शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

गोवा कोळसा हब बनणार नाही, प्रदूषणावर उपाय निघेल : भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 19:19 IST

गोव्याचे रुपांतर कोळसा हबमध्ये होणार नाही. कोळसा हाताळणीमुळे वास्को शहरात होत असलेल्या प्रदूषणाविरुद्ध उपाययोजना केली जात आहे. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी गेल्या ऑगस्टमध्ये केंद्र सरकारला पत्र लिहून कोळसा हाताळणीच्या विस्तार प्रकल्पांना मान्यता देऊ नये अशी विनंतीही केली असल्याचे गोवा प्रदेश भाजपने शुक्रवारी येथे स्पष्ट केले.

पणजी : गोव्याचे रुपांतर कोळसा हबमध्ये होणार नाही. कोळसा हाताळणीमुळे वास्को शहरात होत असलेल्या प्रदूषणाविरुद्ध उपाययोजना केली जात आहे. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी गेल्या ऑगस्टमध्ये केंद्र सरकारला पत्र लिहून कोळसा हाताळणीच्या विस्तार प्रकल्पांना मान्यता देऊ नये अशी विनंतीही केली असल्याचे गोवा प्रदेश भाजपने शुक्रवारी येथे स्पष्ट केले.

भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की गोव्याला कोळसा हब बनविले जात आहे अशा प्रकारची टीका विरोधी काँग्रेस पक्ष व काही एनजीओ सध्या करत आहेत. गोव्यात जिंदाल व अदानी यांच्या कंपन्यांना कोळसा हाताळणी करण्यासाठी 2क्क्5 सालापूर्वी काँग्रेसनेच मान्यता दिली होती. आता काँग्रेसवाले भाजप सरकारला दोष देत आहेत. कोळसा वाहतुकीमुळे वास्कोवासियांना अडचणींना सामोरे जावे लागते ही गोष्ट आम्ही मान्य करतो. वास्कोत 17 ब रस्त्याचे काम सुरू आहे. त्याची कनेक्टीवीटी ही मुरगाव बंदराशी असेल. त्यानंतर वास्कोमधील त्रस संपुष्टात येतील.

नाईक म्हणाले, की कोळसा हाताळणी पूर्णपणो बंद करता येणार नाही. प्रदूषणाविरुद्ध भूमिका घ्यायला हवी, कोळशाविरुद्ध नव्हे. कोळसाच नको म्हणणा:यांनी वीज वापरणो बंद करावे. कोळशापासून परराज्यांमध्ये वीजनिर्मिती होत असते. तेथील लोक प्रदूषण सहन करतात म्हणून आम्हाला वीज मिळते. कोळसा प्रदूषणाविरुद्ध वास्कोत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री र्पीकर प्रयत्नशील आहेत. त्यांनी केंद्राला यापूर्वी पत्रही लिहिले आहे. गोव्यात सर्वच प्रकल्पांना विरोध करणो योग्य नव्हे. विरोध होत असल्यास प्रकल्प सिंधुदुर्गमधील विजयदुर्गला नेऊ असे विधान त्याचमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

प्रारंभी पणजीत कॅसिनोंना परवाने देखील काँग्रेसच्या राजवटीत देण्यात आले होते. भाजप सरकार सत्तेवर आले नसते तर पणजीचे मकाव झाले असते. कॅसिनोंबाबतचे सरकारचे धोरण येत्या डिसेंबरमध्ये येईल. कॅसिनो उद्योगावर अवलंबून असलेल्या विविध घटकांशी चर्चा करून सरकार धोरण ठरवत आहे, असे नाईक यांनी सांगितले. सरकारला हप्ते जातात म्हणून सरकार गप्प आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केला आहे. गेले तीन महिने रेजिनाल्ड हे गप्प होते, त्यावेळी त्यांना हप्ते मिळत होते का असा प्रश्न आपण विचारत असल्याचे नाईक म्हणाले. 

टॅग्स :goaगोवा