शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यासाठी तीन लहान धरणे, शंभर बंधारे आवश्यकः मंत्री सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 15:09 IST

लोक पाणी संवर्धनाबाबत गंभीर नसल्याचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात लोक पाण्याच्या संर्वधानाबाबत गंभीर दिसत नाही. आता जेव्हा वातावरणात बदल होत आहे, धरणे आटायला लागली, पाऊस उशीरा दाखल होत आहे अशावेळी पाणी मिळत नसल्यावर लोकांना जाग येते. राज्याला जर पुरेसे पाणी हवे असेल तर पावसाळी पाण्याच्या संर्वधनाशिवाय कुठलाच पर्याय नाही,' असे मत जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले.

पावसाळ्यातील पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सरकारदेखील याबाबत खूप गंभीर आहे. भविष्यासाठी काही उपाययोजना सरकारने तयार केल्या आहेत. मुख्य म्हणजे धरणातून जेव्हा पाणी कालव्यात सोडण्यात येते आणि कालव्यांमधून जेव्हा पाणी शेतासाठी पुरवले जाते. यादरम्यान पाणी खूप वाया जाते. हे पाणी वाचविले तर यातून सुमारे ३० टक्के जास्त पाणी धरणात राहू शकते. पाणी वाया जाऊ नये यासाठी सरकार उपाययोजना करणार आहे', असे शिरोडकर यांनी सांगितले.

'गेल्या दहा वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहे. पर्यटन क्षेत्र वाढले, लोकसंख्या वाढली, अनेकजण शेतीकडे वळले आहेत. पाण्याचे मुख्य स्त्रोत नद्या, तळी दूषित होत आहेत. यातून पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे पाणी जर वाचवायचे असेल तर इतर काही गोष्टी नियंत्रणात येणे आवश्यक आहे. प्रदूषण करणाऱ्यांवरदेखील कारवाई होणे आवश्यक आहे,' असेही शिरोडकर यांनी सांगितले.

१०० बंधारे बांधण्याचे ध्येय 

'सध्याची पाण्याची गरज पाहता राज्यात आणखी तीन लहान धरणे आवश्यक आहेत. नद्यांवर १०० बंधारे देखील आवश्यक आहे. हे बांधण्याचे ध्येय मी ठेवले आहे. धरणांसाठी सुमारे १० ते १५ जागांची पाहणीदेखील करण्यात आली आहे. शिरोडा, काजूमळ व तातोडी ही तीन ठिकाणे जवळपास निश्चितही करण्यात आली आहेत,' असे शिरोडकर यांनी सांगितले.

लोकांनी विहीरी, तळे पुनरुज्जीवीत करावीत

'लोकांनी भविष्याचा विचार करत गरजेप्रमाणे जुन्या दूषित विहीरी, तळी साफ करुन पुनरुज्जीवीत करण्यावर भर द्यावा. आमच्या राज्यात अनेक नैसर्गिक जलस्त्रोत आहे, ते टिकवले तर बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न सुटेल, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.

म्हादईचा निकाल आमच्या बाजूनेच लागेल

'म्हादईचे पाणी वळविण्यात आले आहे, हे खरे आहे, यासाठीच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. आणि मला खात्री आहे निकाल आमच्या बाजूने लागेल. खरेतर पाणी वळविणे हा एक रोगाप्रमाणेच आहे. यातून पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे. एकाचे पाहून दुसरे राज्यही असेच करेल. आपल्या भागातील पाण्याचा वापर करणे यात काही वाईट नाही. परंतु पाणी वळविणे चुकीचेच,' असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवा