शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

गोव्यात जीएसटीची एैशीतैशी! विवरणपत्रे भरण्याबाबत निरुत्साह; सरकारने विलंब शुल्क केलं माफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 11:56 IST

गोव्यात जीएसटी अजून विक्रेते तसेच व्यावसायिकांच्या अंगवळणी पडलेलं नसल्याचं दिसत आहे. दरमहा भरावयाचे विवरणपत्र ऑगस्टमध्ये तब्बल ८ हजार तर सप्टेंबरमध्ये सुमारे १३ हजार व्यावसायिकांनी भरलेच नाही.

पणजी- गोव्यात जीएसटी अजून विक्रेते तसेच व्यावसायिकांच्या अंगवळणी पडलेलं नसल्याचं दिसत आहे. दरमहा भरावयाचे विवरणपत्र ऑगस्टमध्ये तब्बल ८ हजार तर सप्टेंबरमध्ये सुमारे १३ हजार व्यावसायिकांनी भरलेच नाही. सरकारने त्यांना विलंब शुल्क माफ करावे लागले. राज्यात जीएसटीच्या बाबतीत सरकारने प्रारंभी मवाळ भूमिका घेतली आहे. 

जीएसटी अंतर्गत दर महिन्याच्या २0 तारीखपर्यंत विवरणपत्र सादर न केल्यास त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाकाठी २00 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे, असं वाणिज्य कर खात्याचे आयुक्त दिपक बांदेकर यांनी म्हंटलं आहे.

जुलै महिन्यापासून जीएसटी लागू झालेला आहे. दर तीन महिन्यांनी भरावयाचे आणखी एक विवरणपत्र चालू महिन्यात भरावे लागणार आहे. तो एक मोठा व्याप ठरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अखिल गोवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नारायण कारेकर म्हणाले की, पूर्वी कर भरण्यासाठी ३0 दिवसांची अतिरिक्त मुदत दिली जात असे तसेच विवरणपत्र भरण्यासाठी तीन महिने दिले जात असत आता दरमहा ते बरावे लागते हा मोठा व्यापच आहे. धंदा, व्यवसाय कधी करायचा आणि हे विवरणपत्र कधी भरायचे, असा प्रश्न व्यावसायिकांना पडतो. ते पुढे म्हणाले की, व्हॅटच्या बाबतीत जुळवून घेतले तसे जीएसटीच्याबाबतीतही घ्यावे लागेल, त्यासाठी थोडा वेळ जाईल. दर महिन्याचा हिशोब पुढील महिन्याच्या २0 तारीखपर्यंत विवरणपत्रांव्दारे सादर करण्याची जी अट घालण्यात आलेली आहे ती मात्र अडचणीची आहे. व्यापारी किंवा डीलर्स धंदा करणार की या गोष्टींना वेळ देणार? धंदा सांभाळताना हे सोपस्कार पार पाडणे कटकटीचे ठरत आहे. वेगवेगळया वस्तूंवर १२ टक्क्यांपासून २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लागू केला आहे त्यामुळे गिऱ्हाईक कमी झाले आहे. धंदा पूर्वीप्रमाणे होत नाही. सामान्य व्यापाºयांनाही चार्टर्ड अकौंटंट बसवावे लागले आहे आणि ते खर्चिक आहे. 

ग्राहक चळवळीतील ‘गोवा कॅन’ या संघटनेचे संस्थापक रोलंड मार्टिन्स यांच्या मतें ग्राहकांमध्ये जीएसटीबाबत पुरेशी जागृती झालेली दिसत नाही. ते म्हणाले की,  फसवणूक झालीच तर त्याबाबत तक्रार करण्यासाठी ग्राहक पुढे आले पाहिजेत. त्यासाठी आधी त्यांना जीएसटी म्हणजे काय हे ज्ञात होणे आवश्यक आहे. कंपोझिट योजनेच्या बाबतीत अनेक प्रश्न आहेत. ७५ लाख रुपयांपर्यंतच्या उलाढालीसाठी ही योजना आहे परंतु त्याबाबतचे नियम ग्राहकांना माहीत नाहीत त्यामुळे विक्रेत्यांकडून फसवणूक होऊ शकते. नागरी पुरवठा खात्याचे निरीक्षक तसेच कर्मचाºयांना सहभागी करुन तालुकावर जागृती शिबिरे व्हायला हवीत. जीएसटीमुळे वस्तुंचे दर कमी होणार, परंतु ग्राहक याबाबतीत सज्ञानी झाले तरच त्याचा फायदा होईल.