शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात दहावीच्या सीमावर्ती परीक्षार्थींबाबत शालांत व उच्च माध्यमिक मंडळासमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 13:57 IST

महाराष्ट्रातील आरोंदा, सातार्डा, दोडामार्ग भागातून विद्यार्थी शिक्षणासाठी गोव्यात 

-  किशोर कुबल 

पणजी : गोव्यात दहावीच्या परीक्षा कधी होणार याबाबत विद्यार्थी, पालक यांच्यात उत्कंठा असली तरी गोवा बोर्डासमोर आणखी एक पेच निर्माण झाला आहे तो म्हणजे सीमाभागात काही विद्यालयांमध्ये शेजारी राज्यांमधून शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. सध्या हद्दी बंद असल्याने दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या या विद्यार्थ्यांचे काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

यावर तोडगा काढण्यासाठी सध्या विचार विनिमय चालू आहे. दरम्यान, इयत्ता बारावीचे पेपर तपासण्याचे काम उद्या गुरुवार, दि. २३ पासून सुरू होत आहे. गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी ही माहिती दिली. लॉकडाऊनमुळे बारावीचे तीन पेपर बाकी राहिलेले आहेत. परंतु ज्या विषयांची परीक्षा झालेली आहे, त्या विषयांचे पेपर उद्यापासून तपासण्याचे काम सुरू केले जाईल. त्यासाठी शिक्षकांना बोलावण्यात आलेले आहे. मार्गदर्शक तत्त्वे पाळूनच टप्प्याटप्प्याने पेपर तपासणी केली जाईल, असे निर्देश देण्यात आलेले आहेत.

पर्वरी आणि मडगाव अशा दोन केंद्रांवर पेपर तपासणी केली जाईल. २ एप्रिलपासून सुरु व्हावयाची इयत्ता दहावीची परीक्षा लॉकडाऊनमुळे पुढे ढकलावी लागल्याने ही परीक्षा कधी होणार याबाबत उत्कंठा आहे. शेजारी महाराष्ट्रातील आरोंदा, सातार्डा, दोडामार्ग भागातून शेजारी महाराष्ट्रामधून गोव्यातील केरी, हरमल, पेडणे, डिचोलीमधील शाळांमध्ये, तसेच माजाळी भागातून काणकोणमधील विद्यालयांमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. दहावीच्या

परीक्षेसाठी अशा विद्यार्थ्यांनीही नोंदणी केलेली आहे. सध्या हद्दी बंद असल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी गोव्यात येणे शक्य होणार नाही.  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडेही हा विषय उपस्थित करण्यात आलेला असून अशा विद्यार्थ्यांची स्वतंत्र केंद्र स्थापन करून व्यवस्था करता येईल का, याची चाचपणी केली जात आहे.

 

दरम्यान गोव्यातील विद्यालयांमध्ये आज पासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही आजपासून रुजू झाले आहेत. एकाचवेळी ३३ टक्क्यांपेक्षा अधिक उपस्थिती असता कामा नये.

शैक्षणिक वर्ष येत्या ३0 रोजी संपत असून, विद्यार्थ्यांचे निकाल तयार करणे.तसेच पुढील

शैक्षणिक वर्षाचे नियोजन आदी गोष्टी ते करतील. शिक्षण संचालिका वंदना राव यांनी

काढलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांचे तीन

गट करून सकाळी ८ ते दुपारी १२, सकाळी ८.३0 ते दुपारी १२.३0 आणि सकाळी ९ ते १ अशा कामाच्या वेळा ठरवाव्यात. सर्व सरकारी, अनुदानित शाळाप्रमुखांनी गरजेनुसार

आवश्यक तेवढ्याच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांना कामावर बोलवावे. घरातून काम करणारे कर्मचारी फोनवर उपलब्ध असणे आवश्यक आहे.