शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

गोव्याची किनारपट्टी सागरी लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करावी - मुख्यमंत्री

By किशोर कुबल | Updated: October 17, 2023 18:49 IST

गोव्याची किनारपट्टी मरिटाइम गोव्याची किनारपट्टी मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्यास बराच वाव असून केंद्र सरकारने याबाबत विचार करावा, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

पणजी : गोव्याची किनारपट्टी मरिटाइम गोव्याची किनारपट्टी मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्यास बराच वाव असून केंद्र सरकारने याबाबत विचार करावा, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. मुंबईत झालेल्या सागरी शिखर परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी व्हर्च्युअल पध्दतीने परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेस महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय जहाजोद्योग व बंदर तसेच जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय जहाजोद्योग व बंदर राज्यमंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

मुंबईत एमएमआरडीए मैदानावर सुरु असलेली ही शिखर परिषद पुढील तीन दिवस चालणार आहे. मुख्यमंत्री सावंत म्हणाले कि,‘ नील क्रांतीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पारंपरिक मच्छिमारांपासून खलाशांपर्यंत सर्वांचेच योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. जहाज बांधणीत मुख्यमंत्री म्हणाले कि, गोव्याचे मरिटाइम क्षेत्र आर्थिक विकासाभिमुख, नाविन्यपूर्ण व कनेक्टिव्हीटी देणारे आहे. जहाज बांधणीपासून दुरुस्ती, क्रुझ पर्यटन, सागरी प्रशिक्षण ते बंदराभिमुख औद्योगिकरण या सर्व बाबतीत राज्य सरकारचे योगदान महत्त्वाचे आहे. जगभरातील ३० हुन अधिक राष्ट्रांकडे गोव्यातील सागरी ‘गेट वे’ मुळे व्यापारी संबंध आलेले आहेत. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ), नॅशनल इन्स्टिट्युट ॲाफ पोलार रीसर्च, नॅशनल इन्स्टिट्युट ॲाफ वॉटर स्पोर्टस आदी महत्त्वाच्या संस्था गोव्यात आहेत. अधिकाधिक आव्हाने पेलून मरिटाइम क्षेत्रात देशाचा विकास घडवून आणण्यासाठी आमच्याकडे पुरेशी यंत्रणा आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा शिपयार्डने जहाज बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तटरक्षक दल, मुरगांव बंदराला हे शिपयार्ड सहकार्य करीत आहे. जहाजांमधून येणाय्रा पर्यटकांची संख्या गोव्यात वाढत आहे. गोवा प्रमुख लॉजिस्टिक व क्रुझ टर्मिनल म्हणून उदयास येत आहे. केंद्रीय जहाजोद्योग व बंदर तसेच जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गोवा किनारपट्टी मल्टिमॅाडेल मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करावे. फेरी सेवा, तरंगत्या जेटींमुळे राज्यात जलमार्ग कनेक्टिव्हिटी वाढणार असून त्यामुळे पर्यटनही बहरणार आहे.’ 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत