शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

Goa: बऱ्याच वर्षाची तहान लवकरच भागेल, गवळीवाडा येथील नवीन पाण्याची वाहिनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ

By पंकज शेट्ये | Updated: October 31, 2023 19:05 IST

Goa News: सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातर्फे घालण्यात येणाऱ्या भूमीगत पाण्याच्या वाहीनीमुळे भविष्यात गवळीवाडा भागातील नागरिकांची पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याचा विश्वास आमदार ॲथनी वास यांनी व्यक्त केला.

- पंकज शेट्येवास्को - गवळीवाडा, केळशी भागातील अनियमीत पाणी पुरवठा समस्या दूर करण्यासाठी कुठ्ठाळीचे आमदार ॲथनी वास यांनी पावले उचलल्यानंतर तेथे स्वतंत्र पाणी पुरवठ्याची वाहीनी घालण्याच्या कामाचा मंगळवारी (दि.३१) शुभारंभ झाला. २० लाख खर्चून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागातर्फे घालण्यात येणाऱ्या भूमीगत पाण्याच्या वाहीनीमुळे भविष्यात गवळीवाडा भागातील नागरिकांची पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याचा विश्वास आमदार ॲथनी वास यांनी व्यक्त केला.

कुठ्ठाळी मतदारसंघातील केळशी पंचायतीत असलेल्या गवळीवाडा भागात सुमारे १०० कुटूंबे राहतात. सुमारे ५० वर्षपासून तेथील नागरिकांना अनियमीत पाणी पुरवठ्याचा बराच त्रास सोसावा लागतो. तेथील नागरिकांना वेर्णा औद्योगिक वसाहतीतील पाण्याच्या वाहीनीतून पाणी पुरवठा केला जातो. तेथे राहणाऱ्या नागरिकांना दिवसाला फक्त अर्धातास तर कधी त्याहून कमी वेळासाठी पाणी पुरवठा होत असून काहीवेळा पाणी पुरवठा होत नसल्याची माहीती ग्रामस्थांनी दिली. तेथील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्यात यावी अशी मागणी तेथे राहणाऱ्या नागरिकांनी आमदार ॲथनी वास यांच्याशी केली होती. गवळीवाडा भागातील पाण्याची समस्या लवकरच दूर करणार असल्याचे आश्वासन वास यांनी काही काळापूर्वी दिल्यानंतर त्यांनी ती समस्या दूर करण्यासाठी पावले उचलली होती.

आमदार वास यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या भागात स्वतंत्र पाण्याची भूमीगत वाहीनी घालण्याच्या कामाचा मंगळवारी शुभारंभ केला. सुमारे २० लाख खर्चुन पाण्याची ती वाहीनी घालण्यात येणार आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर गवळीवाडा भागातील लोकांची पाण्याची समस्या पूर्णपणे दूर होणार असल्याची माहीती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. 

पाण्याची वाहीनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार वास यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांच्याबरोबर कुठ्ठाळी जिल्हा पंचायत सदस्या मेरसीयाना वास, केळशी पंचायतीचे सरपंच एफ एक्स फीगरेदो, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता नरेश पैंगीणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वाहीनी घालण्याच्या कामाचा शुभारंभ झाल्यानंतर बोलताना ह्या कामाची सुरवात झाल्याने मला अत्यंत आनंद झाल्याचे वास म्हणाले. ५० वर्षाहून अधिक काळापासून गवळीवाडा भागातील नागरिकांना अनियमीत पाणी पुरवठ्याचा त्रास सोसावा लागत होता. त्या गावातील नागरिकांनी मला संपर्क करून पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी केल्यानंतर त्यासाठी मी त्वरित पावले उचलली. मी सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांना संपर्क करून गवळीवाडा भागातील लोकांची पाण्याची समस्या दूर करण्याची मागणी केली होती. त्यांनी तेथील पाण्याची समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी नवीन पाण्याची वाहीनी घालण्याबाबत पावले उचलल्याने मी सार्वजनिक बांधकाममंत्री निलेश काब्राल यांचा आभारी असल्याचे वास म्हणाले.

टॅग्स :goaगोवाWaterपाणी