शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

ऐतिहासिक! गोव्यात दहावीचा निकाल ९२.४७ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 13:23 IST

गोवा बोर्डाच्या इतिहासात प्रथमच शालांत (दहावी) परीक्षेचा निकाल ९२.४७ टक्के एवढा विक्रमी निकाल लागला आहे. गेली सलग तीन वर्षे निकालाने नव्वदी पार केली होती यावर्षी हा विक्रमही मोडला.

ठळक मुद्देगोवा बोर्डाच्या इतिहासात प्रथमच शालांत (दहावी) परीक्षेचा निकाल ९२.४७ टक्के एवढा विक्रमी निकाल लागला आहे. गेली सलग तीन वर्षे निकालाने नव्वदी पार केली होती यावर्षी हा विक्रमही मोडला. ९८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात ६७ अनुदानित तर ३१ सरकारी माध्यमिक विद्यालये आहेत. 

पणजी - गोवा बोर्डाच्या इतिहासात प्रथमच शालांत (दहावी) परीक्षेचा निकाल ९२.४७ टक्के एवढा विक्रमी निकाल लागला आहे. गेली सलग तीन वर्षे निकालाने नव्वदी पार केली होती यावर्षी हा विक्रमही मोडला. ९८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात ६७ अनुदानित तर ३१ सरकारी माध्यमिक विद्यालये आहेत. 

गोवा शालांत मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी सकाळी ११.३0 वाजता पर्वरी येथे पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी बोर्डाचे सचिव भगिरथ शेट्ये, परीक्षा विभागप्रमुख ज्योत्ना सरीन उपस्थित होत्या. गेल्या सलग तीन ते चार वर्षात निकालाची टक्केवारी वाढण्याचे कारण विचारले असता सामंत म्हणाले की, ‘विद्यार्थी तसेच शिक्षकही जादा परिश्रम घेत असावेत. नववीमध्ये विद्यार्थी गळण्याचे प्रमाण वाढले आहे. यंदा हुशार विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाने संकेतस्थळावर उपलब्ध केल्या होत्या त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला.’ पेपर तपासणीबाबत सौम्य धोरण अवलंबिल्याचा सामंत यांनी इन्कार केला. 

१८,६८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातील १७,२७८ उत्तीर्ण झाले. एकूण २७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. ९२१५ मुलांनी परीक्षा दिली त्यातील ८५0६ उत्तीर्ण झाले. मुलं उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.३१ टक्के आहे. तर ९४६९ मुलींनी परीक्षा दिली. त्यातील ८७७२ उत्तीर्ण झाल्या. मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.६४ टक्के आहे. 

क्रीडा गुणांचा उत्तीर्ण होण्यासाठी २७९ जणांना लाभ

एकूण ७१२२ विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात आले. काही विषयांमध्ये नापास झाल्याने उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्यक्षात २७९ जणांना या गुणांचा लाभ झाला. ही टक्केवारी १.६१ टक्के इतकी आहे. 

३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या आणि ‘सुधारणा हवी’ असा शेरा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १४ जूनपासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी २५ मे ते १ जून या कालावधीत केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. २ जूननंतर प्रत्यक्ष अर्जही स्वीकारले जाणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत आणि त्यांना गुणांमध्ये सुधारणा हवी असेल तर त्यांनीही ही परीक्षा देता येईल. 

गोव्यातील गेल्या पाच वर्षातील शालांत निकाल

२0१४   - ८३.५१ टक्के     २0१५   -  ८५.१५ टक्के  २0१६   - ९0.९३ टक्के    २0१७   - ९१.५७ टक्के  २0१८   -  ९१.२७ टक्के  

टॅग्स :goaगोवाSSC Resultदहावीचा निकाल