शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

Goa: आरजीची हुल्लडबाजी पूर्वनियोजित, सुदिन ढवळीकर यांचा आरोप

By किशोर कुबल | Updated: March 3, 2024 13:47 IST

Goa News: आरजीची हुल्लडबाजी हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करीत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.

- किशोर कुबल पणजी - आरजीची हुल्लडबाजी हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करीत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. ढवळीकर म्हणाले की , 'दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मी अकरा जणांची नावे दिली होती. मडकई, फोंडा भागात याच व्यक्ती नेहमी गोंधळ घालत असतात. बोरी प्रकल्प तसेच मलनि:सारण व इतर प्रकल्पांना याच लोकांनी खो घातला. काल मडकई येथे याच लोकांनी हंगामा केला.'

ढवळीकर म्हणाले की 'मी कोणालाही अपशब्द वापरलेले नाहीत. तुम्ही येथे का आला आहात! एवढेच मी बोट वर करून मोठ्या आवाजात विचारले. काल सकाळी पावणे सातच्या सुमारास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा मला फोन आला. आरजीचे लोक गोंधळ घालणार आहेत, अशी कल्पना त्यांनी मला दिली. त्यानंतर मी पोलीस निरीक्षकांना फोन करून फार्मागुढी येथून विश्वजीत यांना बंदोबस्तात बांदोडा येथे आणण्यास सांगितले. फार्मागुडी येथे पोचल्यावर विश्वजीत यांनी आपण परत जातो असे मला कळविले. परंतु मी त्यांना सांगितले की, कार्यक्रमासाठी एक हजार लोक जमलेले आहेत. त्यांना नाराज करू नका. तुम्ही या. पोलीस निरीक्षक व मामलेदारांकडे मी बोललेलो आहे. कोणताही गैरप्रकार होणार नाही.'माझ्या आश्वासनानंतर विश्वजीत कार्यक्रमस्थळी आले. 

'समस्या मांडायला नव्हे तर हंगामा करायला झाले होते' 'विकसित भारत' सभेत मडकई मतदारसंघातील सहा ग्रामपंचायतींचे लोक आपल्या समस्या मांडणार होते. सरपंचही उपस्थित होते. लोकांची निवेदने घेण्यासाठी गटविकास अधिकारी बसले होते. परंतु ज्यांनी हुल्लडबाजी केली त्यांच्यापैकी एकानेही गटविकास अधिकाऱ्यांना कोणतेही निवेदन दिले नाही. ते समस्या मांडायला आले नव्हते तर हंगामा करायला झाले होते. या ठिकाणी आम आदमी पक्षाचेही कार्यकर्ते होते. परंतु ते शांत बसून होते. केवळ आरजीच्याच लोकांनी गैरकृत्य केले. हे लोक समाजाला कलंक आहेत. मी काहीही गैर बोललो नसताना माझ्याबद्दल अपप्रचार केला व माझे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मी कोणाच्याही गळ्याला धरायला गेलो नाही किंवा आजवर कोणालाही अपशब्द वापरलेले नाहीत. उलट विश्वेशाने माझ्याबद्दल माझ्याच मालमत्ते देऊन गैर शब्द वापरलेले आहेत. या लोकांमुळे समाजाचे फार मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळीच हस्तक्षेप करून या लोकांना अद्दल घडवायला हवी. या लोकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता लोकसभा निवडणुकीत मडकईत या लोकांना किती मते मिळतात हे दिसून येईलच. या लोकांवर आताच कारवाई न  केल्यास काट्याचा नायटा होईल व ते समाजालाही भारी पडणार आहे,अशी भीती ढवळीकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :goaगोवा