शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

गोव्याने पहिली इलेक्ट्रीक बस वापरून परत पाठवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 11:47 IST

इंजिन नाही, आवाज नाही, पेट्रोल-डिझेल नाही व प्रदूषण नाही अशा प्रकारची पहिली इलेक्ट्रिक बस गोवा सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाने तीन महिने गोव्यातील विविध रस्त्यांवर वापरली व परत हैदराबादच्या कंपनीकडे पाठवून दिली आहे.

पणजी : इंजिन नाही, आवाज नाही, पेट्रोल-डिझेल नाही व प्रदूषण नाही अशा प्रकारची पहिली इलेक्ट्रिक बस गोवा सरकारच्या कदंब वाहतूक महामंडळाने तीन महिने गोव्यातील विविध रस्त्यांवर वापरली व परत हैदराबादच्या कंपनीकडे पाठवून दिली आहे. गोव्याला इलेक्ट्रिक बस पसंत पडली. पण गोव्याच्या रस्त्यांवरून खरोखर यापुढे नव्या इलेक्ट्रिक बसगाड्या धावणार की फक्त प्रायोगिक तत्त्वावरच देखाव्यापुरती एक बस आणली गेली होती या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर तूर्त मिळत नाही.गोव्याची वाहतूक ही पर्यावरणास पूरक असावी व वाहतुकीमुळे पर्यावरणाला हानी पोहोचू नये, अशी भूमिका गोवा सरकारने इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन करताना घेतली होती. गेल्या 30 जानेवारी रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते गोव्यातील ह्या पहिल्या इलेक्ट्रिक बसचे पणजीत उद्घाटन करण्यात आले होते. वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर, कदंब वाहतूक महामंडळाचे अध्यक्ष कालरुस आल्मेदा आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री, वाहतूक मंत्री व इतरांनी मिळून पत्रकारांना सोबत घेऊन या बसगाडीतून पणजी ते बांबोळीपर्यंत फेरफटकाही मारला होता. या बसची बॅटरी चार्ज केल्यानंतर बसगाडी 250 किलोमीटर चालते. मग पुन्हा बॅटरी चार्ज करावी लागते. अशा प्रकारची बसगाडी चालवावी कशी याचे प्रशिक्षण कदंब वाहतूक महामंडळाच्या चालकांना देण्यात आले होते.गोव्यात एरव्ही बाकीच्या बसगाड्याकडून रोज 535 फे-या मारल्या जातात 18 हजार लिटर इंधन फस्त केले जाते. अशावेळी अधिकाधिक इलेक्ट्रिक बसगाड्या गोव्यातील रस्त्यांवरून धावल्या तर इंधनाचीही बचत होईल व प्रदूषणही टळेल, असा विचार सरकारने केला होता. जानेवारीत मोठ्या धूमधडाक्यात सुरू करण्यात आलेली इलेक्ट्रिक बसगाडी डोंगराळ भागातील रस्त्यांवर तसेच उंचसखल जागेवर चालते का याची पाहणी करण्यासाठी रोज ही बसगाडी विविध शहरे व गावांमधील रस्त्यांवर प्रवासी वाहतुकीसाठी कदंबकडून पाठवली जात होती. मोठीशी समस्या आली नाही.हैदराबादमधील गोल्ड स्टोन इन्फ्राटेक कंपनीने ही 2.45 कोटी रुपये खर्चाची गाडी कदंब वाहतूक महामंळाला प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यासाठी दिली होती. ही बस महामंडळाने खरेदी केली नव्हती. पण बस पसंत पडली तर अशा प्रकारच्या 10 बसगाडय़ा गोव्यातील रस्त्यांवरून धावण्यासाठी खरेदी केल्या जातील, असे सरकारने गेल्या जानेवारीत जाहीर केले होते. महामंडळाने बस चालवून ती हैदराबादच्या कंपनीकडे परत पाठवली आहे. ही बस गाडी वापरण्यासाठी किलोमीटरमागे फक्त 55 रुपयांचा देखभालीचा खर्च येतो. गोव्यातील रस्त्यांवर अशा प्रकारच्या अधिकाधिक बसगाड्या याव्यात असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर त्यावेळी म्हणाले होते. मात्र कदंब महामंडळाने पहिली-वहिली इलेक्ट्रिक बसगाडी परत पाठविल्यानंतर आता नव्या अशा प्रकारच्या बसगाड्या गोव्यात कधी धावतील ते स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :goaगोवा