शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचा पाणीपुरवठा खंडित

By admin | Updated: December 28, 2015 01:36 IST

पावसाने यंदा दडी मारल्याने धरणात २ मीटर पाण्याचा तुटवडा झालेला असताना आतापासूनच पाणी जपून वापरा, अशा

विशांत वझे ल्ल डिचोली पावसाने यंदा दडी मारल्याने धरणात २ मीटर पाण्याचा तुटवडा झालेला असताना आतापासूनच पाणी जपून वापरा, अशा सूचना करण्याची वेळ गोव्यावर आली आहे. कारण तिळारीच्या भरंवशावर अवलंबून असलेल्या गोव्याला पुन्हा हादरा बसला आहे. तिळारी धरणापासून ९ किलोमीटर अंतरावर गोव्याकडे येणाऱ्या तिळारी कालव्याला मोठे भगदाड पडल्याने गोव्याला येणारे पाणी बंद करण्यात आल्याने गोव्याला पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वी साटेली-खानयाळे परिसरातील कालवा मोठ्या प्रमाणात खचला असून पाणी वाया जात आहे. येथे मोठे भगदाड पडल्याने दुरुस्तीकाम हाती घेतानाही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच गोव्याकडे येणारे पाणी बंद करून कालव्याची डागडुजी युद्धपातळीवर चालू करण्यात आली आहे. कालवा फुटताच तेथे तात्पुरता दगड-विटांचा थर रचून सिमेंटच्या पिशव्या बांधून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तयारी चालवली असली तरी एकूणच या बाबतीत महाराष्ट्र सरकाराने बेफिकिरी दाखवली असून वर्षातून किमान दोन ते तीन वेळा असे प्रकार घडतच आहेत. त्यामुळे गोव्याला पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे. तिळारी धरणाचे कार्यकारी अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली कालवा दुरुस्तीचे काम सुरू आहे. या कालव्याच्या दुरुस्तीसाठी काही दिवस लागण्याची शक्यता असली तरी सोमवारी सायंकाळपर्यंत गोव्याचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचा दावा धरण अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. २०१४ साली खानयाळे साटेली येथे कालव्याला प्रचंड मोठे भगदाड पडल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसांत गोव्याचे पाणी बंद झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तातडीने जलसंसाधन खात्यामार्फत साळ नदीचे पाणी पंपिंग करण्याची योजना आखून शेती वाचवण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा पाणी बंद झाल्याने हा तिळारीच्या पाण्याचा द्रविडी प्राणायाम गोव्यासाठी तापदायक ठरला आहे. गोव्याने लाखो रुपये खर्च करून धरणग्रस्तांसाठी आर्थिक मदतीसाठी सहकार्य केलेले आहे. विस्थापितांना मदत केली आहे. मात्र, गोव्याला पाण्याची हमी मिळताना दिसत नाही. याबाबत राज्यातील शेतकरी बरेच नाराज आहेत. डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी, तिळारीचे पाणी हे ‘राम भरोसे’ असल्याने गोव्याने स्वयंपूर्ण होण्यासाठी योजना आखण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.