शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

Goa : सामाजिक गरज म्हणूनच राजकारणात - सुभाष वेलिंगकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 12:15 IST

अनेक वर्षे संघाचे संघचालक म्हणून राहिल्यानंतर आणि अनेक आंदोलने केल्यानंतर आता राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय समाजाची गरज म्हणूनच घेतला असल्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे. 

पणजी - अनेक वर्षे संघाचे संघचालक म्हणून राहिल्यानंतर आणि अनेक आंदोलने केल्यानंतर आता राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय समाजाची गरज म्हणूनच घेतला असल्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे.  प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या मुद्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जाहीरपणे विद्रोह केलेले गोव्याचे माजी संघप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी सक्रीय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांना राजकारणात रस वगैरे आहे म्हणून नव्हे तर सामाजिक गरज म्हणून घेतल्याचे लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

संघचालक म्हणून पदावरून कमी केल्यामुळे तुम्ही राजकारणात उतरत आहात काय, तसेच एक या निर्णयामागे एक प्रकारचा राग किंवा सूड भावना असू शकेल काय असे विचारले असता. त्यांनी  पदाची व सत्तेची हाव असती तर पदही सोडले नसते व आंदोलनही छेडले नसते असे सांगितले. ज्या सामाजिक तत्त्वांना अनुसरून त्यांनी संघाचे काम केले त्याच तत्त्वांसाठी पदांवरही पाणी सोडल्याचे ते सांगतात.  मुद्दा होता प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून व्हावे हा जागतिक सिद्धांत भाजपाविरोधात असताना बरोबर आणि सत्तेवर असताना चुकीचा असे कसे शक्य आहे. सर्व पर्याय वापरून शेवटी नाईलाजाने पक्ष स्थापन करून राजकारणात उतरावे लागत असल्याचे ते म्हणाले. 

आज या युगात पैशांच्या गुंतवणुकीशिवाय राजकारण्याच्या तुम्ही गोष्टी करतात. त्या कितपत शक्य आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले ' राजकारण करून जिंकून येण्यास राजकारण म्हणजे धंदा नाही. दुर्दैवाने आज राजकारणाला धंद्याचे स्वरूप देण्यात आलेले आहे. परंतु प्रामाणिक तत्वनीष्ठ राजकारणाला लोक प्राधान्य देतात हे सिद्ध करण्यासाठी त्या ताकदीच्या तत्वनीष्ठ प्रामाणिक राजकारणी लोकांची गरज आहे. गोवा सुरक्षा मंच नेमके हेच राजकारण करण्यासाठी स्थापन झाला आहे"

सक्रीय राजकारणात म्हणजे तुम्ही संघटनात्मक कामे करणार की निवडणूकही  लढविणार असे विचारले असता त्यांनी काळानुरूप आणि गरजेनुरूप जे काही क रावे लागेल ते केले जाईल. कारण शेवटी उद्दिष्ट महत्त्वाचे आहे. आताच 'न धरी शस्त्र करी घोषणा करून मर्यादा घालून घेण्याची गरज मला वाटत नाही अहे त्यांनी सांगितले. केवळ माध्यम या विषयावर निवडणुका लढविणे शक्य आहे काय या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना त्यांनी राजकारणात उतरल्यानंतर म्हादई कॅसिनो, बेरोजगारी हे विषय पक्षाने हाती घेतले आहेत. लोकांच्या हिताचे जे जे मुद्दे असतील ते सर्व पक्षातर्फे  घेतले जातील असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा