शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

ऐतिहासिक! गोव्यात दहावीचा निकाल ९२.४७ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 13:23 IST

गोवा बोर्डाच्या इतिहासात प्रथमच शालांत (दहावी) परीक्षेचा निकाल ९२.४७ टक्के एवढा विक्रमी निकाल लागला आहे. गेली सलग तीन वर्षे निकालाने नव्वदी पार केली होती यावर्षी हा विक्रमही मोडला.

ठळक मुद्देगोवा बोर्डाच्या इतिहासात प्रथमच शालांत (दहावी) परीक्षेचा निकाल ९२.४७ टक्के एवढा विक्रमी निकाल लागला आहे. गेली सलग तीन वर्षे निकालाने नव्वदी पार केली होती यावर्षी हा विक्रमही मोडला. ९८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात ६७ अनुदानित तर ३१ सरकारी माध्यमिक विद्यालये आहेत. 

पणजी - गोवा बोर्डाच्या इतिहासात प्रथमच शालांत (दहावी) परीक्षेचा निकाल ९२.४७ टक्के एवढा विक्रमी निकाल लागला आहे. गेली सलग तीन वर्षे निकालाने नव्वदी पार केली होती यावर्षी हा विक्रमही मोडला. ९८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात ६७ अनुदानित तर ३१ सरकारी माध्यमिक विद्यालये आहेत. 

गोवा शालांत मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी सकाळी ११.३0 वाजता पर्वरी येथे पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी बोर्डाचे सचिव भगिरथ शेट्ये, परीक्षा विभागप्रमुख ज्योत्ना सरीन उपस्थित होत्या. गेल्या सलग तीन ते चार वर्षात निकालाची टक्केवारी वाढण्याचे कारण विचारले असता सामंत म्हणाले की, ‘विद्यार्थी तसेच शिक्षकही जादा परिश्रम घेत असावेत. नववीमध्ये विद्यार्थी गळण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा हुशार विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाने संकेतस्थळावर उपलब्ध केल्या होत्या त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला.’ पेपर तपासणीबाबत सौम्य धोरण अवलंबिल्याचा सामंत यांनी इन्कार केला. 

१८,६८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातील १७,२७८ उत्तीर्ण झाले. एकूण २७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. ९२१५ मुलांनी परीक्षा दिली त्यातील ८५0६ उत्तीर्ण झाले. मुलं उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.३१ टक्के आहे. तर ९४६९ मुलींनी परीक्षा दिली. त्यातील ८७७२ उत्तीर्ण झाल्या. मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.६४ टक्के आहे. 

क्रीडा गुणांचा उत्तीर्ण होण्यासाठी २७९ जणांना लाभ

एकूण ७१२२ विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात आले. काही विषयांमध्ये नापास झाल्याने उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्यक्षात २७९ जणांना या गुणांचा लाभ झाला. ही टक्केवारी १.६१ टक्के इतकी आहे. 

३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या आणि ‘सुधारणा हवी’ असा शेरा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १४ जूनपासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी २५ मे ते १ जून या कालावधीत केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. २ जूननंतर प्रत्यक्ष अर्जही स्वीकारले जाणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत आणि त्यांना गुणांमध्ये सुधारणा हवी असेल तर त्यांनीही ही परीक्षा देता येईल. 

गोव्यातील गेल्या पाच वर्षातील शालांत निकाल

२0१४   - ८३.५१ टक्के     २0१५   -  ८५.१५ टक्के  २0१६   - ९0.९३ टक्के    २0१७   - ९१.५७ टक्के  २0१८   -  ९१.२७ टक्के  

टॅग्स :goaगोवाSSC Resultदहावीचा निकाल