शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

म्हादईप्रश्नी नाताळपर्यंत सरकारला मुदत, अन्यथा लोक कायदाही हाती घेतील : वेलिंगकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 20:21 IST

सरकारने येत्या 25 पर्यंत करून घेतले नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर लोक कृती करतील, असा इशारा म्हादई बचाव आंदोलनाने शुक्रवारी दिला.

पणजी : म्हादई नदीचे पाणी कर्नाटकात वळविण्यासाठी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला जे पत्र दिले आहे, ते पत्र मागे घेण्याचे काम सरकारने येत्या 25 पर्यंत करून घेतले नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर लोक कृती करतील, असा इशारा म्हादई बचाव आंदोलनाने शुक्रवारी दिला. येत्या 12 जानेवारी रोजी विवेकानंद जयंतीदिनी राज्यातील 181 एनजीओंचा महामेळावा होईल व त्यावेळी पुढील कृती कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे आंदोलनाने स्पष्ट केले.अरविंद भाटीकर, सुभाष वेलिंगकर, एल्विस गोम्स, प्रदीप पाडगावकर व गोविंद देव यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. दहा तालुक्यांमध्ये म्हादई बचाव आंदोलनाने धरणे कार्यक्रम केले. उर्वरित दोन तालुक्यांमध्येही धरणे आंदोलन होईल. त्यानंतर येत्या 10 रोजी पणजीत मिरवणूक आणि मग आझाद मैदानावर सभा होईल. सरकारने म्हादई पाणीप्रश्नी फक्त फसवाफसवी चालवली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे म्हादई नदी म्हणजे स्वत:ची आई असे सांगतात. मात्र याच आईला ते वेन्टीलेटरवर ठेवण्याचे काम करतात. कोणताच पुत्र असे करणार नाही, अशी टीका वेलिंगकर यांनी केली. सावंत हे म्हादई नदीला वाचविण्यासाठीच्या चळवळीत कधीच नव्हते. आपण स्वत: चळवळीत होतो असे ते उगाच सांगतात. त्यांनी पुरावे सादर करावे, असे आव्हान वेलिंगकर यांनी दिले.येत्या 25 पर्यंत जर गोवा सरकार म्हादईप्रश्नी तोडगा काढू शकले नाही, तर लोकांच्या असंतोषाचा उद्रेक होईल. जर कुणी कायदा हाती घेतला तर सरकारच जबाबदार राहील. आम्ही आतापर्यंत संयम ठेवला आहे. मात्र सरकार गोव्याला नष्ट करण्यास निघाले आहे. सध्याच बार्देश, पणजी व अन्यत्र लोकांना नळाद्वारे व्यवस्थित पाणी मिळत नाही. एकदा म्हादईचे पाणी वळवले तर मग 2030 साली गोव्याचे वाळवंट होईल, असे या विषयातले तज्ज्ञ सांगतात. दूधसागर, हरवळे हे धबधबे नष्ट होतील. आम्ही गोवा सरकारचे कुटील राजकारण व कर्नाटकचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे वेलिंगकर म्हणाले.