शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

गोव्याचे दक्षता खाते बिनकामाचे, तब्बल १0२ प्रकरणे चौकशीसाठी पडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 13:59 IST

दक्षता खात्याचे तपासकाम कासवगतीने चालू असल्याचे आकडेवारी नजरेखालून घातली असता दिसून आले. सुमारे बारा ते पंधरा वर्षांपूवीर्ची प्रकरणेही अजून निकालात येऊ शकलेली नाहीत. त्यामुळे दक्षता खात्याच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पणजी : दक्षता खात्याचे तपासकाम कासवगतीने चालू असल्याचे आकडेवारी नजरेखालून घातली असता दिसून आले. सुमारे बारा ते पंधरा वर्षांपूवीर्ची प्रकरणेही अजून निकालात येऊ शकलेली नाहीत. त्यामुळे दक्षता खात्याच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.एखाद्या सरकारी अधिकाऱ्याविरूद्ध किंवा राजकारण्याविरुद्ध दक्षता खात्याकडे प्रकरण पोहोचले आणि चौकशी सुरू झाल्यानंतर त्याचे काय झाले, याची उत्सुकता सर्वसामान्य लोकांना असते आणि त्याबाबत जाणून घेण्याची जिज्ञासाही वाढते.

आकडेवारी असे सांगते की, तब्बल १0२ प्रकरणे चौकशीसाठी खात्याकडे पडून आहेत आणि यात २00५ च्या प्रकरणांचाही समावेश आहे. लाचलुचपतविरोधी विभागाकडे ४६ प्रकरणे चौकशीसाठी आहेत तर सर्वसाधारण दक्षता विभागाकडे ५६ प्रकरणे आहेत. कॉंग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचाही यात समावेश आहे. सुमारे साडेपाच कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता केल्याचा आरोप कवळेकर यांच्यावर आहे. चालूवर्षी आतापर्यंत ११ प्रकरणे दक्षता खात्याकडे आली. २00६ ची दोन , २0१२ ची पाच तर २0१५ ची सात प्रकरणे चौकशीसाठी पडून आहेत. लाच मागणे किंवा स्वीकारणे, बेकायदेशीरपणे भूखंड बळकावणे, बोगस प्रमाणपत्रे देणे तसेच अधिकाराचा गैरवापर करून अन्य माध्यमातून पैसे उकळणे, आदी आरोप आहेत. अव्वल कारकुनांच्या भरती प्रक्रियेतील घोटाळ्याचा आरोप काही जणांवर आहे.तत्कालीन बंदर कप्तान ए. पी. मास्कारेन्हस, मडगाव पालिकेचे माजी मुख्याधिकारी यशवंत तावडे, फोंड्याचे माजी उपजिल्हाधिकारी जयंत तारी, बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता रमाकांत देसाई आदि अधिकाऱ्यांविरूद्ध ही प्रकरणे आहेत.

दरम्यान, दक्षता खात्यात मनुष्यबळाचा अभाव हेदेखिल प्रमुख कारण मानले जाते. मध्यंतरी दक्षता संचालकांनी याचा उल्लेख करुन लांच लुचपतविरोधी विभागासाठी जादा निरीक्षकांच मागणी केली होती. अधिकृत माहितीनुसार असेही आढळून आले आहे की, लांच लुचपत प्रकरणांमध्ये या विभागापेक्षा गोवा पोलिस तसेच आरटीओ अधिकाºयांनीच अधिक गुन्हे आजवर नोंद केलेले आहेत.

अलीकडेच आयपीएस अधिकारी विमल गुप्ता यांच्याविरुदचे भ्रष्टाचाराचे प्रकरण दक्षता खात्याकडे सोपविण्याची मागणी झाली होती परंतु ते करण्याऐवजी गुप्ता यांनी कोणतीही चौकशी न करता थेट दिल्लीला बदली करण्यात आली. दुसरीकडे २0१८ अखेरपर्यंत दक्षता खात्याकडील किमान ५0 टक्के प्रकरणे निकालात काढली जातील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट केले आहे. क आणि ड श्रेणी सरकारी कर्मचाऱ्यांची १६0 प्रकरणे निकालात काढल्याचा दावाही त्यांनी केला होता.