शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील जमिनी सेझपासून मुक्त करण्याचा प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 14:41 IST

गोव्यातील एकूण सुमारे 38 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन काही सेझ कंपन्यांच्या ताब्यातून मुक्त करण्याचा प्रयत्न गोवा सरकारने नव्याने सुरू केला आहे.

पणजी : गोव्यातील एकूण सुमारे 38 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन काही सेझ कंपन्यांच्या ताब्यातून मुक्त करण्याचा प्रयत्न गोवा सरकारने नव्याने सुरू केला आहे. सेझ कंपन्यांनी जमिनींच्या खरेदीवेळी सरकारजमा केलेली रक्कम त्यांना परत देऊन ह्या जमिनी मोकळ्य़ा करून घ्याव्यात अशी योजना सरकारच्या गोवा औद्योगिक विकास महामंडळाने (आयडीसी) आखली आहे.

गोव्यात दहा-बारा वर्षापूर्वी एकूण सात खास आर्थिक विभाग (सेझ) आणण्यास त्यावेळच्या सरकारने काही कंपन्यांना मान्यता दिली होती. वेर्णा या प्रसिद्ध औद्योगिक वसाहतीत तीन सेझ येणार होते. त्यावेळी राणे सरकार अधिकारावर होते व रहेजा, मेडिटेब स्पेशालिटीज आणि अन्य काही कंपन्यांना एकूण 38लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा सेझसाठी लिजवर मंजूर करण्यात आली होती. गोव्यात सेझ नको अशी भूमिका त्यावेळी स्वर्गीय माथानी साल्ढाणा व अन्य काही राजकीय नेत्यांनी घेतली व आंदोलन सुरू केले. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या मनोहर पर्रीकर यांनीही सेझविरुद्ध भूमिका घेतली. काही सेझ कंपन्यांना अर्ज केल्यानंतर लगेच जमीन दिली गेली व तिही फार कमी किंमतीत असा मनोहर पर्रीकर व भाजपाने आक्षेप घेऊन सेझविरोधी आंदोलनाला बळ दिले. गोव्यात सेझ आणण्यास मान्यता देण्यामागे रोजगार निर्मिती हा त्यावेळच्या सरकारचा हेतू होता असे सांगितले जाते. पण गोव्यासारख्या छोटय़ा प्रदेशात सेझ आल्यानंतर साधनसुविधांवर प्रचंड ताण येईल, गोव्याला सेझ परवडणार नाहीत अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

2007 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर दिगंबर कामत हे मुख्यमंत्री बनले व त्यांनी जनआंदोलनाची कदर करून सर्व सेझ रद्द केले. सर्व सेझ फेरअधिसूचित करून ते रद्द करण्यासाठी कामत व माजी राज्यसभा खासदार स्वर्गीय शांताराम नाईक यांनी प्रयत्न केले. यामुळे केंद्र सरकारने गोव्यात येऊ घातलेले सेझ रद्द केले. मात्र बडय़ा सेझ कंपन्यांकडे गोव्यातील जमिनी मात्र कायम राहिल्या. या जमिनींमध्ये काहीच उभे राहू शकले नाही, कारण विषय न्यायप्रविष्ट आहे. मात्र गोव्यात औषध निर्मितीसह आयटी व अन्य क्षेत्रंमधील जे नवे उद्योग येऊ पाहत आहेत, त्या उद्योगांना देण्यासाठी सरकारकडे व गोवा औद्योगिक विकास महामंडळाकडे जमीन नाही. 35 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन औद्योगिक वसाहतींमध्ये असली तरी, त्यावर सेझ कंपन्यांचा दावा आहे व दुस-या कुठच्या कंपनीला ती जमीन आयडीसी देऊ शकत नाही. सेझ कंपन्यांनी जमिनी परत करण्यास तयारी दाखवली आहे पण आपली रक्कम परत द्या व त्यावर 15 टक्के व्याजही द्या अशी मागणी केली आहे. गोवा औद्योगिक विकास महामंडळाने सेझ कंपन्यांचा हा प्रस्ताव विचारात घेतला आहे पण 15 टक्के व्याज दिले जाईल की मूळ रक्कम तेवढीच परत दिली जाईल ते स्पष्ट झालेले नाही. मात्र 10-12 वर्षांनंतर आता सेझ जमिनींचा गुंता सुटणे दृष्टीपथात आले असल्याचे राज्यातील उद्योजकांकडून मानले जात आहे. जमिनीच्या उपलब्धतेअभावी गोव्यात गुंतवणुकीचा ओघ थांबल्याने स्थानिक उद्योजकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. जर 38 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा मोकळी झाली तर, ती जमीन अन्य उद्योगांना लिजवर आम्ही देऊ शकू, असे आयडीसीच्या अधिका-यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :goaगोवा