धिरयो महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली. या वेळी अमित शेटगावकर (मोरजी), आलेसिन रॉड्रिग्स, पात्रिस फर्नांडिस, सुदन वायंगणकर, चंद्रकांत विर्नोडकर, राजन नानोस्कर, फ्रान्सिस फर्नांडिस, सुरेंद्र नाईक, लॉरेन्स डिसोझा, स्वप्नील नाईक, हरिश्चंद्र नाईक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)