शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

Goa : सामाजिक गरज म्हणूनच राजकारणात - सुभाष वेलिंगकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 12:15 IST

अनेक वर्षे संघाचे संघचालक म्हणून राहिल्यानंतर आणि अनेक आंदोलने केल्यानंतर आता राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय समाजाची गरज म्हणूनच घेतला असल्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे. 

पणजी - अनेक वर्षे संघाचे संघचालक म्हणून राहिल्यानंतर आणि अनेक आंदोलने केल्यानंतर आता राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय समाजाची गरज म्हणूनच घेतला असल्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे.  प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या मुद्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जाहीरपणे विद्रोह केलेले गोव्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी सक्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांना राजकारणात रस वगैरे आहे म्हणून नव्हे तर सामाजिक गरज म्हणून घेतल्याचे लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

संघचालक म्हणून पदावरून कमी केल्यामुळे तुम्ही राजकारणात उतरत आहात काय, तसेच एक या निर्णयामागे एक प्रकारचा राग किंवा सूड भावना असू शकेल काय असे विचारले असता. त्यांनी  पदाची व सत्तेची हाव असती तर पदही सोडले नसते व आंदोलनही छेडले नसते असे सांगितले. ज्या सामाजिक तत्त्वांना अनुसरून त्यांनी संघाचे काम केले त्याच तत्त्वांसाठी पदांवरही पाणी सोडल्याचे ते सांगतात.  मुद्दा होता प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे हा जागतिक सिद्धांत भाजपाविरोधात असताना बरोबर आणि सत्तेवर असताना चुकीचा असे कसे शक्य आहे. सर्व पर्याय वापरून शेवटी नाईलाजाने पक्ष स्थापन करून राजकारणात उतरावे लागत असल्याचे ते म्हणाले. 

आज या युगात पैशांच्या गुंतवणुकीशिवाय राजकारण्याच्या तुम्ही गोष्टी करतात. त्या कितपत शक्य आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले ' राजकारण करून जिंकून येण्यास राजकारण म्हणजे धंदा नाही. दुर्दैवाने आज राजकारणाला धंद्याचे स्वरूप देण्यात आलेले आहे. परंतु प्रामाणिक तत्वनीष्ठ राजकारणाला लोक प्राधान्य देतात हे सिद्ध करण्यासाठी त्या ताकदीच्या तत्वनीष्ठ प्रामाणिक राजकारणी लोकांची गरज आहे. गोवा सुरक्षा मंच नेमके हेच राजकारण करण्यासाठी स्थापन झाला आहे"

सक्रीय राजकारणात म्हणजे तुम्ही संघटनात्मक कामे करणार की निवडणूकही  लढविणार असे विचारले असता त्यांनी काळानुरूप आणि गरजेनुरूप जे काही क रावे लागेल ते केले जाईल. कारण शेवटी उद्दिष्ट महत्त्वाचे आहे. आताच 'न धरी शस्त्र करी घोषणा करून मर्यादा घालून घेण्याची गरज मला वाटत नाही अहे त्यांनी सांगितले. केवळ माध्यम या विषयावर निवडणुका लढविणे शक्य आहे काय या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना त्यांनी राजकारणात उतरल्यानंतर म्हादई कॅसिनो, बेरोजगारी हे विषय पक्षाने हाती घेतले आहेत. लोकांच्या हिताचे जे जे मुद्दे असतील ते सर्व पक्षातर्फे  घेतले जातील असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा