शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Goa: अजूनही शांता आहोत.. दुर्गा पण बनू शकतो, ऐन नवरात्रात भोमच्या महिला कडाडल्या

By आप्पा बुवा | Updated: October 22, 2023 23:25 IST

Goa: सरकारने आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये अशा शब्दात भोम येथील महिलांनी ऐन नवरात्र मध्ये सरकारला इशारा दिला आहे.

- अप्पा बुवा  फोंडा - सरकारने दडपशाही चालवलेली असताना सुद्धा आम्ही अजून पर्यंत शांता  बनून राहिलो आहोत. परंतु ज्या तऱ्हेने सरकार प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत आहे ते पाहता आम्ही दुर्गा पण होऊ शकतो. सरकारने आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये अशा शब्दात भोम येथील महिलांनी ऐन नवरात्र मध्ये सरकारला इशारा दिला आहे.

रविवारी संध्याकाळी नागझरकर मंदिर परिसरात भोम येथील नागरिक गोळा झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश होता . पत्रकारांची बोलताना सर्व महिलांनी कोणत्याही परिस्थितीत गाव धोक्यात घालून प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका घेतला. प्रसंगी तीव्र लढा देण्याची तयारी सुद्धा ठेवण्याचा मनोदय बोलून दाखवला.

संपूर्ण आंदोलनाचे निमंत्रक संजय नाईक यावेळी बोलताना म्हणाले की सरकार नक्की काय लपवत आहे हे त्यांनी स्पष्ट येऊन लोकांना सांगावे. भोम संदर्भात सरकारची विविध खाती वेगवेगळी विधाने करत आहेत. काहीजण म्हणतात दोन घरे जाणार आहेत. काहीजण म्हणतात काहीच जाणार नाही. तर काहीजण आणखी काही वक्तव्य करत आहेत. एका बाजूने सरकार म्हणते की गाव देशोधडीला लागणार नाही तर दुसऱ्या बाजूने सरकारचे अधिकारी म्हणतात की जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. यामुळे इथले लोक खवळलेले असून सरकारने नक्की काय ते लोकांना समोर येऊन सांगावे. प्रशासन जोपर्यंत लोकांची समजूत काढत नाहीत व लोक प्रकल्पाविषयी समाधानी होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहोत. हे काम कसेच होऊ देणार नाही. ह्या बाबतीत आम्ही सरकारला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. तो आणखीन आठ दिवसात संपत आहे. ह्या आठ दिवसात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिक व अधिकाऱ्यांची भेट घडवून आणावी व लोकांना व्यवस्थित काय ते समजावून सांगावे.तसेच आतापर्यंत जो लपाछपीचा खेळ चालू आहे तो अगोदर बंद करावा.

स्थानिक आमदार गोविंद गावडे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की इथल्या आमदाराला लोकांचे काहीच पडून गेलेले नाही. त्यांचीच काही माणसे सदरच्या प्रकल्पावरून सरकारला मदत करत आहेत. ते वीस लोक कोण याची आम्हाला माहिती मिळालेली आहे. योग्य वेळ येताच त्या 20 लोकांची नावे आम्ही जाहीर करू.  त्या वीस लोकांना गावाचे काहीच पडून गेले नाही. फक्त आपला व आपल्या राजकर्त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी ते भोळ्या बावड्या ग्रामस्थांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत.

चार दिवसांपूर्वी सरकारचे अधिकारी सर्वेक्षण करायला आले होते. तो मुद्दा घेऊन  ते म्हणाले की जर काहीच लपवायचे नाही तर मग सरकारी अधिकारी अपरात्री इथे येऊन  काम का करतात . ह्या बाबतीत स्थानिक पंचायत मंडळाला सुद्धा काहीच माहिती कसे नाही. सर्वेक्षणाला गावात येण्यापूर्वी निदान पंचायत मंडळाला तरी विश्वासात घ्या. यापुढे लोकांना न सांगता गावात सर्वेक्षण करायला आल्यास लोकांच्या सहनशक्तीचा उद्रेक होऊ शकतो. परवा जर काही अनुसूचित प्रकार घडला असता तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती. आमच्या लोकांनी त्यावेळी संयम दाखवला. परंतु प्रत्येक वेळेस शेपटीवर पाय ठेवण्याचा प्रकार झाल्यास लोकांचा तोल ढळू शकतो हे सरकारने लक्षात घ्यावे.

आगामी ग्रामसभेत या विषयावरून आम्ही पंचायत मंडळाकडून ठोस काय ते जाणून घेणार आहोत. निदान त्यावेळी तरी पंचायत मंडळांनी ते गावाबरोबर आहेत की सरकार बरोबर आहेत हे स्पष्ट करावे. पंचायत मंडळातील काही पंच गावाबरोबर आहेत हे आम्हाला माहीत आहे. परंतु काही झारीतील शुक्राचार्य मात्र गावावर नांगर फिरवू पहात आहेत.

टॅग्स :goaगोवा