शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विकसित भारताचे उद्दिष्ट गोवा सर्वात आधी गाठेल: ओम बिर्ला

By किशोर कुबल | Updated: June 15, 2023 18:33 IST

देशभरात विधानसभांचे कामकाज कमी दिवस चालते याबाबत व्यक्त केली चिंता

पणजी : 'विकसित भारत : २०४७' चे उद्दिष्ट गोवा सरकार सर्वात आधी गाठेल, असा विश्वास लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केला. विधानसभांचे कामकाज कमी दिवस चालते ही चिंतेची बाब असल्याचे नमूद करून बिर्ला म्हणाले की, गोव्यात मात्र ४० दिवस कामकाज होते ही चांगली गोष्ट आहे. गोवा भेटीवर आलेले बिर्ला यांनी आज विधानसभेच्या सभागृहात आजी- माजी आमदार, सरपंच, उपसरपंच, नगरसेवक जिल्हा पंचायत सदस्य यांना 'विकसित भारत २०४७ : लोकप्रतिनिधींची भूमिका' या विषयावर संबोधले.

सर्व सातही विरोधी आमदारांनी बिर्ला यांच्या भाषणावर बहिष्कार घातला. व्यासपीठावर सभापती रमेश तवडकर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते. बिर्ला म्हणाले की, ' कायदे बनविताना विधानसभेत व्यापक चर्चा व्हायला हवी. जनतेला अधिकार देण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आम्ही कायदे बनवतो तेव्हा चर्चा ही व्हायलाच हवी. आजकाल कामकाजाचे दिवस कमी होत चालले आहेत हे योग्य नव्हे. विधानसभेत जेवढी जास्त चर्चा होईल तेवढे चांगले कायदे निर्माण होतील. लोकप्रतिनिधींनी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून जनतेशी संवाद वाढवावा.

गोवा लहान राज्य आहे म्हणून येथील लोकांच्या अपेक्षाही कदाचित जास्त असतील. परंतु त्यातूनही प्राथमिकता निवडा आणि पुढे जा, असे आवाहन बिर्ला यांनी केले. लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी मोठी आहे. जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्या. ' विरोधासाठी विरोध नको' ते म्हणाले की, 'आज-काल केवळ विरोधासाठी विरोध करण्याची नवीन प्रवृत्ती आली आहे. सरकारच्या धोरणावर टीका केली जाते. परंतु टीका करणाऱ्यांनी धोरणांची अंमलबजावणी योग्यरीत्या कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शनसुद्धा करायला हवे. पुढील २५ वर्षात देश पूर्णपणे विकसित करण्यासाठी सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न करावेत. आव्हाने अनेक आहेत, परंतु त्याविरुद्ध लढण्याचे सामर्थ्यही आमच्याकडे आहे. कुशल नेतृत्व आहे.

जगाला नवीन काहीतरी करून दाखवण्याची क्षमता आहे. गोव्याबद्दल स्तुती करताना बिर्ला म्हणाले की, 'गोव्याला उशिरा मुक्ती मिळाली. परंतु विकासाच्या बाबतीत मात्र हा प्रदेश मागे राहिला नाही. शिक्षण, पर्यटन या सर्व बाबतीत आघाडीवर आहे. त्यामुळे गोव्याकडून आमच्या मोठ्या अपेक्षा आहेत. सर्वांनी सामूहिकपणे प्रयत्न केल्यास 'विकसित भारत २०४७' चे ध्येय आम्ही सहजपणे गाठू शकू.