शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

Goa : सामाजिक गरज म्हणूनच राजकारणात - सुभाष वेलिंगकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 12:15 IST

अनेक वर्षे संघाचे संघचालक म्हणून राहिल्यानंतर आणि अनेक आंदोलने केल्यानंतर आता राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय समाजाची गरज म्हणूनच घेतला असल्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे. 

पणजी - अनेक वर्षे संघाचे संघचालक म्हणून राहिल्यानंतर आणि अनेक आंदोलने केल्यानंतर आता राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय समाजाची गरज म्हणूनच घेतला असल्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे.  प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या मुद्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जाहीरपणे विद्रोह केलेले गोव्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी सक्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांना राजकारणात रस वगैरे आहे म्हणून नव्हे तर सामाजिक गरज म्हणून घेतल्याचे लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

संघचालक म्हणून पदावरून कमी केल्यामुळे तुम्ही राजकारणात उतरत आहात काय, तसेच एक या निर्णयामागे एक प्रकारचा राग किंवा सूड भावना असू शकेल काय असे विचारले असता. त्यांनी  पदाची व सत्तेची हाव असती तर पदही सोडले नसते व आंदोलनही छेडले नसते असे सांगितले. ज्या सामाजिक तत्त्वांना अनुसरून त्यांनी संघाचे काम केले त्याच तत्त्वांसाठी पदांवरही पाणी सोडल्याचे ते सांगतात.  मुद्दा होता प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे हा जागतिक सिद्धांत भाजपाविरोधात असताना बरोबर आणि सत्तेवर असताना चुकीचा असे कसे शक्य आहे. सर्व पर्याय वापरून शेवटी नाईलाजाने पक्ष स्थापन करून राजकारणात उतरावे लागत असल्याचे ते म्हणाले. 

आज या युगात पैशांच्या गुंतवणुकीशिवाय राजकारण्याच्या तुम्ही गोष्टी करतात. त्या कितपत शक्य आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले ' राजकारण करून जिंकून येण्यास राजकारण म्हणजे धंदा नाही. दुर्दैवाने आज राजकारणाला धंद्याचे स्वरूप देण्यात आलेले आहे. परंतु प्रामाणिक तत्वनीष्ठ राजकारणाला लोक प्राधान्य देतात हे सिद्ध करण्यासाठी त्या ताकदीच्या तत्वनीष्ठ प्रामाणिक राजकारणी लोकांची गरज आहे. गोवा सुरक्षा मंच नेमके हेच राजकारण करण्यासाठी स्थापन झाला आहे"

सक्रीय राजकारणात म्हणजे तुम्ही संघटनात्मक कामे करणार की निवडणूकही  लढविणार असे विचारले असता त्यांनी काळानुरूप आणि गरजेनुरूप जे काही क रावे लागेल ते केले जाईल. कारण शेवटी उद्दिष्ट महत्त्वाचे आहे. आताच 'न धरी शस्त्र करी घोषणा करून मर्यादा घालून घेण्याची गरज मला वाटत नाही अहे त्यांनी सांगितले. केवळ माध्यम या विषयावर निवडणुका लढविणे शक्य आहे काय या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना त्यांनी राजकारणात उतरल्यानंतर म्हादई कॅसिनो, बेरोजगारी हे विषय पक्षाने हाती घेतले आहेत. लोकांच्या हिताचे जे जे मुद्दे असतील ते सर्व पक्षातर्फे  घेतले जातील असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा