शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

गोव्यातला ड्रग्स व्यवहार सरकारच्याच संमतीने?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 21:18 IST

गोव्यात एकेकाळी ड्रग्स यायचे व त्याचा फैलाव केवळ हिप्पींपुरता मर्यादित असायचा.

- राजू नायक

गोव्यात होणा-या ‘सनबर्न क्लासिक’ या ईडीएमच्या पहिल्याच दिवशी अती ड्रग्स सेवनाने दोघांचा झालेला मृत्यू हा राज्य सरकारला लाजिरवाणा असल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. अशा महोत्सवात अमली पदार्थाचा सुळसुळाट असतो, त्याच लालसेने देशभरातील तरुणाई गोव्यात येते हे तर जगजाहीर आहे. राज्य सरकारलाही त्याची जाणीव असल्याने सरकारने सावध राहावे, ड्रग्स व्यापा-यांवर नजर ठेवावी, सुरक्षा व्यवस्था कडक करावी अशी अपेक्षा होती. दुर्दैवाने झाल्या प्रकाराने प्रशासनाची, पोलीस दलाची व गृह खात्याची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. काही जणांनी तर सरकारवर थेट आरोप करून उच्चपदस्थांचे लागेबांधे असल्याचा आरोप केला आहे.

ज्या भागात ही घटना घडली, तेथील आमदार व माजी मंत्री विनोद पालयेकर यांनी मला सांगितले की या किनारपट्टी भागात चालू असलेल्या अमली पदार्थाची इत्थंभूत माहिती देणारी सात पत्रे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली आहेत. परंतु मुख्यमंत्री दखल घेत नसल्याने त्यांनी पंतप्रधानांनाही एक पत्र लिहिले. त्याचे आठ दिवसांत त्यांना उत्तर आले. पालयेकर म्हणतात, शिवोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक व उपनिरीक्षक ड्रग्स लॉर्ड्सचेच आश्रित आहेत. या प्रकरणाला जबाबदार धरून पोलीस निरीक्षकाला ताबडतोब निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

गोव्यात एकेकाळी ड्रग्स यायचे व त्याचा फैलाव केवळ हिप्पींपुरता मर्यादित असायचा. आता त्यांची वाहतूक स्थानिक लोक करतात. बहुतेक किनारी हॉटेल्स व श्ॉकवाले त्यात सामील आहेत. येथील काही नाईट क्लबमध्ये आता सर्रास रेव्ह पाटर्य़ा आयोजित होऊ लागल्या आहेत. भाजप सरकारच्या आशीर्वादानेच हे प्रकार चालले असल्याची टीका होत आहे. परंतु आरोप होऊनही भाजप ते गंभीरपणे घेत नाही. काही नेत्यांना तर ड्रग्स पैसा वर्षानुवर्षे मिळतो असा आरोप होत होता. दुर्दैवाने विनोद पालयेकर मंत्री असताना त्यांच्या वैयक्तिक मोहिमेमुळे बंद पडलेला ड्रग्स व्यवहार पूर्ववत सुरू झाला आहे.

पर्यटन व्यवसायाच्या वृद्धीसाठी असले ईडीएम किंवा किनारी जलसे, महोत्सव आवश्यक असतात, यात तथ्य आहे. परंतु त्यांच्यावर नियंत्रण हवे आहे. गोव्यासारख्या ठिकाणी ड्रग्स पूर्वीपासून उपलब्ध होते. काही प्रमाणात ड्रग्सचा व्यवहार हा जगभरात चालतच असतो. मुंबई, नवी दिल्लीत गोव्यापेक्षा कैकपटींनी ड्रग्स व्यवहार चालतो, अशी माहिती उपलब्ध आहे. परंतु आता असे सांगितले जाते की अनेक रासायनिक ड्रग्स गोव्यात यऊ लागले आहेत. अॅसिड, एक्टसी, कोकेन, मारिजुआना सारख्या पदार्थावर देशात बंदी असूनही ते गोव्यात सापडतात. हिमाचल, पुष्कर व गोवा अशा ठिकाणी नेपाळहून ते आणून विक्री केली जाते. नायजेरियनांची एक टोळीच त्यात वावरते.

तरुणांमध्ये आज मारिजुआना व कोकेन ही द्रव्ये खूप लोकप्रिय बनली असून देशभरातील उच्चभ्रू तरुण त्याच आशेने गोव्यात येतात. दुर्दैवाने हे ड्रग्स गुप्तरीत्या विकले जात असल्याने त्यांची विश्वासार्हता तपासता येत नाही. हे बरेचसे ड्रग्स भेसळयुक्त असू शकतात. काहींनी तर त्यांचे मिश्रण गोव्यात करणारे छोटे छोटे कारखानेच चालविले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पोलीस सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार २०१९ साली दर आठवडय़ाला पाच या संख्येने ड्रग्स विक्रेत्यांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण पाच कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे. गेल्या अडीच वर्षात राज्यात अमली पदार्थाची ५०७ प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. सूत्रांच्या मते, राज्यात एकूण १२७ ड्रग्स डिलर आहेत. त्यांच्यापैकी ब-याच जणांची माहिती पोलिसांना आहे.

राज्यात अमली पदार्थविरोधी दलही आहे. कधी तरी ते छापे टाकतात व पदार्थ जप्तही करतात; परंतु मोठय़ा प्रमुख व्यापा-यांपर्यंत त्यांचे हात पोहोचत नाहीत. त्यामुळे राजकीय लागेबांधे असल्याचा आरोप सर्रास होतो. राज्यात पकडण्यात आलेले काही विदेशी ड्रग्स लॉर्ड पोलिसांना नंतर गुंगारा देऊन पळून गेले आहेत. पेडणे व कळंगुट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हा व्यवहार मोठय़ा प्रमाणात चालतो. दुर्दैवाने पोलिसांचे जाळे भक्कम असले तरी ड्रग्स व्यवहार आणखी जोमाने फोफावतच चालला आहे. गोव्यात कित्येक हजार कोटींचा हा व्यवहार असल्याचा कयास असून गृह खाते त्यात गुंतलेले नाही म्हणणे, धाडसासेच होईल.वर्ष गुन्हे नोंद२०१४  : ५४२०१५ : ६१२०१६  : ६०२०१७ : १६८२०१८  : २२२२०१९ (सप्टेंबरपर्यंत) : १८९

टॅग्स :goaगोवा