शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

नाफ्ता प्रकरणी सरकार गंभीरच: मायकल लोबो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 22:45 IST

नाफ्ता जहाज प्रकरणी सरकार गंभीरच आहे, कारण जहाजात नाफ्ता असणं आणि ते जहाज समुद्रात रुतून बसणं ही गंभीर गोष्ट आहे.

पणजी : नाफ्ता जहाज प्रकरणी सरकार गंभीरच आहे, कारण जहाजात नाफ्ता असणं आणि ते जहाज समुद्रात रुतून बसणं ही गंभीर गोष्ट आहे. सरकारला याची जाणीव असल्याने आम्ही गांभीर्याने विषय हाताळत आहोत, असे बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी शनिवारी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.

गेल्या 24 ऑक्टोबरला दोनापावल येथील खोल समुद्रात जहाज रुतून बसले. त्याविषयी मंत्री लोबो म्हणाले, की जहाजातील नाफ्ता काढण्याची जबाबदारी ही डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंगची आहे. डीजी शिपिंगने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. डीजी शिपिंगकडून निविदा जारी करून कंत्रटदाराला काम सोपविले जाईल. नाफ्ता काढण्याचे काम खासगी कंत्रटदार करील. त्यात गोवा सरकारला काही भूमिका नाही पण जहाजावर दुर्घटना घडू नये म्हणून देखरेख ठेवण्याचे काम गोवा सरकारची यंत्रणा करत आहे.

लोबो म्हणाले, की जहाजाला कदाचित पुढे कधी इजा पोहचली तरी, नाफ्ता बाहेर येऊ शकत नाही. कारण नाफ्ता थेट जहाजात नाही. जहाजात कंटेनर आहे व त्यात नाफ्ता आहे. जहाजातून तेल गळतीही अजून झालेली  नाही. तेल गळती झालीच तर ते तेल समुद्रात सगळीकडे पसरू नये म्हणून आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली आहे. आपण स्वत: तसेच बंदर कप्तानांनीही जहाजाला भेट देऊन उपाययोजनांची पाहणी केली आहे. तेल गळती झाली तरी तेल तिथेच जहाजाच्या बाजूला राहिल अशी व्यवस्था केली गेली आहे.

मंत्री लोबो म्हणाले, की जहाजातून नाफ्ता काढण्याबाबत प्रचंड घाईगडबड आम्ही केली नाही. आम्ही जर घाईघाईत पाऊले उचलली असती तर सरकारच्या हेतूविषयी शंका घेणारे काही घटक तयार झाले असते. गोव्यात नाफ्ताचे जहाज यायला नको होते. मुरगाव बंदर त्यासाठी उत्तरदायी ठरते.

टॅग्स :goaगोवा