शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

Goa: अजूनही शांता आहोत.. दुर्गा पण बनू शकतो, ऐन नवरात्रात भोमच्या महिला कडाडल्या

By आप्पा बुवा | Updated: October 22, 2023 23:25 IST

Goa: सरकारने आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये अशा शब्दात भोम येथील महिलांनी ऐन नवरात्र मध्ये सरकारला इशारा दिला आहे.

- अप्पा बुवा  फोंडा - सरकारने दडपशाही चालवलेली असताना सुद्धा आम्ही अजून पर्यंत शांता  बनून राहिलो आहोत. परंतु ज्या तऱ्हेने सरकार प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न करत आहे ते पाहता आम्ही दुर्गा पण होऊ शकतो. सरकारने आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये अशा शब्दात भोम येथील महिलांनी ऐन नवरात्र मध्ये सरकारला इशारा दिला आहे.

रविवारी संध्याकाळी नागझरकर मंदिर परिसरात भोम येथील नागरिक गोळा झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश होता . पत्रकारांची बोलताना सर्व महिलांनी कोणत्याही परिस्थितीत गाव धोक्यात घालून प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका घेतला. प्रसंगी तीव्र लढा देण्याची तयारी सुद्धा ठेवण्याचा मनोदय बोलून दाखवला.

संपूर्ण आंदोलनाचे निमंत्रक संजय नाईक यावेळी बोलताना म्हणाले की सरकार नक्की काय लपवत आहे हे त्यांनी स्पष्ट येऊन लोकांना सांगावे. भोम संदर्भात सरकारची विविध खाती वेगवेगळी विधाने करत आहेत. काहीजण म्हणतात दोन घरे जाणार आहेत. काहीजण म्हणतात काहीच जाणार नाही. तर काहीजण आणखी काही वक्तव्य करत आहेत. एका बाजूने सरकार म्हणते की गाव देशोधडीला लागणार नाही तर दुसऱ्या बाजूने सरकारचे अधिकारी म्हणतात की जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. यामुळे इथले लोक खवळलेले असून सरकारने नक्की काय ते लोकांना समोर येऊन सांगावे. प्रशासन जोपर्यंत लोकांची समजूत काढत नाहीत व लोक प्रकल्पाविषयी समाधानी होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार आहोत. हे काम कसेच होऊ देणार नाही. ह्या बाबतीत आम्ही सरकारला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. तो आणखीन आठ दिवसात संपत आहे. ह्या आठ दिवसात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिक व अधिकाऱ्यांची भेट घडवून आणावी व लोकांना व्यवस्थित काय ते समजावून सांगावे.तसेच आतापर्यंत जो लपाछपीचा खेळ चालू आहे तो अगोदर बंद करावा.

स्थानिक आमदार गोविंद गावडे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की इथल्या आमदाराला लोकांचे काहीच पडून गेलेले नाही. त्यांचीच काही माणसे सदरच्या प्रकल्पावरून सरकारला मदत करत आहेत. ते वीस लोक कोण याची आम्हाला माहिती मिळालेली आहे. योग्य वेळ येताच त्या 20 लोकांची नावे आम्ही जाहीर करू.  त्या वीस लोकांना गावाचे काहीच पडून गेले नाही. फक्त आपला व आपल्या राजकर्त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी ते भोळ्या बावड्या ग्रामस्थांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत.

चार दिवसांपूर्वी सरकारचे अधिकारी सर्वेक्षण करायला आले होते. तो मुद्दा घेऊन  ते म्हणाले की जर काहीच लपवायचे नाही तर मग सरकारी अधिकारी अपरात्री इथे येऊन  काम का करतात . ह्या बाबतीत स्थानिक पंचायत मंडळाला सुद्धा काहीच माहिती कसे नाही. सर्वेक्षणाला गावात येण्यापूर्वी निदान पंचायत मंडळाला तरी विश्वासात घ्या. यापुढे लोकांना न सांगता गावात सर्वेक्षण करायला आल्यास लोकांच्या सहनशक्तीचा उद्रेक होऊ शकतो. परवा जर काही अनुसूचित प्रकार घडला असता तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती. आमच्या लोकांनी त्यावेळी संयम दाखवला. परंतु प्रत्येक वेळेस शेपटीवर पाय ठेवण्याचा प्रकार झाल्यास लोकांचा तोल ढळू शकतो हे सरकारने लक्षात घ्यावे.

आगामी ग्रामसभेत या विषयावरून आम्ही पंचायत मंडळाकडून ठोस काय ते जाणून घेणार आहोत. निदान त्यावेळी तरी पंचायत मंडळांनी ते गावाबरोबर आहेत की सरकार बरोबर आहेत हे स्पष्ट करावे. पंचायत मंडळातील काही पंच गावाबरोबर आहेत हे आम्हाला माहीत आहे. परंतु काही झारीतील शुक्राचार्य मात्र गावावर नांगर फिरवू पहात आहेत.

टॅग्स :goaगोवा