शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मुख्यमंत्री आक्रमक, गोव्यात सरकारी कर्मचाऱ्यांची कसोटी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 12:51 IST

कामचुकारपणा करणारे, कार्यालयात वेळेत न येणारे, तसेच लाचखोर अशा सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रथमच कडक धोरण स्वीकारले आहे.

ठळक मुद्देकामचुकारपणा करणारे, कार्यालयात वेळेत न येणारे, तसेच लाचखोर अशा सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रथमच कडक धोरण स्वीकारले आहे.गोव्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या कसोटीचा काळ सुरू झाला आहे.गोव्यातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी दहा वाजले तरी हजर होत नाहीत अशा तक्रारी सरकारकडे येतात.

पणजी - कामचुकारपणा करणारे, कार्यालयात वेळेत न येणारे, तसेच लाचखोर अशा सर्व कर्मचाऱ्यांविरुद्ध मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रथमच कडक धोरण स्वीकारले आहे. यामुळे गोव्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या कसोटीचा काळ सुरू झाला आहे.

गोव्यातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचारी दहा वाजले तरी हजर होत नाहीत अशा तक्रारी सरकारकडे येतात. काहीजण दहा वाजता आले तर अकरा वाजता बाहेर कुठे तरी निघून जातात. परिणामी कामावर विपरित परिणाम होतो. लोकांना साध्या कामांसाठीही सरकारी कार्यालयात खूप फेऱ्या माराव्या लागत आहेत. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेदार, गट विकास अधिकारी, तलाठय़ांची कार्यालये, ग्रामपंचायती, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, वाहतूक, नगर नियोजन आदी अनेक खात्यांची राज्यभर कार्यालये आहेत. तिथे रोज शेकडो गोमंतकीय आपल्या कामांसाठी येतात. 

अनेकदा लोकांचा अपेक्षाभंग होतो. कर्मचारी वेळेत कार्यालयात सापडतच नाहीत. चहा प्यायला गेलेला कर्मचारी कधी पुन्हा वेळेत कार्यालयात येत नाही. तसेच दुपारी जेवायला गेलेले कर्मचारीही कार्यालयात लवकर परतत नाहीत. सायंकाळी पाच वाजताच घरी जाण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये आवराआवर होते. यामुळे प्रशासन संथ गतीने चाललेय अशी टीका केवळ लोकांमधूनच नव्हे तर काही मंत्री, आमदार देखील करतात. याच पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री रोहन खंवटे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री सावंत यांना पत्र लिहीले आहे. काही सरकारी कर्मचारी व अधिकारी सरकारी सेवेत राहूनही स्वत: चे खासगी धंदे करतात व त्यामुळे त्यांना सरकारी काम करण्यासाठी कार्यालयात उपस्थित राहण्यास वेळ मिळत नाही, अशी तक्रार खंवटे यांनी केली. अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सरकारी सेवा सोडून जावी, जेणेकरून नव्या युवा- युवतींना तरी सरकारी सेवेत स्थान मिळेल, असे खंवटे यांनी मुख्यमंत्र्यांना कळवले आहे.

मुख्यमंत्र्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, की कुठल्याच सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला बसून पगार खाता येणार नाही. प्रत्येकाला वेळेत कार्यालयात येऊन काम करावे लागेल. आपण प्रशासन सक्रिय करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. अनेक वर्षे एकाच जागेवर राहिलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी हलविले. त्यांची अन्यत्र बदली करून प्रशासकीय कामांना वेग यायला हवा, असा संदेश दिला आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत