शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

गोवा, भारत आणि नेहरू; राजेंद्र आर्लेकरांचे विधान अन् तर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2024 07:44 IST

नेहरूंच्या विधानामागे कोणती पार्श्वभूमी होती हे नेमकेपणाने आज कुणी सांगू शकत नाहीत. त्याबाबत दोन दावे केले जातात. 

१९६१ साली गोवा मुक्त झाला त्यावेळी स्थिती वेगळी होती, सामाजिक- धार्मिक-आर्थिक स्तरावर वेगळे वातावरण होते. हिंदू बहुजन समाज भेदरलेला होता, कारण पोर्तुगीज काळात समाजाचे जे काही घटक सत्तेशी चांगले संबंध ठेवून राहिले होते, त्यांच्याकडेच जमिनी शाबूत राहिल्या आणि त्यांचीच आर्थिक व सामाजिक उन्नतीही झाली होती. ज्यांनी पोर्तुगीजांशी दोन हात केले, संघर्ष केला, त्यापैकी अनेकजण देशोधडीला लागले. खऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची अनेक कुटुंबे बिचारी हलाखीचे जीवन जगत राहिली. पोर्तुगीज राजवटीत आपल्यावर एका ठरावीक घटकाने अन्याय केला, पण मुक्तीनंतर आता तरी आपल्याला चांगले दिवस यायला हवेत असे स्वातंत्र्यसैनिकांना आणि बहुजनांमधील अनेक उपेक्षित घटकांना वाटले. 

यापैकी बहुतेकांनी गोवा महाराष्ट्रात विलीन करूया असा आग्रह धरला होता, अर्थात त्याकाळी गोवा महाराष्ट्रात विलीन झाला नाही हे मोठे उपकार झाले. गोवा वेगळे राज्यच राहायला हवे हा मुद्दा नंतरच्या काळात व आतापर्यंत तर सर्वांनाच पटला. आता बिहारचे राज्यपाल असलेले गोमंतकीय सुपुत्र राजेंद्र आर्लेकर यांनी परवा नेहरूंविषयी जे विधान केले, त्याकडे पहावे लागेल. गोव्याचे लोक अजीब आहेत, असे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, नेहरूंच्या विधानामागे कोणती पार्श्वभूमी होती हे नेमकेपणाने आज कुणी सांगू शकत नाहीत. त्याबाबत दोन दावे केले जातात. 

ज्येष्ठ लेखक स्वर्गीय चंद्रकांत केणी यांच्याशी बोलताना नेहरू तसे बोलले होते असा दावा केला जातो, राज्यपाल आर्लेकर यांनी पणजीत परवा एक राखी सैनिकांसाठी कार्यक्रमात बोलताना नेहरूंचा वरवर असा संदर्भ दिला. आर्लेकर यांना स्वतःला अजीब शब्दाचा अर्थ जसा अभिप्रेत आहे, त्या पद्धतीने ते बोलले. नेहरूंनी गोमंतकीयांना अजीब म्हटले होते, पण आर्लेकर म्हणतात त्यासाठी नव्हे असे काहीजण आता सांगतात. पण आर्लेकरांचा मुद्दा असा की गोवा हे भारतापासून वेगळे राज्य नव्हे तर गोवा प्रदेश हा पूर्णपणे भारतीयच आहे. गोव्याला किंवा गोंयकारांना त्याबाबत अजीब म्हणता येणार नाही, असा दावा आर्लेकर यांनी केला, गोवा के लोग अजीब है, असे नेहरूंनी म्हटले होते पण ते गोवा भारतापासून वेगळाच आहे अशा अर्थाने म्हटले नव्हते, हा अभ्यासकांचा दावा आहे. 

अर्थात हा दावा पटतोच, मग कोणत्या अर्थाने नेहरू तसे बोलले होते हा प्रश्न येतो. त्यासाठी पुन्हा दोन वेगवेगळी उत्तरे दिली जातात. ज्या काळी भाषेच्या आधारावर विविध राज्यांची निर्मिती होत होती, तेव्हा काहीजण गोवा पूर्ण स्वतंत्र राज्य राहू दे म्हणत होते तर अनेक हिंदू गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण होऊ दे अशी मागणी करत होते. गोवा कर्नाटकात विलीन करा असे कुणी मागितले नव्हते. महाराष्ट्रात विलीन करा, असे म्हटले होते; कारण सांस्कृतिकदृष्ट्या व भाषिकदृष्ट्या आपल्याला ते जवळचे राज्य ही भावना होती व आहे. देवनागरी लिपीही गोंयकारांनी स्वीकारली. हिंदूंनी स्वीकारली. बहुतांश ख्रिस्ती बांधवांनी स्वीकारली नाही. काहीजणांना गोवा स्वतंत्र झाला व पोर्तुगीज गोव्यातून गेले ही गोष्टदेखील एकेकाळी रुचली व पचली नव्हती. अर्थात याबाबत कुणा विशिष्ट घटकाला दोष देता येणार नाही, कारण आपल्या राज्यातील ऐतिहासिक अपघातच वेगळे आहेत. म्हणूनच तर गोमंतकीयांच्या राष्ट्रीयत्वाचा हास हे पुस्तक जन्मास आले. 

अनेकजण अजूनदेखील गोंयकारपण म्हणजे भारतापासूनही वेगळेच काही तरी रसायन आहे, असे मानतात; पण ते जाहीरपणे तसे सांगत नाहीत एवढेच. असो. दूसरी गोष्ट अशी की पूर्ण देशात काँग्रेस पक्ष जिंकला होता तेव्हा गोव्यात मात्र लोकांनी मगो पक्ष निवडून आणून काँग्रेसचा पराभव केला होता. त्या संदर्भातही गोवा के लोग अजीब है असे नेहरू बोलले होते, असा ठोस दावा काही अभ्यासक करतात. हा दूसरा दावा अधिक पटतो, पण कोणता दावा खरा? हा खरे म्हणजे चर्वेचा विषय व्हायला हवा. आर्लेकर यांनी गोवा भारतापासून वेगळा नव्हे, असा मुद्दा मांडताना नेहरूंच्या अजीब शब्दाचा संदर्भ द्यायला नको होता एवढे पटते. पण नेहरू नेमके तसे का बोलले होते हे सांगण्यासाठी आज नेहरूही हयात नाहीत.

टॅग्स :goaगोवा