शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या गौप्यस्फोटावर सरकारी मोहोर

By admin | Updated: January 17, 2015 03:02 IST

काकोडा भूसंपादन वाद : ३0 जानेवारीपर्यंत नुकसान भरपाईसाठी येण्याचे आमंत्रण

सुशांत कुंकळयेकर-मडगाव : काकोडा येथे उभारल्या जाणाऱ्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या संपादित जमिनीची नुकसान भरपाई न देताच ही जमीन विज्ञान व तंत्रज्ञान खात्याकडे सुपूर्द केली गेली, या ‘लोकमत’च्या वृत्तावर आता स्वत: केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयानेच शिक्कामोर्तब केले आहे. या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांनी, नुकसान भरपाई घेण्यासाठी ३0 जानेवारीपर्यंत हजर राहावे, असे पत्र केपेचे उपजिल्हाधिकारी शंकर गावकर यांनी जारी केले आहे. ‘काकोड्यातील भूसंपादन वादात’ अशा मथळ्याची गौप्यस्फोट करणारी बातमी ‘लोकमत’ने गुरुवार १५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली होती. या बातमीत, ज्यांची जमीन या प्रकल्पासाठी घेतली गेली आहे, त्यांना नुकसान भरपाई न देता किंवा कुठलीही प्रक्रिया न करता ८ जानेवारी रोजी विज्ञान व तंत्रज्ञान खात्याच्या स्वाधीन केल्याचे म्हटले होते. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारी रोजी मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या व संपादित केलेल्या जमिनीच्या वारस असलेल्या एका महिलेला केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयातून हे पत्र आले आहे. ५ जानेवारी २0१५ रोजी हे पत्र जारी केल्याची तारीख त्यावर नमूद आहे. मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हे पत्र उपजिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत टपालातून (भारतीय टपाल सेवेतून नव्हे) आले आहे. मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोंद विभागात हे पत्र देण्यात आले होते. केपेहून मडगावला अंतर्गत टपालाने हे पत्र पोहोचण्यासाठी १0 दिवसांचा उशिर का झाला, असा प्रश्न या नव्या पत्राने निर्माण केला आहे. त्यामुळे खरोखरच ५ जानेवारीला हे पत्र जारी केले होते का, असा सवाल निर्माण झाला आहे. या नवीन पत्रावरून भूसंपादनाचा वाद अधिकच क्लिष्ट बनला आहे. या पत्राच्या आशयाप्रमाणे, एकूण ८ जणांना नोटिसा जारी केल्या आहेत. त्यात १६,१७,४६४ रुपयांची रक्कम नुकसान भरपाई म्हणून जाहीर केल्याचे म्हटले आहे. ३0 जानेवारीपर्यंत ही नुकसान भरपाई नेण्यासाठी यावे, असा या पत्रातील मजकुराचा आशय आहे. ५ तारखेला जारी केलेल्या या पत्राने गोंधळ अधिकच वाढविलेला आहे. मडगावच्या पत्त्यावर हे पत्र १६ जानेवारीला पोहोचले असले, तरी केपेतच राहाणारे आणखी एक भूधारक विश्वनाथ कुंकळयेकर यांना अजूनही तसे पत्र आलेले नाही. हे पत्र खरेच ५ जानेवारीला जारी केले होते, असे जरी गृहीत धरले, तरी ‘लोकमत’ने दिलेली बातमी शंभर टक्के खरी असल्याचे त्यावरून सिद्ध झाले आहे. या पत्रातला मजकूरच सांगतोय की, ३0 जानेवारीला नुकसान भरपाईचे वितरण होणार आहे. यावरून भूधारकांना अजून नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही, हे सिद्ध होते. त्यामुळे या प्रक्रियेतील बेकायदेशीरपणाही स्पष्ट झाला आहे.