शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

Mining Issue : केंद्राची 'ती' पत्रं गोवा सरकारने लपवली, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 18:23 IST

गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी वटहुकूम काढणे शक्य नाही तसेच संसदेत एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करणेही शक्य नसल्याचे केंद्राने राज्य सरकारला स्पष्टपणे कळवले असून दोन पत्रे पाठवून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याचा सल्ला दिला आहे.

पणजी : गोव्यातील खाणी सुरू करण्यासाठी वटहुकूम काढणे शक्य नाही तसेच संसदेत एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करणेही शक्य नसल्याचे केंद्राने राज्य सरकारला स्पष्टपणे कळवले असून दोन पत्रे पाठवून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान कार्यालयातून आणि अशाच आशयाचे केंद्रीय खाण मंत्रालयाकडून आलेले पत्र अशी दोन्ही पत्रे सरकारने दाबून ठेवली आणि खाण अवलंबितांशी वेळोवेळी खोटारकडेपणा केल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने केला असून ही पत्रे लपवून ठेवल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेची माफी मागून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. 

पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हे सरकार खाणी पूर्ववत सुरू करण्याबाबत मुळीच गंभीर नाही,असा आरोप केला. सर्वोच्च न्यायालयाने ८८ खाण लिजांचे नूतनीकरण रद्द करणारा आदेश गेल्या फेब्रुवारीत दिला त्यानंतर राज्य सरकार झोपून आहे. मुख्यमंत्र्यांनी तब्बल आठ महिन्यांनंतर केवळ एक पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले, यापलीकडे काहीच केले नाही. फेरविचार याचिकेच्या बाबतीतही काही केले नाही. सरकारने जनतेसाठी विनाविलंब ही पत्रे जनतेसाठी जाहीर करायला हवीत, असे चोडणकर म्हणाले. 

ते पुढे म्हणाले की, ‘ सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात आता वर्ष पूर्ण होत आले आहे तरी सरकारने कोणतीही पावले उचलली नाहीत. निव्वळ खोटारडेपणा केला. खाणींच्या बाबतीत सरकारमधील मंत्र्यांची विसंगत विधाने येत आहेत. कोणीही नीट सांगत नाही, प्रत्येकजण दिशाभूल करीत आहे. केंद्रात मंत्री असूनही श्रीपाद नाईक यांना पंतप्रधान मोदी यांची साधी अपॉइंटमेंट घेणे शक्य झाले नाही. आता लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने अवलंबितांना भाजप पुन: आश्वासने देईल परंतु लोकांनी त्यास बळी पडू नये. 

टॅग्स :goaगोवाMining Scamखाण घोटाळा