शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
4
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
5
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
6
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
7
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
8
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
9
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
10
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
11
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
12
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
13
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
14
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
15
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
16
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
17
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
18
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
19
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं

Goa: आरजीची हुल्लडबाजी पूर्वनियोजित, सुदिन ढवळीकर यांचा आरोप

By किशोर कुबल | Updated: March 3, 2024 13:47 IST

Goa News: आरजीची हुल्लडबाजी हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करीत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

- किशोर कुबल पणजी - आरजीची हुल्लडबाजी हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करीत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. ढवळीकर म्हणाले की , 'दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मी अकरा जणांची नावे दिली होती. मडकई, फोंडा भागात याच व्यक्ती नेहमी गोंधळ घालत असतात. बोरी प्रकल्प तसेच मलनि:सारण व इतर प्रकल्पांना याच लोकांनी खो घातला. काल मडकई येथे याच लोकांनी हंगामा केला.'

ढवळीकर म्हणाले की 'मी कोणालाही अपशब्द वापरलेले नाहीत. तुम्ही येथे का आला आहात! एवढेच मी बोट वर करून मोठ्या आवाजात विचारले. काल सकाळी पावणे सातच्या सुमारास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा मला फोन आला. आरजीचे लोक गोंधळ घालणार आहेत, अशी कल्पना त्यांनी मला दिली. त्यानंतर मी पोलीस निरीक्षकांना फोन करून फार्मागुढी येथून विश्वजीत यांना बंदोबस्तात बांदोडा येथे आणण्यास सांगितले. फार्मागुडी येथे पोचल्यावर विश्वजीत यांनी आपण परत जातो असे मला कळविले. परंतु मी त्यांना सांगितले की, कार्यक्रमासाठी एक हजार लोक जमलेले आहेत. त्यांना नाराज करू नका. तुम्ही या. पोलीस निरीक्षक व मामलेदारांकडे मी बोललेलो आहे. कोणताही गैरप्रकार होणार नाही.'माझ्या आश्वासनानंतर विश्वजीत कार्यक्रमस्थळी आले. 

'समस्या मांडायला नव्हे तर हंगामा करायला झाले होते' 'विकसित भारत' सभेत मडकई मतदारसंघातील सहा ग्रामपंचायतींचे लोक आपल्या समस्या मांडणार होते. सरपंचही उपस्थित होते. लोकांची निवेदने घेण्यासाठी गटविकास अधिकारी बसले होते. परंतु ज्यांनी हुल्लडबाजी केली त्यांच्यापैकी एकानेही गटविकास अधिकाऱ्यांना कोणतेही निवेदन दिले नाही. ते समस्या मांडायला आले नव्हते तर हंगामा करायला झाले होते. या ठिकाणी आम आदमी पक्षाचेही कार्यकर्ते होते. परंतु ते शांत बसून होते. केवळ आरजीच्याच लोकांनी गैरकृत्य केले. हे लोक समाजाला कलंक आहेत. मी काहीही गैर बोललो नसताना माझ्याबद्दल अपप्रचार केला व माझे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी कोणाच्याही गळ्याला धरायला गेलो नाही किंवा आजवर कोणालाही अपशब्द वापरलेले नाहीत. उलट विश्वेशाने माझ्याबद्दल माझ्याच मालमत्ते देऊन गैर शब्द वापरलेले आहेत. या लोकांमुळे समाजाचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप करून या लोकांना अद्दल घडवायला हवी. या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता लोकसभा निवडणुकीत मडकईत या लोकांना किती मते मिळतात हे दिसून येईलच. या लोकांवर आताच कारवाई न  केल्यास काट्याचा नायटा होईल व ते समाजालाही भारी पडणार आहे,अशी भीती ढवळीकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :goaगोवा