शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

...तर गोव्यात सलग चौथ्यांदा तुटीचा मान्सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 19:58 IST

आतापर्यंतचा राज्यातील पाऊस हा १५  टक्के तुटीचा पाऊस ठरला आहे, त्यामुळे येत्या ४० दिवसात अधिक प्रमाणात पाऊस पडला नाहीतर  सतत चौथ्यावर्षीही तुटीचा मान्सून ठरणार आहे. 

पणजी - आतापर्यंतचा राज्यातील पाऊस हा १५  टक्के तुटीचा पाऊस ठरला आहे, त्यामुळे येत्या ४० दिवसात अधिक प्रमाणात पाऊस पडला नाहीतर  सतत चौथ्यावर्षीही तुटीचा मान्सून ठरणार आहे. गोव्यात सामान्य पावसाचे प्रमाण आहे ११७ इंच एवढे.  २०१४ साली मिळालेला १२० इंच पाऊस हा शेवटचा सामान्य प्रमाण ओलांडणारा पाऊस ठरला आहे. त्यानंतरचा पाऊस हा कामय तुटीचा ठरला आहे. यंदा सामान्य मन्सूनचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला होता. परंतु आतापर्यंत पडलेला पाऊस हा सामान्य प्रमाणापेक्षा १५ टक्के मागे आहे. ही तूट भरून न आल्यास यंदाही तूटीचाच मान्सून ठरणार आहे. मागील चार वर्षांत गोव्यात पडलेला पाऊस हा मान्सूनी तूटच दाखवीत आहे. यंदाही तीच परिस्थिती आहे. आॅगस्टचा तिसरा आठवडा संपल्यानंतरही केवळ ८५ इंच पावसाची नोंद झाली आहे. असे प्रमाण राहिल्यास फार तर इंचाचे शतक ओलांडले जाऊ शकेल, परंतु तूट भरून निघणार नाही, उलट वाढण्याची शक्यता आहे. वर्ष २०१७मध्ये बरोबर १०० इंच पाऊस पडला होता. सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यातही ही तूट २४ टक्के एवढी होती. परंतु महिना संपता संपता बंगालच्या उपसागरावर उंच हवेत  निर्माण झालेल्या ‘सर्क्युलेशन’ प्रक्रियेमुळे गोव्याहीत शेजारच्या राज्यांत जोरदार वृष्टी झाली.  त्यामुळे मोसमी पावसाची तूट ही जवळ जवळ निम्मी घटून २४ टक्क्यांवरून  १४ टक्क्यंवर आली होती. पावसाच्या सुरूवातीला व संपण्याच्यावेळी अशा प्रकारची सर्क्युलेशन प्रक्रिया, वादळे, चक्रीवादळे वगैरे निर्माण होण्याचा शक्यता खूप असतात. यंदा मान्सूनच्या सुरूवातीलाही चक्रिवादळ निर्माण झाले होते. पाऊस संपतानाही अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे घडल्यास निर्माण झालेली तूट भरून येण्याची शक्यता आहे.  

वर्ष        पाऊस इंचात    लाभ/तूट    २०१४        १२०.५        +३२०१५        ९४.३        -२०२०१६        १११.४        -१२०१७        १००.६        -१४२०१८         ०८५.७        -१५ (२१आॅगस्टपर्यंत)

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या