शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

गोव्याचा पाणीपुरवठा खंडित

By admin | Updated: December 28, 2015 01:36 IST

पावसाने यंदा दडी मारल्याने धरणात २ मीटर पाण्याचा तुटवडा झालेला असताना आतापासूनच पाणी जपून वापरा, अशा

विशांत वझे ल्ल डिचोली पावसाने यंदा दडी मारल्याने धरणात २ मीटर पाण्याचा तुटवडा झालेला असताना आतापासूनच पाणी जपून वापरा, अशा सूचना करण्याची वेळ गोव्यावर आली आहे. कारण तिळारीच्या भरंवशावर अवलंबून असलेल्या गोव्याला पुन्हा हादरा बसला आहे. तिळारी धरणापासून ९ किलोमीटर अंतरावर गोव्याकडे येणाऱ्या तिळारी कालव्याला मोठे भगदाड पडल्याने गोव्याला येणारे पाणी बंद करण्यात आल्याने गोव्याला पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वी साटेली-खानयाळे परिसरातील कालवा मोठ्या प्रमाणात खचला असून पाणी वाया जात आहे. येथे मोठे भगदाड पडल्याने दुरुस्तीकाम हाती घेतानाही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच गोव्याकडे येणारे पाणी बंद करून कालव्याची डागडुजी युद्धपातळीवर चालू करण्यात आली आहे. कालवा फुटताच तेथे तात्पुरता दगड-विटांचा थर रचून सिमेंटच्या पिशव्या बांधून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तयारी चालवली असली तरी एकूणच या बाबतीत महाराष्ट्र सरकाराने बेफिकिरी दाखवली असून वर्षातून किमान दोन ते तीन वेळा असे प्रकार घडतच आहेत. त्यामुळे गोव्याला पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तिळारी धरणाचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली कालवा दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी काही दिवस लागण्याची शक्यता असली तरी सोमवारी सायंकाळपर्यंत गोव्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचा दावा धरण अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. २०१४ साली खानयाळे साटेली येथे कालव्याला प्रचंड मोठे भगदाड पडल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत गोव्याचे पाणी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तातडीने जलसंसाधन खात्यामार्फत साळ नदीचे पाणी पंपिंग करण्याची योजना आखून शेती वाचवण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा पाणी बंद झाल्याने हा तिळारीच्या पाण्याचा द्रविडी प्राणायाम गोव्यासाठी तापदायक ठरला आहे. गोव्याने लाखो रुपये खर्च करून धरणग्रस्तांसाठी आर्थिक मदतीसाठी सहकार्य केलेले आहे. विस्थापितांना मदत केली आहे. मात्र, गोव्याला पाण्याची हमी मिळताना दिसत नाही. याबाबत राज्यातील शेतकरी बरेच नाराज आहेत. डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी, तिळारीचे पाणी हे ‘राम भरोसे’ असल्याने गोव्याने स्वयंपूर्ण होण्यासाठी योजना आखण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.