शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Mining Issue : केंद्राची 'ती' पत्रं गोवा सरकारने लपवली, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 18:23 IST

गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी वटहुकूम काढणे शक्य नाही तसेच संसदेत एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करणेही शक्य नसल्याचे केंद्राने राज्य सरकारला स्पष्टपणे कळवले असून दोन पत्रे पाठवून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याचा सल्ला दिला आहे.

पणजी : गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी वटहुकूम काढणे शक्य नाही तसेच संसदेत एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करणेही शक्य नसल्याचे केंद्राने राज्य सरकारला स्पष्टपणे कळवले असून दोन पत्रे पाठवून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान कार्यालयातून आणि अशाच आशयाचे केंद्रीय खाण मंत्रालयाकडून आलेले पत्र अशी दोन्ही पत्रे सरकारने दाबून ठेवली आणि खाण अवलंबितांशी वेळोवेळी खोटारकडेपणा केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने केला असून ही पत्रे लपवून ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेची माफी मागून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हे सरकार खाणी पूर्ववत सुरू करण्याबाबत मुळीच गंभीर नाही,असा आरोप केला. सर्वोच्च न्यायालयाने ८८ खाण लिजांचे नूतनीकरण रद्द करणारा आदेश गेल्या फेब्रुवारीत दिला त्यानंतर राज्य सरकार झोपून आहे. मुख्यमंत्र्यांनी तब्बल आठ महिन्यांनंतर केवळ एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले, यापलीकडे काहीच केले नाही. फेरविचार याचिकेच्या बाबतीतही काही केले नाही. सरकारने जनतेसाठी विनाविलंब ही पत्रे जनतेसाठी जाहीर करायला हवीत, असे चोडणकर म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की, ‘ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात आता वर्ष पूर्ण होत आले आहे तरी सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. निव्वळ खोटारडेपणा केला. खाणींच्या बाबतीत सरकारमधील मंत्र्यांची विसंगत विधाने येत आहेत. कोणीही नीट सांगत नाही, प्रत्येकजण दिशाभूल करीत आहे. केंद्रात मंत्री असूनही श्रीपाद नाईक यांना पंतप्रधान मोदी यांची साधी अपॉइंटमेंट घेणे शक्य झाले नाही. आता लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने अवलंबितांना भाजप पुन: आश्वासने देईल परंतु लोकांनी त्यास बळी पडू नये. 

टॅग्स :goaगोवाMining Scamखाण घोटाळा