शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
4
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
5
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
6
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
7
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
8
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
9
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
11
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
12
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
13
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
14
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
15
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
16
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
17
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
18
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
19
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
20
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ३४ वर्षानंतर बदलले गोव्याच्या कायद्यांचे नाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 00:33 IST

गोवा मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत दमण व दीव हा उल्लेख गोव्याच्या कायद्यातून वगळण्यात आला

पणजी : गोव्यापासून दमण, दिव वेगळे झाले आणि ३० मे १९८७ रोजी गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला. तरी गोव्याचे सर्व कायदे गोवा, दमण व दीव कायदा असेच ओळखले जात होते. आज गोवा मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीत दमण व दीव हा उल्लेख गोव्याच्या कायद्यातून वगळण्यात आला. यासंबंधीचा महत्त्वाचा निर्णय बैठकीत झाला.

गोव्याच्या अनेक कायद्यांचा गोवा दमण व दीव कायदा म्हणून उल्लेख केला जात होता. दमण व दीव वेगळा झाला असला तरी कायदे मात्र याच नावाने ओळखले जात होते.  यापुढे राज्यातील सर्व कायदे गोव्याचे कायदे म्हणून ओळखले जातील. तब्बल ३४ वर्षांनंतर हा बदल करण्यात आला आहे.

मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाचे निर्णय झाले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यासंबंधीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मे महिन्यात झालेल्या चक्रीवादळात गोव्यात प्रचंड हानी झाली. वीज खांब मोडून पडले तसेच सरकारी मालमत्तेची इतरही बरीच हानी झाली या सर्व खर्चासाठी १९ कोटी ५ लाख रुपये मंत्रिमंडळाने मंजूर केले आहेत.

दरम्यान, गोव्यात महामारीत व्यवसाय गमावलेल्यांना सरकारने ५ हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर केले आहे. या योजनेत मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मोटरसायकल पायलट, रिक्षाचालक, टॅक्सी व्यवसायिक, फूल विक्रेते तसेच इतर लहान ३० हजार घटकांना होणार लाभ होणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, समाजकल्याण खात्याकडे पारंपारिक व्यवसायिकांचा तपशील आहे तो घेतला जाईल. झळग्रस्त सर्व लहान 

घटकांसह रोजगार गमावलेल्या एनएमआर कामगारांनाही या योजनेचा लाभ मिळेल.

कोविड महामारीमुळे गेले सव्वा वर्ष लहान व्यावसायिकांचा धंदा बुडाला .पर्यटन तसेच सर्व व्यवहार बंद राहिल्याने फुल विक्रेते, खाजेकार, मोटरसायकल पायलट, रिक्षाचालक, टॅक्सी व्यवसायिक यांची उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे. या सर्वांना वरील योजनेचा लाभ मिळेल.

मुख्यमंत्री म्हणाले की, साधा भरून अर्थसहाय्यासाठी दावा करता येईल तसेच पात्र लाभार्थींचा शोध घेण्यासाठी संबंधित संघटनांकडेही सरकार संपर्क साधणार आहे.२ लाख रुपये सानुग्रह; योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरीदरम्यान, कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये सानुग्रह देण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. एखादी व्यक्ती कोविडने दगावली असल्यास या योजनेचा लाभ घेता येईल.  कर्त्या व्यक्तीचे कोविडने निधन झाल्यानंतर कुटुंबाचे उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असायला हवे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.