शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
3
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
4
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
5
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
6
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
7
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
8
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
9
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
10
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
11
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
12
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
13
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
14
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
15
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
16
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
17
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
18
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
19
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
20
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

सरकार जनतेच्या भल्यासाठीच आहे, विकास कामांना विरोध करू नका : मंत्री गोविंद गावडे

By आप्पा बुवा | Updated: April 11, 2023 19:08 IST

फोंडा - प्रत्येक घरी , प्रत्येक दारात रस्ता व घरोघर सुरळीत वीज हे स्वप्न घेऊन मी  प्रियोळच्या राजकारणात शिरलो असून, ...

फोंडा - प्रत्येक घरी , प्रत्येक दारात रस्ता व घरोघर सुरळीत वीज हे स्वप्न घेऊन मी  प्रियोळच्या राजकारणात शिरलो असून, मागच्या सहा वर्षाचा आढावा घेतला असता साधन सुविधा निर्माण करण्याच्या बाबतीत आम्ही खूप पुढे येऊन पोहोचलेलो आहोत. दिलेल्या मुदतीच्या आज आम्ही कामे पूर्ण करत आहोत. आम्हाला अजूनही खूप काही करायचे आहे. तेव्हा जनतेने आम्हाला सहकार्य करावे. असे आवाहन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केले.

कंगवाळ टाकी ते वळवई, सावईवेरे इत्यादी भागात पाणीपुरवठा करणार्या जलवाहिनीचा शुभारंभ मंगळवारी त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.यावेळी स्थानिक सरपंच शोभा पेरणी, वेलिंगच्या सरपंच हर्षा गावडे, वळवईचे सरपंच विनायक वेंगुर्लेकर, बेतकी खांडोळाचे सरपंच जयेश नाईक, जिल्हा पंचायत सदस्य प्रिया चारी,श्रमेश भोसले, माजी सरपंच सत्यवान शिलकर आदि व्यासपीठावर उपस्थित होते .

यावेळी पुढे बोलताना गोविंद गावडे म्हणाले की 'आमचे सरकार सर्वांच्या भल्याचा विचार करत आहे . प्रत्येक घरात पाणी असणे आज गरजेचे आहे. परंतु जलवाहिन्या टाकताना काही लोक मुद्दाम राजकारण करतात. जागा देताना सहकार्य करत नाहीत. एक इवलीशी जल वाहिनी तुमच्या जमिनीतून गेल्यास तुमचे काही नुकसान होणार नाही. परंतु तुमच्या औदर्यातून उंचवट्यावर असलेल्या डोंगराळ भागातील लोकांना पाणी मिळेल याचा विचार करा. इथे येताना कोणीच जमीन घेऊन येत नाही. जमीन हि नैसर्गिक आहे. आम्ही फक्त त्या जमिनीचे राखणदार आहोत हा विचार मनात बिंबवा.  सरकार एकटे काही करू शकणार नाही. जिथे गरज असेल तिथे जनतेने सुद्धा तेवढेच सहकार्य करायला हवे.

माझ्या मतदारसंघाचा विचार करता पाण्याच्या अभावी महिलांच्या डोळ्यात अश्रू येत होते. दिवसभर काबाडकष्ट करायचे व रात्री पाण्यासाठी रात्री जागवायच्या यामुळे इथल्या महिला हैराण झाल्या होत्या. पहिल्या दिवसापासून पाण्यासाठी आम्ही मेहनत घेतली. आज ज्या तऱ्हेने काम चालू आहे ते पाहता आगामी काळात इथल्या महिलेच्या डोळ्यात पाणी नसणार तर त्यांच्या घरात पाणी असणार. ह्याची काळजी आम्ही घेतलेली आहे. आमच्या भागात मोठ्या प्रमाणावर बागायती व नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पर्यटनाच्या दृष्टीने या साधन संपत्तीचा कसा वापर करता येईल यासाठी आराखडे बांधण्याचे काम सुरू झाले आहे. पर्यटन स्थळे वाढल्यास लोकांच्या घरात महसूल येईल, त्याचबरोबर रोजगार निर्माण होईल. सत्यवान शिलकर,प्रिया चारी, श्रमेश भोसले यांची सुद्धा यावेळी समयोचित भाषणे झाली.

टॅग्स :goaगोवा