शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गोमंतकीयांना नाकारलेल्या ‘आप’कडून , राजकीय अस्तित्त्वासाठीच इतरांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 20:00 IST

आम आदमी पक्षाचे पदाधिकारी राजकीय अस्तित्त्व दाखवण्यासाठीच इतरांवर अर्थहीन आरोप करीत असल्याची टीका गोवा फॉरवर्डचे मुख्य प्रवक्ता ट्रोजन डिमेलो यांनी नेली आहे

पणजी : आम आदमी पक्षाचे पदाधिकारी राजकीय अस्तित्त्व दाखवण्यासाठीच इतरांवर अर्थहीन आरोप करीत असल्याची टीका गोवा फॉरवर्डचे मुख्य प्रवक्ता ट्रोजन डिमेलो यांनी नेली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ३९ पैकी ३८ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करुन गोव्यातील मतदारांनी आम आदमी पक्षाला चांगलाच धडा शिकविला आहे. या पक्षाचे गोव्यात कोणतेही अस्तित्त्व राहिलेले नाही, असा दावा त्यांनी केला. 

आम आदमीचे प्रदेश सचिव प्रदीप पाडगांवकर यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्यावर टीका करताना राज्यातील भाजप आघाडी सरकारचा किमान समान कार्यक्रम हा निव्वळ फार्स असल्याची टीका केली होती. बिगरभाजप मतांमध्ये फूट पाडण्यासाठीच आम आदमी पक्षाने गेल्या विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरविले. हे उमेदवार आता आहेत कुठे, असा सवाल करताना डिमेलो यांनी अशी टीका केली की, या पक्षाकडे आता जेमतेम चार ते पाच माणसेच राहिलेली आहेत. 

बिगरभाजप मतांमध्ये फूट पाडण्याचा आम आदमी पक्षाचा डाव होता. गोवा फॉरवर्डने आपले उमेदवार रिंगणात उतरविल्याने तो फसला. आपचे मनसुबे साध्य झाले असते तर भाजपला २१ जागा मिळाल्या असत्या, असे ट्रोजन म्हणाले. 

फातोर्डा मतदारसंघात सरदेसाई यांना शह देण्यासाठी कार्व्हालो नामक उमेदवार रिंगणात उतरविला. हा कार्व्हालो फातोर्डा मतदारसंघातील रहिवाशी नव्हे. बाहेरुन आणून उमेदवार लादला. लोकांनी त्याला नाकारले. आता त्याचे अस्तित्त्वच दिसत नाही. आपचे बहुतांश उमेदवार कुठेच दिसत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. 

विजय सरदेसाई हे लोकांचे जिव्हाळ्याचे विषय घेत आहेत. गोमंतकीयांचे हित जपण्याला ते प्राधान्य देत आहेत. गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण जपण्याची अट घालूनच गोवा फॉरवर्डने भाजपबरोबर आघाडीचे सरकार बनविले आहे. त्यामुळे त्यांच्या हेतूवर कोणी संशय घेण्याचे कारण नाही, असेही ट्रोजन म्हणाले.

टॅग्स :AAPआप