शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
3
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
4
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
5
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
6
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
7
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
8
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
9
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
10
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
11
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
12
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
13
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
14
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
15
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
16
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
17
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

Goa: बऱ्याच वर्षाची तहान लवकरच भागेल, गवळीवाडा येथील नवीन पाण्याची वाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ

By पंकज शेट्ये | Updated: October 31, 2023 19:05 IST

Goa News: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातर्फे घालण्यात येणाऱ्या भूमीगत पाण्याच्या वाहीनीमुळे भविष्यात गवळीवाडा भागातील नागरिकांची पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याचा विश्वास आमदार ॲथनी वास यांनी व्यक्त केला.

- पंकज शेट्येवास्को - गवळीवाडा, केळशी भागातील अनियमीत पाणी पुरवठा समस्या दूर करण्यासाठी कुठ्ठाळीचे आमदार ॲथनी वास यांनी पावले उचलल्यानंतर तेथे स्वतंत्र पाणी पुरवठ्याची वाहीनी घालण्याच्या कामाचा मंगळवारी (दि.३१) शुभारंभ झाला. २० लाख खर्चून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातर्फे घालण्यात येणाऱ्या भूमीगत पाण्याच्या वाहीनीमुळे भविष्यात गवळीवाडा भागातील नागरिकांची पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याचा विश्वास आमदार ॲथनी वास यांनी व्यक्त केला.

कुठ्ठाळी मतदारसंघातील केळशी पंचायतीत असलेल्या गवळीवाडा भागात सुमारे १०० कुटूंबे राहतात. सुमारे ५० वर्षपासून तेथील नागरिकांना अनियमीत पाणी पुरवठ्याचा बराच त्रास सोसावा लागतो. तेथील नागरिकांना वेर्णा औद्योगिक वसाहतीतील पाण्याच्या वाहीनीतून पाणी पुरवठा केला जातो. तेथे राहणाऱ्या नागरिकांना दिवसाला फक्त अर्धातास तर कधी त्याहून कमी वेळासाठी पाणी पुरवठा होत असून काहीवेळा पाणी पुरवठा होत नसल्याची माहीती ग्रामस्थांनी दिली. तेथील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्यात यावी अशी मागणी तेथे राहणाऱ्या नागरिकांनी आमदार ॲथनी वास यांच्याशी केली होती. गवळीवाडा भागातील पाण्याची समस्या लवकरच दूर करणार असल्याचे आश्वासन वास यांनी काही काळापूर्वी दिल्यानंतर त्यांनी ती समस्या दूर करण्यासाठी पावले उचलली होती.

आमदार वास यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या भागात स्वतंत्र पाण्याची भूमीगत वाहीनी घालण्याच्या कामाचा मंगळवारी शुभारंभ केला. सुमारे २० लाख खर्चुन पाण्याची ती वाहीनी घालण्यात येणार आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर गवळीवाडा भागातील लोकांची पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. 

पाण्याची वाहीनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार वास यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांच्याबरोबर कुठ्ठाळी जिल्हा पंचायत सदस्या मेरसीयाना वास, केळशी पंचायतीचे सरपंच एफ एक्स फीगरेदो, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता नरेश पैंगीणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वाहीनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर बोलताना ह्या कामाची सुरवात झाल्याने मला अत्यंत आनंद झाल्याचे वास म्हणाले. ५० वर्षाहून अधिक काळापासून गवळीवाडा भागातील नागरिकांना अनियमीत पाणी पुरवठ्याचा त्रास सोसावा लागत होता. त्या गावातील नागरिकांनी मला संपर्क करून पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी केल्यानंतर त्यासाठी मी त्वरित पावले उचलली. मी सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांना संपर्क करून गवळीवाडा भागातील लोकांची पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी केली होती. त्यांनी तेथील पाण्याची समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी नवीन पाण्याची वाहीनी घालण्याबाबत पावले उचलल्याने मी सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांचा आभारी असल्याचे वास म्हणाले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणी