शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचे कान टोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 08:28 IST

क्रांतिदिन सोहळ्यात खुद्द स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या अध्यक्षांनीच टोचले.

'सोनाराने कान टोचले' अशी म्हण आहे. सरकारचे कान चक्क क्रांतिदिन सोहळ्यात खुद्द स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या अध्यक्षांनीच टोचले. यापूर्वी स्वातंत्र्यसैनिक सहसा जाहीरपणे पोटतिडक मांडत नव्हते. पोर्तुगीजांशी शत्रूत्व पत्करणारे स्वातंत्र्यसैनिक विद्यमान सत्ताधाऱ्यांना सुनावताना थोडे मागे राहायचे. मुक्त गोव्यातही आपला किंवा कुटुंबीयांचा छळ व्हायला नको, अशी त्यांची प्रामाणिक भावना असायची. संघटनेचे विद्यमान अध्यक्ष गुरूदास कुंदे मात्र खरोखर धाडसी, संवेदनशील व प्रामाणिक आहेत. त्यांनी आपले विचार व भावना जाहीरपणे मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केल्या. किल्ले आमच्यासाठी मंदिरे असून, तेथे मद्यविक्रीची सोय करू नका, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. गोवा मुक्त होऊन ६२ वर्षे झाली. जुलमी पोर्तुगीजांना गोव्यातून हद्दपार करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी किती हालअपेष्टा भोगल्या, हे आजच्या भाजप, काँग्रेसवाल्यांना कळणार नाही.

आता ६२ वर्षांनंतर क्रांतिदिन सोहळ्यात स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या अध्यक्षांना किल्ल्ल्यांवर मद्यविक्री नको, अशी विनंती करावी लागते हे सरकारचे मोठे अपयश आहे. सत्ताधाऱ्यांना याबाबत थोडे तरी वाईट वाटायला हवे. किल्ले हे क्रांती व इतिहासाचे साक्षीदार आहेत. या किल्ल्यांमधील तुरुंगातही अनेक स्वातंत्र्यसैनिक बंदिवान होते. किल्ल्यांवर घाऊक किंवा अन्य कसलेही दारू विक्रीचे दुकान सुरू ठेवण्यात जर सरकारला पुरुषार्थ वाटत असेल तर ते लाजीरवाणे आहे. मग देशभक्तीच्या गोष्टी सांगण्याचा कोणताही नैतिक अधिकार राज्यकर्त्यांना राहात नाही.

आग्वाद किल्ला, रेईशमागूश किंवा तेरेखोल किल्ला हे सगळे सांभाळून ठेवायला हवे. तिथे हॉटेल, मद्यपानाची व्यवस्था ज्या सरकारच्या काळात होत असते, त्या सरकारला शिवशाहीच्या गोष्टी सांगण्याचाही अधिकार नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते व त्यांनी गुरूदास कुंदे यांचे भाषण ऐकले असते तर सत्ताधाऱ्यांना शिवरायांनी किती कडक शिक्षा सुनावली असती, याची कल्पना करता येते. औरंगजेबाला शिव्या देताना किंवा औ आणि पौ वरून वाद निर्माण करताना आपण अगोदर शिवरायांचा एक जरी गुण अंगिकारला तर खूप बरे होईल. 

पोर्तुगीज काळात मोडलेली मंदिरे नव्याने बांधण्यापूर्वी किल्ल्यांवरील दारू दुकाने बंद केली तर ते पुण्यकर्म ठरेल. निदान शाळेच्या सहलीवेळी निष्पाप विद्यार्थ्यावर किल्ल्यावर दारू दुकान पाहण्याची वेळ येऊ नये, पोर्तुगीज राजवटीतही किल्ल्यांवर दारू दुकाने सुरू झाली नव्हती. एका बाजूने मांडवी नदीत कॅसिनो जुगार आणि नदी किनारी असलेल्या किल्ल्यांवर दारूचे दुकान. तरीही आपण शिवाजी महाराजांचे गुणगान करतो, पोर्तुगीजांच्या सगळ्या खुणा पुसून टाकण्याची भाषा करतो, हे सगळे परस्परविरोधी नाही का?

आग्वाद किल्ल्यावर दारू दुकान सुरू झाले, तेव्हाच स्वातंत्र्यसैनिकांनी आवाज उठवला होता. प्रसारमाध्यमांमधूनही टीका झाली होती. सरकारने तात्पुरते ते दुकान बंद केले, असे वातावरण तयार केले होते. मात्र, नंतर गुपचूप दारू दुकान पुन्हा सुरू झाले असेल तर ते खूप धक्कादायक आहे. जे स्वातंत्र्यसैनिक हयात आहेत, त्यांच्या डोळ्यांदेखत किल्ल्यावर असे दुकान सुरू ठेवून स्वातंत्र्यसैनिकांचा सरकार आणखी किती छळ करू पाहते? किल्ल्यावरील दारू दुकान हा आमचा अपमान आहे, असे नमूद करून कुंदे यांनी निषेध केला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या भाषणात सर्व मुद्द्यांचा आढावा घेतला. स्वातंत्र्यसैनिकांच्या अपेक्षांविषयीही बोलले. 

सैनिकांच्या मुलांना सरकारने नोकऱ्या दिल्या हेही त्यांनी जाहीर केले. आग्वाद किल्ल्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले, पण दारू दुकानाविषयी त्यांनी चकार शब्दही काढला नाही. समजा आज भाजप विरोधी बाकावर असता तर गुरूदास कुंदे यांच्या भाषणानंतर भाजपने त्या किल्ल्यासमोर मोठे आंदोलन केले असते. दारू दुकान बंद करण्याची मागणी करत भारतीय संस्कृतीच्या गोष्टीही सांगितल्या असत्या. मग सत्तेत असताना हे सगळे सद्गुण कुठे बरे जातात?

 

टॅग्स :goaगोवा