शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

गोव्याच्या खाण व्यवसायाची गाडी अडकली; नव्या अडचणींची भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 13:05 IST

पावसाळा संपला तरी गोव्यातील खनिज व्यवसाय नव्याने सुरू होऊ शकलेला नाही. आता तर गोवा फाऊंडेशन ही संस्था नव्याने सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे खाण धंद्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

पणजी - पावसाळा संपला तरी गोव्यातील खनिज व्यवसाय नव्याने सुरू होऊ शकलेला नाही. आता तर गोवा फाऊंडेशन ही संस्था नव्याने सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे खाण धंद्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

गोव्यात यापूर्वी वार्षिक सरासरी 40 दशलक्ष टन खनिज उत्पादन होत असे. न्यायालयाने गोव्यातील खाण व्यवसायिकांची अंदाधुंदी पाहून उत्पादन मर्यादा 20 दशलक्ष टनांपर्यंत मर्यादित केली. गोव्यातील खनिज व्यवसायिक याबाबत अस्वस्थ होते. त्यांनी 30 दशलक्ष टनांपर्यंत मर्यादा वाढवून दिली जावी अशी विनंती केली होती व सरकारही त्यासाठी अनुकूल होते. तथापि गोव्यातील खनिज लिजधारक कोणत्याच पर्यावरणविषयक नियमांचे पालन करत नाहीत असा मुद्दा गोवा फाऊंडेशनने मांडून सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका सादर केली आहे. सध्याची वीस दशलक्ष टन ममर्यादा 12 दशलक्ष टनांपर्यंत कमी केली जावी अशी विनंती या संस्थेने याचिकेतून केली आहे. यामुळे खनिज व्यवसायिकांची अस्वस्थता वाढली आहे. 2012 साली याच संस्थेच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने गोव्यात खाण बंदी लागू केली होती व त्यावेळी दोन वर्षे खाण धंदा बंद राहिला होता.

एरव्ही पावसाळा संपला की गोव्याचा खनिज खाण व्यवसाय सुरू होत असे. खाणींवर ऑक्टोबरमध्ये यंत्रे धडधडायची पण यंदा अजुनही खाणी सुरू होऊ शकलेल्या नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिजाचे दर वाढलेले नाहीत याबाबतही खनिज व्यवसायिक चिंतातूर आहेत.

2014 साली गोव्यातील खाण बंदी उठवताना न्यायालयाने गोवा सरकारला साधनसुविधा निर्माणाबाबत आणि प्रदूषण रोखण्याबाबत काही सूचना केल्या होत्या पण त्या सूचनांचे पालन झालेले नाही व गोव्यातील खाणपट्ट्यात नव्या साधनसुविधाही निर्माण झालेल्या नाहीत, असे गोवा फाऊंडेशनने याचिकेत नमूद केले आहे. न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन  गोवा सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली आहे व येत्या दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. यामुळे गोव्याच्या शासकीय पातळीवरही धावपळ उडाली आहे.

गोव्यात यंदा सुरू झाल्याच तर फक्त 30 टक्के खनिज खाणी सुरू होतील. कारण इतरांना अजुनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दाखले मिळालेले नाहीत. खाण हा पोर्तुगीज काळापासून  गोव्यातील प्रमुख व्यवसाय असून अजुनही हजारो कुटुंबांची उपजिविका त्यावर अवलंबून आहेत पण खाण धंद्यातील अंदाधुंदीने गोव्यातील पर्यावरण, निसर्ग, जलस्रोत, शेती व जंगल क्षेत्राचे आतापर्यंत खूपच नुकसान केले आहे. यामुळे एनजीओनी न्यायालयीन लढा सुरू केला आहे.