शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
3
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
4
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
5
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
8
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
9
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
10
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
11
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
12
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

विकसित भारताचे उद्दिष्ट गोवा सर्वात आधी गाठेल: ओम बिर्ला

By किशोर कुबल | Updated: June 15, 2023 18:33 IST

देशभरात विधानसभांचे कामकाज कमी दिवस चालते याबाबत व्यक्त केली चिंता

पणजी : 'विकसित भारत : २०४७' चे उद्दिष्ट गोवा सरकार सर्वात आधी गाठेल, असा विश्वास लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केला. विधानसभांचे कामकाज कमी दिवस चालते ही चिंतेची बाब असल्याचे नमूद करून बिर्ला म्हणाले की, गोव्यात मात्र ४० दिवस कामकाज होते ही चांगली गोष्ट आहे. गोवा भेटीवर आलेले बिर्ला यांनी आज विधानसभेच्या सभागृहात आजी- माजी आमदार, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक जिल्हा पंचायत सदस्य यांना 'विकसित भारत २०४७ : लोकप्रतिनिधींची भूमिका' या विषयावर संबोधले.

सर्व सातही विरोधी आमदारांनी बिर्ला यांच्या भाषणावर बहिष्कार घातला. व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते. बिर्ला म्हणाले की, ' कायदे बनविताना विधानसभेत व्यापक चर्चा व्हायला हवी. जनतेला अधिकार देण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आम्ही कायदे बनवतो तेव्हा चर्चा ही व्हायलाच हवी. आजकाल कामकाजाचे दिवस कमी होत चालले आहेत हे योग्य नव्हे. विधानसभेत जेवढी जास्त चर्चा होईल तेवढे चांगले कायदे निर्माण होतील. लोकप्रतिनिधींनी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जनतेशी संवाद वाढवावा.

गोवा लहान राज्य आहे म्हणून येथील लोकांच्या अपेक्षाही कदाचित जास्त असतील. परंतु त्यातूनही प्राथमिकता निवडा आणि पुढे जा, असे आवाहन बिर्ला यांनी केले. लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी मोठी आहे. जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्या. ' विरोधासाठी विरोध नको' ते म्हणाले की, 'आज-काल केवळ विरोधासाठी विरोध करण्याची नवीन प्रवृत्ती आली आहे. सरकारच्या धोरणावर टीका केली जाते. परंतु टीका करणाऱ्यांनी धोरणांची अंमलबजावणी योग्यरीत्या कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शनसुद्धा करायला हवे. पुढील २५ वर्षात देश पूर्णपणे विकसित करण्यासाठी सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न करावेत. आव्हाने अनेक आहेत, परंतु त्याविरुद्ध लढण्याचे सामर्थ्यही आमच्याकडे आहे. कुशल नेतृत्व आहे.

जगाला नवीन काहीतरी करून दाखवण्याची क्षमता आहे. गोव्याबद्दल स्तुती करताना बिर्ला म्हणाले की, 'गोव्याला उशिरा मुक्ती मिळाली. परंतु विकासाच्या बाबतीत मात्र हा प्रदेश मागे राहिला नाही. शिक्षण, पर्यटन या सर्व बाबतीत आघाडीवर आहे. त्यामुळे गोव्याकडून आमच्या मोठ्या अपेक्षा आहेत. सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न केल्यास 'विकसित भारत २०४७' चे ध्येय आम्ही सहजपणे गाठू शकू.