शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या खाण व्यवसायाची गाडी अडकली; नव्या अडचणींची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 13:05 IST

पावसाळा संपला तरी गोव्यातील खनिज व्यवसाय नव्याने सुरू होऊ शकलेला नाही. आता तर गोवा फाऊंडेशन ही संस्था नव्याने सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे खाण धंद्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

पणजी - पावसाळा संपला तरी गोव्यातील खनिज व्यवसाय नव्याने सुरू होऊ शकलेला नाही. आता तर गोवा फाऊंडेशन ही संस्था नव्याने सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे खाण धंद्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

गोव्यात यापूर्वी वार्षिक सरासरी 40 दशलक्ष टन खनिज उत्पादन होत असे. न्यायालयाने गोव्यातील खाण व्यवसायिकांची अंदाधुंदी पाहून उत्पादन मर्यादा 20 दशलक्ष टनांपर्यंत मर्यादित केली. गोव्यातील खनिज व्यवसायिक याबाबत अस्वस्थ होते. त्यांनी 30 दशलक्ष टनांपर्यंत मर्यादा वाढवून दिली जावी अशी विनंती केली होती व सरकारही त्यासाठी अनुकूल होते. तथापि गोव्यातील खनिज लिजधारक कोणत्याच पर्यावरणविषयक नियमांचे पालन करत नाहीत असा मुद्दा गोवा फाऊंडेशनने मांडून सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका सादर केली आहे. सध्याची वीस दशलक्ष टन ममर्यादा 12 दशलक्ष टनांपर्यंत कमी केली जावी अशी विनंती या संस्थेने याचिकेतून केली आहे. यामुळे खनिज व्यवसायिकांची अस्वस्थता वाढली आहे. 2012 साली याच संस्थेच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने गोव्यात खाण बंदी लागू केली होती व त्यावेळी दोन वर्षे खाण धंदा बंद राहिला होता.

एरव्ही पावसाळा संपला की गोव्याचा खनिज खाण व्यवसाय सुरू होत असे. खाणींवर ऑक्टोबरमध्ये यंत्रे धडधडायची पण यंदा अजुनही खाणी सुरू होऊ शकलेल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाचे दर वाढलेले नाहीत याबाबतही खनिज व्यवसायिक चिंतातूर आहेत.

2014 साली गोव्यातील खाण बंदी उठवताना न्यायालयाने गोवा सरकारला साधनसुविधा निर्माणाबाबत आणि प्रदूषण रोखण्याबाबत काही सूचना केल्या होत्या पण त्या सूचनांचे पालन झालेले नाही व गोव्यातील खाणपट्ट्यात नव्या साधनसुविधाही निर्माण झालेल्या नाहीत, असे गोवा फाऊंडेशनने याचिकेत नमूद केले आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन  गोवा सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली आहे व येत्या दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. यामुळे गोव्याच्या शासकीय पातळीवरही धावपळ उडाली आहे.

गोव्यात यंदा सुरू झाल्याच तर फक्त 30 टक्के खनिज खाणी सुरू होतील. कारण इतरांना अजुनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दाखले मिळालेले नाहीत. खाण हा पोर्तुगीज काळापासून  गोव्यातील प्रमुख व्यवसाय असून अजुनही हजारो कुटुंबांची उपजिविका त्यावर अवलंबून आहेत पण खाण धंद्यातील अंदाधुंदीने गोव्यातील पर्यावरण, निसर्ग, जलस्रोत, शेती व जंगल क्षेत्राचे आतापर्यंत खूपच नुकसान केले आहे. यामुळे एनजीओनी न्यायालयीन लढा सुरू केला आहे.