शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

राज्यासाठी तीन लहान धरणे, शंभर बंधारे आवश्यकः मंत्री सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 15:09 IST

लोक पाणी संवर्धनाबाबत गंभीर नसल्याचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात लोक पाण्याच्या संर्वधानाबाबत गंभीर दिसत नाही. आता जेव्हा वातावरणात बदल होत आहे, धरणे आटायला लागली, पाऊस उशीरा दाखल होत आहे अशावेळी पाणी मिळत नसल्यावर लोकांना जाग येते. राज्याला जर पुरेसे पाणी हवे असेल तर पावसाळी पाण्याच्या संर्वधनाशिवाय कुठलाच पर्याय नाही,' असे मत जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले.

पावसाळ्यातील पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सरकारदेखील याबाबत खूप गंभीर आहे. भविष्यासाठी काही उपाययोजना सरकारने तयार केल्या आहेत. मुख्य म्हणजे धरणातून जेव्हा पाणी कालव्यात सोडण्यात येते आणि कालव्यांमधून जेव्हा पाणी शेतासाठी पुरवले जाते. यादरम्यान पाणी खूप वाया जाते. हे पाणी वाचविले तर यातून सुमारे ३० टक्के जास्त पाणी धरणात राहू शकते. पाणी वाया जाऊ नये यासाठी सरकार उपाययोजना करणार आहे', असे शिरोडकर यांनी सांगितले.

'गेल्या दहा वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहे. पर्यटन क्षेत्र वाढले, लोकसंख्या वाढली, अनेकजण शेतीकडे वळले आहेत. पाण्याचे मुख्य स्त्रोत नद्या, तळी दूषित होत आहेत. यातून पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे पाणी जर वाचवायचे असेल तर इतर काही गोष्टी नियंत्रणात येणे आवश्यक आहे. प्रदूषण करणाऱ्यांवरदेखील कारवाई होणे आवश्यक आहे,' असेही शिरोडकर यांनी सांगितले.

१०० बंधारे बांधण्याचे ध्येय 

'सध्याची पाण्याची गरज पाहता राज्यात आणखी तीन लहान धरणे आवश्यक आहेत. नद्यांवर १०० बंधारे देखील आवश्यक आहे. हे बांधण्याचे ध्येय मी ठेवले आहे. धरणांसाठी सुमारे १० ते १५ जागांची पाहणीदेखील करण्यात आली आहे. शिरोडा, काजूमळ व तातोडी ही तीन ठिकाणे जवळपास निश्चितही करण्यात आली आहेत,' असे शिरोडकर यांनी सांगितले.

लोकांनी विहीरी, तळे पुनरुज्जीवीत करावीत

'लोकांनी भविष्याचा विचार करत गरजेप्रमाणे जुन्या दूषित विहीरी, तळी साफ करुन पुनरुज्जीवीत करण्यावर भर द्यावा. आमच्या राज्यात अनेक नैसर्गिक जलस्त्रोत आहे, ते टिकवले तर बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न सुटेल, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.

म्हादईचा निकाल आमच्या बाजूनेच लागेल

'म्हादईचे पाणी वळविण्यात आले आहे, हे खरे आहे, यासाठीच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. आणि मला खात्री आहे निकाल आमच्या बाजूने लागेल. खरेतर पाणी वळविणे हा एक रोगाप्रमाणेच आहे. यातून पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे. एकाचे पाहून दुसरे राज्यही असेच करेल. आपल्या भागातील पाण्याचा वापर करणे यात काही वाईट नाही. परंतु पाणी वळविणे चुकीचेच,' असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवा