शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

गोव्याची किनारपट्टी सागरी लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करावी - मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: October 17, 2023 18:49 IST

गोव्याची किनारपट्टी मरिटाइम गोव्याची किनारपट्टी मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्यास बराच वाव असून केंद्र सरकारने याबाबत विचार करावा, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

पणजी : गोव्याची किनारपट्टी मरिटाइम गोव्याची किनारपट्टी मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्यास बराच वाव असून केंद्र सरकारने याबाबत विचार करावा, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. मुंबईत झालेल्या सागरी शिखर परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी व्हर्च्युअल पध्दतीने परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेस महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय जहाजोद्योग व बंदर तसेच जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय जहाजोद्योग व बंदर राज्यमंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

मुंबईत एमएमआरडीए मैदानावर सुरु असलेली ही शिखर परिषद पुढील तीन दिवस चालणार आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले कि,‘ नील क्रांतीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पारंपरिक मच्छिमारांपासून खलाशांपर्यंत सर्वांचेच योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. जहाज बांधणीत मुख्यमंत्री म्हणाले कि, गोव्याचे मरिटाइम क्षेत्र आर्थिक विकासाभिमुख, नाविन्यपूर्ण व कनेक्टिव्हीटी देणारे आहे. जहाज बांधणीपासून दुरुस्ती, क्रुझ पर्यटन, सागरी प्रशिक्षण ते बंदराभिमुख औद्योगिकरण या सर्व बाबतीत राज्य सरकारचे योगदान महत्त्वाचे आहे. जगभरातील ३० हुन अधिक राष्ट्रांकडे गोव्यातील सागरी ‘गेट वे’ मुळे व्यापारी संबंध आलेले आहेत. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ), नॅशनल इन्स्टिट्युट ॲाफ पोलार रीसर्च, नॅशनल इन्स्टिट्युट ॲाफ वॉटर स्पोर्टस आदी महत्त्वाच्या संस्था गोव्यात आहेत. अधिकाधिक आव्हाने पेलून मरिटाइम क्षेत्रात देशाचा विकास घडवून आणण्यासाठी आमच्याकडे पुरेशी यंत्रणा आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा शिपयार्डने जहाज बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तटरक्षक दल, मुरगांव बंदराला हे शिपयार्ड सहकार्य करीत आहे. जहाजांमधून येणाय्रा पर्यटकांची संख्या गोव्यात वाढत आहे. गोवा प्रमुख लॉजिस्टिक व क्रुझ टर्मिनल म्हणून उदयास येत आहे. केंद्रीय जहाजोद्योग व बंदर तसेच जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गोवा किनारपट्टी मल्टिमॅाडेल मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करावे. फेरी सेवा, तरंगत्या जेटींमुळे राज्यात जलमार्ग कनेक्टिव्हिटी वाढणार असून त्यामुळे पर्यटनही बहरणार आहे.’ 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत