शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

म्हापसा अर्बनच्या आर्थिक निर्बधात पुन्हा मुदतवाढ केल्याने भागधारक चिंताग्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 14:06 IST

रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बनवर लागू केलेल्या निर्बंध हटवण्यासाठी किंवा शिथील करण्यासाठी आलेल्या दबावाला न जुमानता रिझर्व्ह बँक आपल्या भूमिकेशी ठाम राहून त्यात पुन्हा सहा महिन्यांची वाढ केली.

म्हापसा : रिझर्व्ह बँकेने म्हापसा अर्बनवर लागू केलेल्या निर्बंध हटवण्यासाठी किंवा शिथील करण्यासाठी आलेल्या दबावाला न जुमानता रिझर्व्ह बँक आपल्या भूमिकेशी ठाम राहून त्यात पुन्हा सहा महिन्यांची वाढ केली. केलेल्या वाढीमुळे बँकेचे खातेधारक, भागधारक, ठेवीदार, कर्मचारी वर्ग तसेच हितचिंतकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील साडेतीन वर्षांहून अधिक काळ लागू असलेले निर्बंध हटवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करुन सुद्धा त्यात किमान शिथिलता न मिळाल्याने वाढलेल्या चिंतेचे प्रमुख कारण बनले आहे. 

रिझर्व्ह बँकेने २४ जुलै २०१५ रोजी लागू केलेल्या निर्बंधाची मुदत १८ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. त्यानंतर पुन्हा त्यात सहा महिन्यांची वाढ करण्यात आली. पुढील महिन्यात २३ मार्च रोजी म्हापसा अर्बनच्या निवडणुका होणार आहेत. होणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी निर्बंध शिथील केले जाणार अशी आस्त लागून राहिली होती. अनेकांचे कोट्यवधी रुपये निर्बंधामुळे बँकेत अडकले आहेत. बँकेत असलेल्या कामय ठेवी तसेच इतर खात्यावर अनेकांचे दिनक्रम चालत होता; पण त्यांचे कष्टाचे पैसे अडकल्याने चिंता वाढली आहे. फक्त सहा महिन्यांतून एकदा फक्त १ हजार रुपये खात्यावरुन काढण्याची मुभा देण्यात आली आहे. 

बँकेवर सध्या कार्यरत असलेल्या विद्यमान संचालक मंडळाने आपला राजीनामा सादर केला असल्याने नव्या संचालक मंडळाची स्थापना होईपर्यंत त्यांच्याकडेच ताबा कायम ठेवण्यात आलेला आहे. असे असले तरी धोरणात्मक निर्णय घेण्यास मात्र त्यांच्यावर बंधन लागू करण्यात आलेले आहेत. 

बँकेचे सरव्यवस्थापक शैलेश सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्बंध हटवण्यात यावे यासाठी बँकेकडून प्रयत्न सुरु करण्यात आले होते. तशी विनंती रिझर्व्ह बँकेला सुद्धा करण्यात आलेली. राज्य तसेच केंद्र सरकारच्या पातळीवर प्रयत्नही करण्यात आलेले; पण केलेल्या प्रयत्नांना यश न लाभल्याने निराशा झाली असल्याचे ते म्हणाले. 

म्हापसा अर्बनकडून राज्य सरकारकडे २५ कोटी रुपयांच्या भाग भांडवलाची मागणी करणारा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. काही भागधारकांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची वेगळी भेट घेवून त्यासाठी प्रयत्नही केले होते. तसेच राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी केंद्र सरकारला पत्र पाठवून राष्ट्रीयकृत बँकांना अर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी केली जाणारी मदत बहुराज्य सहकारी बँकांना लागू करावी अशी विनंती त्यात केली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाजवळ तसा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे; पण अद्यापपर्यंत त्यावर कसल्याच प्रकारचा प्रतिसाद लाभलेला नाही. 

बँकेचा भागधारक म्हापसा पालिकेचा नगरसेवक राजसिंग राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार भागधारकांकडून सुद्धा निर्बंध शिथील व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात आलेले किमान पाच हजारापर्यंतची रक्कम खात्यावरुन काढण्याची मुभा अपेक्षीत होती; पण असलेल्या अपेक्षेचाही भंग झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान म्हापसा अर्बनचे पीएमसी बँकेत विलीनीकरण करण्यावर सध्या चर्चा सुरु करण्यात आली आहे.    

टॅग्स :bankबँक