शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

विर्डीला गोव्याची हरकत

By admin | Updated: June 2, 2014 01:45 IST

धरणाला विरोध : राज्य सरकार आज याचिका सादर करणार

पणजी : महाराष्ट्र सरकारने विर्डी धरणाच्या चालवलेल्या बांधकामाला पाणी तंटा लवादासमोर हरकत घेणारी याचिका गोवा सरकारतर्फे सोमवारी सादर केली जाणार आहे. अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांनी यास दुजोरा दिला. या याचिकेवर रविवारी त्यांनी अंतिम हात फिरवला. शेजारी महाराष्ट्राच्या दोडामार्ग तालुक्यात धरणाचे हे बांधकाम चालू आहे. हे धरण झाल्यास वाळवंटी नदीच्या प्रवाहाला बाधा येईल, असे गोवा सरकारचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जलस्रोत खात्याच्या अधिकार्‍यांना हा प्रकार म्हादई जल तंटा लवादाच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश अलीकडेच दिले होते. जलस्रोत खात्याचे अधीक्षक अभियंता आर. येरागट्टी यांच्या म्हणण्यानुसार, या नदीतून उत्तर गोव्यासाठी रोज ८२ एमएलडी पाणीपुरवठा करणारी व्यवस्था कार्यरत आहे. याशिवाय तीन मोठ्या सिंचन योजना १६ पंप आहेत आणि औद्योगिक वापरासाठीही या पाण्याच्या मोठा उपयोग होतो. कत्तिका नाल्यावरील धरणाने महाराष्ट्र सरकारला १४.१३८ घनमीटर पाणी साठवण्याची व्यवस्था करायची आहे. २00६ साली पावलाची कोंड येथे गोवा हद्दीपासून अवघ्या ५00 मीटर अंतरावर काही अटींवर धरण बांधण्यास अनुमती देण्यात आली होती. अतिरिक्त पाणी अंजुणे धरणाला वळविण्याची प्रमुख अट होती; परंतु गोव्याला अंधारात ठेवून धरणाची जागा बदलण्यात आली. दरम्यान, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या म्हणण्यानुसार उसप, खोक्रल, पिकुळे, झरेबांबर या गावांना पाणी मिळत नाही. हे धरण झाल्यास पाण्याची समस्या सुटणार आहे. त्यामुळे विर्डी धरणाची उंची वाढवावी यासाठी महाराष्ट्र सरकारकडे आपले प्रयत्न चालू आहेत. मंत्रिमंडळानेही त्यास मान्यता दिलेली आहे. कर्नाटकसारखे आम्ही काही जबरदस्तीने बांधकाम चालविलेले नाही. हा प्रकल्प संयुक्त असल्याने वाटाघाटींद्वारे प्रश्न सुटू शकतो व त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. (प्रतिनिधी)