शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

गोवा : खाणप्रश्नी फेरविचार याचिका सादर करणार की नाही? मंगळवारी मंत्र्यांची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 20:34 IST

येत्या मंगळवारी तीन मंत्र्यांच्या समितीची तथा मंत्रिमंडळ सल्लागार समितीची बैठक होत असून त्या बैठकीवेळी याविषयी चर्चा होणार आहे.

पणजी : राज्यातील खनिज खाणींवरील बंदीच्या निवाडय़ाबाबत सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करायची की नाही हे सरकार अजून ठरवू शकलेले नाही. ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांच्या सल्ल्याच्या प्रतिक्षेत अजुनही गोवा सरकार आहे. येत्या मंगळवारी तीन मंत्र्यांच्या समितीची तथा मंत्रिमंडळ सल्लागार समितीची बैठक होत असून त्या बैठकीवेळी याविषयी चर्चा होणार आहे. गेल्या 7 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने गोव्यातील सर्व खनिज लिजेस रद्द ठरविणारा आदेश दिला व खाणी 15 फेब्रुवारीपासून बंद झाल्या. सगळ्य़ाच मोठय़ा खनिज कंपन्या सध्या कामगार कपात करू लागल्या आहेत. सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याचा विचार यापूर्वी व्यक्त केला. फेरविचार याचिका सादर करावी की नाही याविषयी साळवे यांच्याकडून सल्ला घ्यावा असे ठरले. साळवे यांच्याकडे विषय पाठवून देण्यात आला आहे. दोन दिवसांत सल्ला कळेल, असे साळवे यांच्याकडून सांगण्यात आल्याचे मुख्य सचिवांनी तीन मंत्र्यांच्या समितीला सांगितले होते. तथापि, शुक्रवारी रात्रीर्पयत तरी सल्ला आलेला नाही असे एका मंत्र्याने लोकमतला सांगितले.

गोवा खनिज निर्यातदार संघटनेने तसेच काही खाण मालकांनीही स्वतंत्रपणो देशातील काही ज्येष्ठ वकिलांकडे सल्ला मागितला. फेरविचार याचिका सादर करावी की अन्य कोणता मार्ग पत्करावा याविषयी खनिज व्यवसायिकांनीही सल्ला मागितली तरी, अजून सल्ला आलेला नाही. तीन मंत्र्यांच्या समितीपैकी एक मंत्री विजय सरदेसाई यांनी शनिवारी लोकमतला सांगितले, की सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा हा स्पष्ट नाही. त्यात अनेक विषय आहेत. तसेच गोव्याचा खनिज प्रश्नही जटील आहे. त्यामुळे कदाचित वकीलांना सल्ला देण्यास वेळ लागत असावा. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले, की येत्या मंगळवारी मंत्र्यांची समिती याविषयाबाबत चर्चा करील. मंगळवार्पयत साळवे यांच्याकडून सल्ला येऊ शकतो.

काही खाण कंपन्यांनी कामगार कपात सुरू केल्यानेही सरकारवर दबाव येत आहे. वेदांता-सेझाने सर्वप्रथम कर्मचारी व अधिका:यांना घरीच राहण्याचा आदेश दिला. त्यानंतर अन्य खाण कंपन्याही त्याच मार्गाने जाऊ लागल्या आहेत. काही खाण कंपन्यांनी टँकरद्वारे गावात लोकांना पाणी पुरविणो, व्यायामशाळा, कँटिन चालविणो बंद केले आहे. वाहतूक व्यवस्थाही बंद केली आहे. मात्र सरकार खाण कंपन्यांचे काही बिघडवू शकलेले नाही.

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळा