शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Goa: आरजीची हुल्लडबाजी पूर्वनियोजित, सुदिन ढवळीकर यांचा आरोप

By किशोर कुबल | Updated: March 3, 2024 13:47 IST

Goa News: आरजीची हुल्लडबाजी हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करीत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

- किशोर कुबल पणजी - आरजीची हुल्लडबाजी हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करीत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. ढवळीकर म्हणाले की , 'दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मी अकरा जणांची नावे दिली होती. मडकई, फोंडा भागात याच व्यक्ती नेहमी गोंधळ घालत असतात. बोरी प्रकल्प तसेच मलनि:सारण व इतर प्रकल्पांना याच लोकांनी खो घातला. काल मडकई येथे याच लोकांनी हंगामा केला.'

ढवळीकर म्हणाले की 'मी कोणालाही अपशब्द वापरलेले नाहीत. तुम्ही येथे का आला आहात! एवढेच मी बोट वर करून मोठ्या आवाजात विचारले. काल सकाळी पावणे सातच्या सुमारास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा मला फोन आला. आरजीचे लोक गोंधळ घालणार आहेत, अशी कल्पना त्यांनी मला दिली. त्यानंतर मी पोलीस निरीक्षकांना फोन करून फार्मागुढी येथून विश्वजीत यांना बंदोबस्तात बांदोडा येथे आणण्यास सांगितले. फार्मागुडी येथे पोचल्यावर विश्वजीत यांनी आपण परत जातो असे मला कळविले. परंतु मी त्यांना सांगितले की, कार्यक्रमासाठी एक हजार लोक जमलेले आहेत. त्यांना नाराज करू नका. तुम्ही या. पोलीस निरीक्षक व मामलेदारांकडे मी बोललेलो आहे. कोणताही गैरप्रकार होणार नाही.'माझ्या आश्वासनानंतर विश्वजीत कार्यक्रमस्थळी आले. 

'समस्या मांडायला नव्हे तर हंगामा करायला झाले होते' 'विकसित भारत' सभेत मडकई मतदारसंघातील सहा ग्रामपंचायतींचे लोक आपल्या समस्या मांडणार होते. सरपंचही उपस्थित होते. लोकांची निवेदने घेण्यासाठी गटविकास अधिकारी बसले होते. परंतु ज्यांनी हुल्लडबाजी केली त्यांच्यापैकी एकानेही गटविकास अधिकाऱ्यांना कोणतेही निवेदन दिले नाही. ते समस्या मांडायला आले नव्हते तर हंगामा करायला झाले होते. या ठिकाणी आम आदमी पक्षाचेही कार्यकर्ते होते. परंतु ते शांत बसून होते. केवळ आरजीच्याच लोकांनी गैरकृत्य केले. हे लोक समाजाला कलंक आहेत. मी काहीही गैर बोललो नसताना माझ्याबद्दल अपप्रचार केला व माझे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी कोणाच्याही गळ्याला धरायला गेलो नाही किंवा आजवर कोणालाही अपशब्द वापरलेले नाहीत. उलट विश्वेशाने माझ्याबद्दल माझ्याच मालमत्ते देऊन गैर शब्द वापरलेले आहेत. या लोकांमुळे समाजाचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप करून या लोकांना अद्दल घडवायला हवी. या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता लोकसभा निवडणुकीत मडकईत या लोकांना किती मते मिळतात हे दिसून येईलच. या लोकांवर आताच कारवाई न  केल्यास काट्याचा नायटा होईल व ते समाजालाही भारी पडणार आहे,अशी भीती ढवळीकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :goaगोवा