शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

सरकार जनतेच्या भल्यासाठीच आहे, विकास कामांना विरोध करू नका : मंत्री गोविंद गावडे

By आप्पा बुवा | Updated: April 11, 2023 19:08 IST

फोंडा - प्रत्येक घरी , प्रत्येक दारात रस्ता व घरोघर सुरळीत वीज हे स्वप्न घेऊन मी  प्रियोळच्या राजकारणात शिरलो असून, ...

फोंडा - प्रत्येक घरी , प्रत्येक दारात रस्ता व घरोघर सुरळीत वीज हे स्वप्न घेऊन मी  प्रियोळच्या राजकारणात शिरलो असून, मागच्या सहा वर्षाचा आढावा घेतला असता साधन सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीत आम्ही खूप पुढे येऊन पोहोचलेलो आहोत. दिलेल्या मुदतीच्या आज आम्ही कामे पूर्ण करत आहोत. आम्हाला अजूनही खूप काही करायचे आहे. तेव्हा जनतेने आम्हाला सहकार्य करावे. असे आवाहन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केले.

कंगवाळ टाकी ते वळवई, सावईवेरे इत्यादी भागात पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीचा शुभारंभ मंगळवारी त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी स्थानिक सरपंच शोभा पेरणी, वेलिंगच्या सरपंच हर्षा गावडे, वळवईचे सरपंच विनायक वेंगुर्लेकर, बेतकी खांडोळाचे सरपंच जयेश नाईक, जिल्हा पंचायत सदस्य प्रिया चारी,श्रमेश भोसले, माजी सरपंच सत्यवान शिलकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते .

यावेळी पुढे बोलताना गोविंद गावडे म्हणाले की 'आमचे सरकार सर्वांच्या भल्याचा विचार करत आहे . प्रत्येक घरात पाणी असणे आज गरजेचे आहे. परंतु जलवाहिन्या टाकताना काही लोक मुद्दाम राजकारण करतात. जागा देताना सहकार्य करत नाहीत. एक इवलीशी जल वाहिनी तुमच्या जमिनीतून गेल्यास तुमचे काही नुकसान होणार नाही. परंतु तुमच्या औदर्यातून उंचवट्यावर असलेल्या डोंगराळ भागातील लोकांना पाणी मिळेल याचा विचार करा. इथे येताना कोणीच जमीन घेऊन येत नाही. जमीन हि नैसर्गिक आहे. आम्ही फक्त त्या जमिनीचे राखणदार आहोत हा विचार मनात बिंबवा.  सरकार एकटे काही करू शकणार नाही. जिथे गरज असेल तिथे जनतेने सुद्धा तेवढेच सहकार्य करायला हवे.

माझ्या मतदारसंघाचा विचार करता पाण्याच्या अभावी महिलांच्या डोळ्यात अश्रू येत होते. दिवसभर काबाडकष्ट करायचे व रात्री पाण्यासाठी रात्री जागवायच्या यामुळे इथल्या महिला हैराण झाल्या होत्या. पहिल्या दिवसापासून पाण्यासाठी आम्ही मेहनत घेतली. आज ज्या तऱ्हेने काम चालू आहे ते पाहता आगामी काळात इथल्या महिलेच्या डोळ्यात पाणी नसणार तर त्यांच्या घरात पाणी असणार. ह्याची काळजी आम्ही घेतलेली आहे. आमच्या भागात मोठ्या प्रमाणावर बागायती व नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या साधन संपत्तीचा कसा वापर करता येईल यासाठी आराखडे बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पर्यटन स्थळे वाढल्यास लोकांच्या घरात महसूल येईल, त्याचबरोबर रोजगार निर्माण होईल. सत्यवान शिलकर,प्रिया चारी, श्रमेश भोसले यांची सुद्धा यावेळी समयोचित भाषणे झाली.

टॅग्स :goaगोवा