शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

गोवा कोळसा हब बनणार नाही, प्रदूषणावर उपाय निघेल : भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 19:19 IST

गोव्याचे रुपांतर कोळसा हबमध्ये होणार नाही. कोळसा हाताळणीमुळे वास्को शहरात होत असलेल्या प्रदूषणाविरुद्ध उपाययोजना केली जात आहे. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी गेल्या ऑगस्टमध्ये केंद्र सरकारला पत्र लिहून कोळसा हाताळणीच्या विस्तार प्रकल्पांना मान्यता देऊ नये अशी विनंतीही केली असल्याचे गोवा प्रदेश भाजपने शुक्रवारी येथे स्पष्ट केले.

पणजी : गोव्याचे रुपांतर कोळसा हबमध्ये होणार नाही. कोळसा हाताळणीमुळे वास्को शहरात होत असलेल्या प्रदूषणाविरुद्ध उपाययोजना केली जात आहे. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी गेल्या ऑगस्टमध्ये केंद्र सरकारला पत्र लिहून कोळसा हाताळणीच्या विस्तार प्रकल्पांना मान्यता देऊ नये अशी विनंतीही केली असल्याचे गोवा प्रदेश भाजपने शुक्रवारी येथे स्पष्ट केले.

भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, की गोव्याला कोळसा हब बनविले जात आहे अशा प्रकारची टीका विरोधी काँग्रेस पक्ष व काही एनजीओ सध्या करत आहेत. गोव्यात जिंदाल व अदानी यांच्या कंपन्यांना कोळसा हाताळणी करण्यासाठी 2क्क्5 सालापूर्वी काँग्रेसनेच मान्यता दिली होती. आता काँग्रेसवाले भाजप सरकारला दोष देत आहेत. कोळसा वाहतुकीमुळे वास्कोवासियांना अडचणींना सामोरे जावे लागते ही गोष्ट आम्ही मान्य करतो. वास्कोत 17 ब रस्त्याचे काम सुरू आहे. त्याची कनेक्टीवीटी ही मुरगाव बंदराशी असेल. त्यानंतर वास्कोमधील त्रस संपुष्टात येतील.

नाईक म्हणाले, की कोळसा हाताळणी पूर्णपणो बंद करता येणार नाही. प्रदूषणाविरुद्ध भूमिका घ्यायला हवी, कोळशाविरुद्ध नव्हे. कोळसाच नको म्हणणा:यांनी वीज वापरणो बंद करावे. कोळशापासून परराज्यांमध्ये वीजनिर्मिती होत असते. तेथील लोक प्रदूषण सहन करतात म्हणून आम्हाला वीज मिळते. कोळसा प्रदूषणाविरुद्ध वास्कोत उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री र्पीकर प्रयत्नशील आहेत. त्यांनी केंद्राला यापूर्वी पत्रही लिहिले आहे. गोव्यात सर्वच प्रकल्पांना विरोध करणो योग्य नव्हे. विरोध होत असल्यास प्रकल्प सिंधुदुर्गमधील विजयदुर्गला नेऊ असे विधान त्याचमुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

प्रारंभी पणजीत कॅसिनोंना परवाने देखील काँग्रेसच्या राजवटीत देण्यात आले होते. भाजप सरकार सत्तेवर आले नसते तर पणजीचे मकाव झाले असते. कॅसिनोंबाबतचे सरकारचे धोरण येत्या डिसेंबरमध्ये येईल. कॅसिनो उद्योगावर अवलंबून असलेल्या विविध घटकांशी चर्चा करून सरकार धोरण ठरवत आहे, असे नाईक यांनी सांगितले. सरकारला हप्ते जातात म्हणून सरकार गप्प आहे, असा आरोप काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केला आहे. गेले तीन महिने रेजिनाल्ड हे गप्प होते, त्यावेळी त्यांना हप्ते मिळत होते का असा प्रश्न आपण विचारत असल्याचे नाईक म्हणाले. 

टॅग्स :goaगोवा