शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Goa: बऱ्याच वर्षाची तहान लवकरच भागेल, गवळीवाडा येथील नवीन पाण्याची वाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ

By पंकज शेट्ये | Updated: October 31, 2023 19:05 IST

Goa News: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातर्फे घालण्यात येणाऱ्या भूमीगत पाण्याच्या वाहीनीमुळे भविष्यात गवळीवाडा भागातील नागरिकांची पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याचा विश्वास आमदार ॲथनी वास यांनी व्यक्त केला.

- पंकज शेट्येवास्को - गवळीवाडा, केळशी भागातील अनियमीत पाणी पुरवठा समस्या दूर करण्यासाठी कुठ्ठाळीचे आमदार ॲथनी वास यांनी पावले उचलल्यानंतर तेथे स्वतंत्र पाणी पुरवठ्याची वाहीनी घालण्याच्या कामाचा मंगळवारी (दि.३१) शुभारंभ झाला. २० लाख खर्चून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातर्फे घालण्यात येणाऱ्या भूमीगत पाण्याच्या वाहीनीमुळे भविष्यात गवळीवाडा भागातील नागरिकांची पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याचा विश्वास आमदार ॲथनी वास यांनी व्यक्त केला.

कुठ्ठाळी मतदारसंघातील केळशी पंचायतीत असलेल्या गवळीवाडा भागात सुमारे १०० कुटूंबे राहतात. सुमारे ५० वर्षपासून तेथील नागरिकांना अनियमीत पाणी पुरवठ्याचा बराच त्रास सोसावा लागतो. तेथील नागरिकांना वेर्णा औद्योगिक वसाहतीतील पाण्याच्या वाहीनीतून पाणी पुरवठा केला जातो. तेथे राहणाऱ्या नागरिकांना दिवसाला फक्त अर्धातास तर कधी त्याहून कमी वेळासाठी पाणी पुरवठा होत असून काहीवेळा पाणी पुरवठा होत नसल्याची माहीती ग्रामस्थांनी दिली. तेथील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्यात यावी अशी मागणी तेथे राहणाऱ्या नागरिकांनी आमदार ॲथनी वास यांच्याशी केली होती. गवळीवाडा भागातील पाण्याची समस्या लवकरच दूर करणार असल्याचे आश्वासन वास यांनी काही काळापूर्वी दिल्यानंतर त्यांनी ती समस्या दूर करण्यासाठी पावले उचलली होती.

आमदार वास यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या भागात स्वतंत्र पाण्याची भूमीगत वाहीनी घालण्याच्या कामाचा मंगळवारी शुभारंभ केला. सुमारे २० लाख खर्चुन पाण्याची ती वाहीनी घालण्यात येणार आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर गवळीवाडा भागातील लोकांची पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. 

पाण्याची वाहीनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार वास यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांच्याबरोबर कुठ्ठाळी जिल्हा पंचायत सदस्या मेरसीयाना वास, केळशी पंचायतीचे सरपंच एफ एक्स फीगरेदो, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता नरेश पैंगीणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वाहीनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर बोलताना ह्या कामाची सुरवात झाल्याने मला अत्यंत आनंद झाल्याचे वास म्हणाले. ५० वर्षाहून अधिक काळापासून गवळीवाडा भागातील नागरिकांना अनियमीत पाणी पुरवठ्याचा त्रास सोसावा लागत होता. त्या गावातील नागरिकांनी मला संपर्क करून पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी केल्यानंतर त्यासाठी मी त्वरित पावले उचलली. मी सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांना संपर्क करून गवळीवाडा भागातील लोकांची पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी केली होती. त्यांनी तेथील पाण्याची समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी नवीन पाण्याची वाहीनी घालण्याबाबत पावले उचलल्याने मी सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांचा आभारी असल्याचे वास म्हणाले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणी