शहरं
Join us  
Trending Stories
1
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
2
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
3
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
4
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
5
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
6
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
7
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
8
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
9
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
10
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
11
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
12
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
13
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
14
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
15
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
16
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
17
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
18
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
19
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
20
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक

पर्रीकर असते तर... अत्यंत प्रभावी नेता, गोव्यात जलदगतीने विकासाची केली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 15:25 IST

पर्रीकर यांना तिसऱ्या जयंतीदिनी सामान्य गोंयकाराच्यावतीने विनम्र श्रद्धांजली.

मनोहर पर्रीकर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. पर्रीकर यांच्या अंत्यदर्शनासाठी पणजीत उसळलेली गर्दी, लागलेली प्रचंड रांग आणि देशभर तयार झालेले शोकाचे वातावरण आजदेखील आठवते. १७ मार्च २०१९ रोजी पर्रीकर यांनी डोळे कायमचे मिटले आणि गोव्यात लाखो समर्थकांचे डोळे पाणावले. मृत्यूसमयी पर्रीकर संरक्षणमंत्रिपदी नव्हते. ते छोट्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदी होते, पण एखादा अत्यंत प्रभावी विद्यमान केंद्रीय मंत्रीच मरण पावला, अशा प्रकारचे वातावरण देशातील विविध राज्यांमध्ये तयार झाले होते. 

स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या निधनावेळी पणजीत महासागर लोटला होता, असे जुन्या काळातील लोक सांगतात. त्यानंतरची सर्वात मोठी गर्दी ही पर्रीकर यांच्या मृत्यूसमयी झाली होती. पंतप्रधानांसह अनेय केंद्रीय नेतेही गोव्यात दाखल झाले होते. पर्रीकर यांच्या जाण्याने गोव्याचे नुकसान झाले हे मान्य करावे लागेल. परवा सोशल मीडियावर एक महत्त्वाची प्रतिक्रिया आली. बार्देश तालुक्यातील महत्त्वाच्या भागात नळ कोरडे. पर्वरी, साळगावसह अनेक गावांत पाणीच नाही. पर्रीकर असते तर धावपळ करून पाण्याची व्यवस्था केली असती. ही प्रतिक्रिया खूप बोलकी होती, कोविड संकट काळात पर्रीकर नव्हते. ऑक्सिजनअभावी गोव्यात शेकडो रुग्णांचे प्राण गेले. 

पर्रीकर असते तर असे झाले नसते, ही त्यावेळची प्रतिक्रिया होती. पर्रीकर चौथ्यांदा सीएम बनले तेव्हा त्यांनी फिरविलेले काही निर्णय टीकेचा विषय झाले तरी त्यांची कार्यक्षमता, नेतृत्व गुण, प्रशासनावरील नियंत्रण, अधिकाऱ्यांमध्ये असलेला धाक याला तोड नव्हती. विद्यमान सरकारही कार्यक्षमता दाखवत आहे, पण पर्रीकर यांच्यासारख्या नेत्याने गोव्याला जलदगतीने विकासाच्या मुख्य धारेत नेऊन ठेवले होते, हे लक्षात घ्यावे लागेल. अजूनदेखील ज्या कल्याणकारी योजनांचा गवगवा होतो, त्या योजना पर्रीकर यांनीच सुरू केल्या होत्या. पर्रीकर यांच्या काळात सरकारी नोकऱ्या विकल्या जात नव्हत्या. बांधकाम खात्यात दोनवेळा (दीपक पाऊसकर असताना एकदा) नोकरभरती घोळ झाला, तसा घोळ पर्रीकरांच्यावेळी होत नव्हता. नोकरभरतीसाठी एखाद्या कार्यकर्त्याने पैसे घेतल्याचे आढळले तर थेट बैठकीत तिखट बोलून पर्रीकर ते पैसे नेऊन परत कर असा आदेशच द्यायचे. त्यावेळी रामराज्य होते अशातला भाग नाही, पण पर्रीकर गेल्यानंतर काहीजणांनी जसे विटवले, तेवढी दुर्दशेची स्थिती तेव्हा नव्हती.

आता बँकांमध्ये खेपा मारणारे व घामाघूम होणारे ज्येष्ठ नागरिक, लाडलीच्या प्रतीक्षेतील युवती किंवा 'गृहआधार'चा केवळ आधार असलेल्या विधवा महिला नाराजीने सांगतात की बँकेत पैसेच आले नाहीत. भाई असते तर असे घडले नसते, अशी स्वाभाविक प्रतिक्रिया येते. स्मार्ट सिटीच्या नावाखाली पणजी शहर नेऊन राज्यकर्त्यांनी खड्यात घातले. व्यापारी, दुकानदारांसह सर्वांचेच नुकसान झाले. पर्रीकर असते तर काहीजण तरी एव्हाना पणजीच्या दुर्दशेचे दोषी म्हणून तुरुंगात गेले असते. दुसरा पर्रीकर निर्माण होईपर्यंत प्रतीक्षा करूया. पर्रीकर यांनी ज्या योजना सुरू केल्या, त्या अधिक प्रभावीपणे अमलात आणण्याचे काम सावंत सरकारने करायला हवे. गृह आधार योजनेचा लाभ गरजू महिलांना दर महिन्याला मिळायला हवा. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या पैशांसाठी लोकांना प्रतीक्षा करावी लागू नये. लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभासाठी युवती अर्ज करतात. मात्र लग्न झाले, मूल झाले तरी, योजनेचा लाभ मिळत नाही. 

पर्रीकर यांना कधीच तीस-बत्तीस आमदारांचे पाठबळ मिळाले नव्हते. विद्यमान मुख्यमंत्री सावंत यांना ते मिळाले आहे. ३३ आमदार आज सरकारसोबत आहे. त्यामुळे खरे म्हणजे सध्याच्या सरकारने जनमानसावर कायमचा ठसा उमटेल अशा योजना आणायला हव्यात. तिसरा मांडवी पूल आणि अन्य साधनसुविधा उभ्या केल्या म्हणून पर्रीकर यांचे नाव घेतले जाते. पर्रीकर सीएम असताना भाजप कोअर टीमच्या बैठका सातत्याने होत होत्या. आता त्या होतच नाहीत. त्यामुळे भाजप संघटना व विद्यमान सरकारमध्ये समन्वय नाही. पर्रीकर यांना तिसऱ्या जयंतीदिनी सामान्य गोंयकाराच्यावतीने विनम्र श्रद्धांजली. 

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर