शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

भ्रष्टाचार उघड होणार ह्या भयानेच श्वेतपत्रीका काढण्यास सरकार घाबरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 18:58 IST

काँग्रेसचा आरोप:  जे. पी. नड्डानी गोव्याच्या ज्वलंत प्रश्नावर काय उपाय सुचविले ? 

मडगाव :गोव्यातील डाॅ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील 'डीफेक्टीव्ह' भाजप सरकारला राज्याची अर्थव्यवस्था व कोविड हाताळणी याबद्दल श्वेतपत्रीका काढल्यास सरकारचा भ्रष्टाचार उघड होण्याची भिती आहे व त्या भयानेच मुख्यमंत्री श्वेतपत्र जारी करण्यास घाबरतात असा आरोप 

काॅंग्रेस अध्यक्ष गिरीेश चोडणकर यांनी केला आहे.  सरकार मागील आठ वर्षातील कारभाराची खरी माहिती लोकांसमोर ठेवण्याची हिम्मत दाखवत नाही असे गिरीश चोडणकर पुढे म्हणाले. 

 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोव्यातील भाजप नेत्यांबरोबर दोन दिवसांमागे घेतलेल्या आभासी बैठकीत गोमंतकीयांना भेडसावणारे कोविड हाताळणी, ढासळलेली अर्थव्यवस्था, म्हादई पाणी तंटा, पर्यावरणाला बाधा पोचवणारे प्रकल्प, रेल्वेमार्ग दुपदरीकरण, करमल घाटातील झाडांची कत्तल, ॲानलाईन शिक्षण व्यवस्था, बंद पडलेला खाण व पर्यटन व्यवसाय, बेरोजगारी तसेच गृहआधार, विधवा, दिव्यांग व्यक्तिंचे बंद पडलेले मासिक पेंशन अशा विषयांवर कोणते उपाय सुचविले हे राज्य अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यानी जाहिर करावे अशी मागणी  चोडणकर यानी केली आहे. 

 

भाजप सरकारने गोव्यात सत्तेत आल्यापासुन भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली असुन, त्यामुळेच मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत याना विधानसभेत व बाहेर विरोधकाना तोंड देण्याची हिम्मत नाही. कोविड संकटकाळातही मुख्यमंत्र्यांपासुन सामान्य कार्यकर्त्यापर्यंत सर्वजण जनतेच्या पैशांची लूट करीत आहेत असा आरोप गिरीश चोडणकर यानी केला आहे. जनता मदतीसाठी याचना करीत असताना भाजप केवळ आभासी सभा व उत्सव साजरे करीत आहे.सरकार जाणीवपुर्वक लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असुन, सरकार निवडक मतदारसंघात वाटत असलेल्या आर्सेनिक अल्बम३० गोळ्यांच्या सेवनाचा विपरीत व दुष्परिणाम झाल्यास त्याची जबाबदारी मुख्यमंत्री व केंद्रिय आयुषमंत्री घेणार का या मी विचारलेल्या प्रश्नावर त्या दोघांनी मौन बाळगले आहे व एक प्रकारे माझ्या दाव्याला संमतीच दिली आहे असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

 

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे दोन मजले रिकामे ठेवणे तसेच ऐन संकटकाळात सदर इस्पितळाचा पुर्ण वापर न करणे यावर आरोग्यमंत्र्यांचा छूपा अजेंडा असल्यानेच ते गप्प आहेत.सरकारने त्वरीत स्मृतीस्थळ, प्रकल्पांचे नुतनीकरण असा वायफळ खर्च  व भाजपचा भ्रष्टाचार बंद न केल्यास लोक रस्त्यावर येतील व प्रचंड जनक्षोभाला सरकारला तोंड द्यावे लागेल हे मुख्यमंत्र्यानी ध्यानात ठेवावे असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :congressकाँग्रेस