शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड; पुढील दीड वर्षातच सरकारला चांगले काम दाखविण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 07:39 IST

लोकमतने चार दिवसांपूर्वी सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करून छापले. गोव्यात फेब्रुवारी किंवा मार्च-२०२७ मध्ये निवडणूक होईल.

गोवा विधानसभेच्या निवडणुका पुढील चोवीस महिन्यांत होणार आहेत. २०२७ ला निवडणूक आहे, असे म्हटले जात असले व तांत्रिकदृष्ट्या ते खरे असले तरी, निवडणुकीसाठी फक्त २३-२४ महिनेच बाकी आहेत. फेब्रुवारी किंवा मार्च-२०२७ मध्ये निवडणूक होईल. त्यामुळे आता फक्त पुढील दीड वर्षातच सरकारला आपले चांगले काम दाखविण्याची संधी आहे. येत्या वर्षी सरकारला फील गुड फॅक्टर निर्माण करावाच लागेल. पण जनतेला दिलासा देणारे निर्णय घेण्याऐवजी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमसारखे प्रकल्प खासगी कंपन्यांना लीजवर देणे किंवा मोठ्या प्रमाणात संशयास्पद निर्णय घेत सुटणे, हे जनतेत नाराजी वाढवणारेच ठरणार आहे. काही मंत्र्यांना सक्रिय करून सरकारी खाती जनतेप्रति संवेदनशील करणे गरजेचे आहे. नोकरशाहीच्या पातळीवरील अकार्यक्षमता नष्ट करावी लागेल. सरकारी खात्यांमध्ये अजूनही लोकांना वारंवार हेलपाटे मारायला लावणारे अधिकारी आहेत.

पहिला टप्पा म्हणून मंत्रिमंडळाची फेररचना करावीच लागेल. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी वारंवार जाहीर केलेय की मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार केले जाईल. अलीकडेच ते दिल्लीला जाऊन आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीदेखील दिल्लीवारी केली. गृहमंत्री अमित शाह यांना भेटून मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ फेररचनेविषयी चर्चा केल्याची माहिती मिळते. कोणता मंत्री काम करतो, कोणता मंत्री आता थकलाय, कोणता मंत्री किती कमावतो याची सगळी माहिती मुख्यमंत्र्यांकडे आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडे त्यांची कुंडली असते. मध्यंतरी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष गोव्यात येऊन गेले. तेही काही मंत्री व आमदारांना भेटले. त्यांनी गोमंतकीय जनतेच्या मनाचा कानोसा पूर्वीही घेतला आहे.

मंत्र्यांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्री कधी तरी सादर करतील अशी जनतेला अपेक्षा आहे. प्रगतिपुस्तक मांडण्याची पद्धत पूर्वी होती. नंतर ती खंडित झाली. एकेकाळी माजी मुख्यमंत्री (स्व.) मनोहर पर्रीकर यांनीही आपल्या मंत्र्यांचे प्रगतिपुस्तक तयार करण्याचा प्रयत्न केला होता. सरकारच्या स्थापनेला एक-दोन वर्षे झाली की प्रत्येक मंत्र्याला स्वतंत्रपणे बोलावून घेऊन त्याच्या कामाचा, प्रगतीचा आढावा पर्रीकर घेत असत. विद्यमान मुख्यमंत्री सावंत यांनी अशी प्रक्रिया केल्याचे कधी दिसले नाही. त्यांच्या मंत्रिमंडळात काही सिनियर नेते मंत्री म्हणून काम करतात. त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन प्रथम होण्याची गरज आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे आताच हे काम करावे लागेल. काही मंत्र्यांवर कोणाचाच अंकुश नाही. त्यामुळे सोशल मीडियावर जनता राग व्यक्त करत आहे. 

फोंड्यासारख्या भागात लोकांना आताच पाण्यासाठी मोर्चे काढावे लागतात. उसगावातील महिला घागर घेऊन बांधकाम खात्याच्या कार्यालयात जातात. ही स्थिती सुधारणार आहे की नाही? 'हर घर जल'च्या घोषणा किती फसव्या आहेत, हे कळून येते. गोवा हागणदारीमुक्त झाला ही घोषणादेखील हास्यास्पद वाटते. विविध ठिकाणी गरिबांच्या झोपड्यांवर बुलडोझर फिरवून त्या नष्ट केल्या जात आहेत. मात्र या झोपडपट्ट्या एवढी वर्षे कशा उभ्या राहिल्या, सरकारी यंत्रणा काय करत होती, आमदार-मंत्री काय करत होते असा प्रश्न येतोच. पंचायती किंवा पालिकांनी डोळे बंद केले होते काय? गरीब आता बेघर होत आहेत. सरकारने एखादा धोरणात्मक निर्णय घेऊन लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी योजना आखावी लागेल.

लोकमतने चार दिवसांपूर्वी सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करून छापले. अर्थात प्रसारमाध्यमांकडून तयार केले जाणारे प्रगतिपुस्तक अधिकृत असत नाही. ते जनतेच्या मनात उमटणाऱ्या पडसादांचा आढावा असते किंवा ते केवळ एक प्रतिबिंब असते. मात्र तटस्थपणे व सत्याच्या जवळ राहून रिपोर्ट कार्ड तयार झाले तर ते कार्ड लोकांना आवडते. त्यामुळेच वाचकांनीही त्याचे स्वागत केले. मुख्यमंत्री सावंत यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वांचे रिपोर्ट कार्ड लोकमतने प्रसिद्ध केले. कोणते काम मंत्र्यांनी तीन वर्षांत केले, कोणते सार्वजनिक काम झालेले नाही, ते दाखवण्याचा प्रयत्न झाला. काही मंत्र्यांना वाटले की- आपल्यावर या रिपोर्ट कार्डमधून अन्याय झाला किंवा मूल्यमापन व्यवस्थित झाले नाही वगैरे. मात्र जनता येत्या २०२७ साली मतदानाद्वारे खरे मूल्यमापन करणारच आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंतPoliticsराजकारण