शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यासाठी तीन लहान धरणे, शंभर बंधारे आवश्यकः मंत्री सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 15:09 IST

लोक पाणी संवर्धनाबाबत गंभीर नसल्याचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात लोक पाण्याच्या संर्वधानाबाबत गंभीर दिसत नाही. आता जेव्हा वातावरणात बदल होत आहे, धरणे आटायला लागली, पाऊस उशीरा दाखल होत आहे अशावेळी पाणी मिळत नसल्यावर लोकांना जाग येते. राज्याला जर पुरेसे पाणी हवे असेल तर पावसाळी पाण्याच्या संर्वधनाशिवाय कुठलाच पर्याय नाही,' असे मत जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले.

पावसाळ्यातील पाण्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सरकारदेखील याबाबत खूप गंभीर आहे. भविष्यासाठी काही उपाययोजना सरकारने तयार केल्या आहेत. मुख्य म्हणजे धरणातून जेव्हा पाणी कालव्यात सोडण्यात येते आणि कालव्यांमधून जेव्हा पाणी शेतासाठी पुरवले जाते. यादरम्यान पाणी खूप वाया जाते. हे पाणी वाचविले तर यातून सुमारे ३० टक्के जास्त पाणी धरणात राहू शकते. पाणी वाया जाऊ नये यासाठी सरकार उपाययोजना करणार आहे', असे शिरोडकर यांनी सांगितले.

'गेल्या दहा वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळत आहे. पर्यटन क्षेत्र वाढले, लोकसंख्या वाढली, अनेकजण शेतीकडे वळले आहेत. पाण्याचे मुख्य स्त्रोत नद्या, तळी दूषित होत आहेत. यातून पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे पाणी जर वाचवायचे असेल तर इतर काही गोष्टी नियंत्रणात येणे आवश्यक आहे. प्रदूषण करणाऱ्यांवरदेखील कारवाई होणे आवश्यक आहे,' असेही शिरोडकर यांनी सांगितले.

१०० बंधारे बांधण्याचे ध्येय 

'सध्याची पाण्याची गरज पाहता राज्यात आणखी तीन लहान धरणे आवश्यक आहेत. नद्यांवर १०० बंधारे देखील आवश्यक आहे. हे बांधण्याचे ध्येय मी ठेवले आहे. धरणांसाठी सुमारे १० ते १५ जागांची पाहणीदेखील करण्यात आली आहे. शिरोडा, काजूमळ व तातोडी ही तीन ठिकाणे जवळपास निश्चितही करण्यात आली आहेत,' असे शिरोडकर यांनी सांगितले.

लोकांनी विहीरी, तळे पुनरुज्जीवीत करावीत

'लोकांनी भविष्याचा विचार करत गरजेप्रमाणे जुन्या दूषित विहीरी, तळी साफ करुन पुनरुज्जीवीत करण्यावर भर द्यावा. आमच्या राज्यात अनेक नैसर्गिक जलस्त्रोत आहे, ते टिकवले तर बऱ्यापैकी पाण्याचा प्रश्न सुटेल, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.

म्हादईचा निकाल आमच्या बाजूनेच लागेल

'म्हादईचे पाणी वळविण्यात आले आहे, हे खरे आहे, यासाठीच आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. आणि मला खात्री आहे निकाल आमच्या बाजूने लागेल. खरेतर पाणी वळविणे हा एक रोगाप्रमाणेच आहे. यातून पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे. एकाचे पाहून दुसरे राज्यही असेच करेल. आपल्या भागातील पाण्याचा वापर करणे यात काही वाईट नाही. परंतु पाणी वळविणे चुकीचेच,' असे मंत्री शिरोडकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवा