शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

गोव्याचे दक्षता खाते बिनकामाचे, तब्बल १0२ प्रकरणे चौकशीसाठी पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 13:59 IST

दक्षता खात्याचे तपासकाम कासवगतीने चालू असल्याचे आकडेवारी नजरेखालून घातली असता दिसून आले. सुमारे बारा ते पंधरा वर्षांपूवीर्ची प्रकरणेही अजून निकालात येऊ शकलेली नाहीत. त्यामुळे दक्षता खात्याच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पणजी : दक्षता खात्याचे तपासकाम कासवगतीने चालू असल्याचे आकडेवारी नजरेखालून घातली असता दिसून आले. सुमारे बारा ते पंधरा वर्षांपूवीर्ची प्रकरणेही अजून निकालात येऊ शकलेली नाहीत. त्यामुळे दक्षता खात्याच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एखाद्या सरकारी अधिकाऱ्याविरूद्ध किंवा राजकारण्याविरुद्ध दक्षता खात्याकडे प्रकरण पोहोचले आणि चौकशी सुरू झाल्यानंतर त्याचे काय झाले, याची उत्सुकता सर्वसामान्य लोकांना असते आणि त्याबाबत जाणून घेण्याची जिज्ञासाही वाढते.

आकडेवारी असे सांगते की, तब्बल १0२ प्रकरणे चौकशीसाठी खात्याकडे पडून आहेत आणि यात २00५ च्या प्रकरणांचाही समावेश आहे. लाचलुचपतविरोधी विभागाकडे ४६ प्रकरणे चौकशीसाठी आहेत तर सर्वसाधारण दक्षता विभागाकडे ५६ प्रकरणे आहेत. कॉंग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचाही यात समावेश आहे. सुमारे साडेपाच कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता केल्याचा आरोप कवळेकर यांच्यावर आहे. चालूवर्षी आतापर्यंत ११ प्रकरणे दक्षता खात्याकडे आली. २00६ ची दोन , २0१२ ची पाच तर २0१५ ची सात प्रकरणे चौकशीसाठी पडून आहेत. लाच मागणे किंवा स्वीकारणे, बेकायदेशीरपणे भूखंड बळकावणे, बोगस प्रमाणपत्रे देणे तसेच अधिकाराचा गैरवापर करून अन्य माध्यमातून पैसे उकळणे, आदी आरोप आहेत. अव्वल कारकुनांच्या भरती प्रक्रियेतील घोटाळ्याचा आरोप काही जणांवर आहे.तत्कालीन बंदर कप्तान ए. पी. मास्कारेन्हस, मडगाव पालिकेचे माजी मुख्याधिकारी यशवंत तावडे, फोंड्याचे माजी उपजिल्हाधिकारी जयंत तारी, बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता रमाकांत देसाई आदि अधिकाऱ्यांविरूद्ध ही प्रकरणे आहेत.

दरम्यान, दक्षता खात्यात मनुष्यबळाचा अभाव हेदेखिल प्रमुख कारण मानले जाते. मध्यंतरी दक्षता संचालकांनी याचा उल्लेख करुन लांच लुचपतविरोधी विभागासाठी जादा निरीक्षकांच मागणी केली होती. अधिकृत माहितीनुसार असेही आढळून आले आहे की, लांच लुचपत प्रकरणांमध्ये या विभागापेक्षा गोवा पोलिस तसेच आरटीओ अधिकाºयांनीच अधिक गुन्हे आजवर नोंद केलेले आहेत.

अलीकडेच आयपीएस अधिकारी विमल गुप्ता यांच्याविरुदचे भ्रष्टाचाराचे प्रकरण दक्षता खात्याकडे सोपविण्याची मागणी झाली होती परंतु ते करण्याऐवजी गुप्ता यांनी कोणतीही चौकशी न करता थेट दिल्लीला बदली करण्यात आली. दुसरीकडे २0१८ अखेरपर्यंत दक्षता खात्याकडील किमान ५0 टक्के प्रकरणे निकालात काढली जातील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले आहे. क आणि ड श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांची १६0 प्रकरणे निकालात काढल्याचा दावाही त्यांनी केला होता.